समाजामध्ये वावरताना कधीतरी अचानक एखाद्या समस्येला आपणास सामोरे जावयास लागते. तेव्हा तेथे उपस्थित असलेली जाणकार व्यक्ती पटकन त्यावर एखादा तोडगा सांगते व आपली समस्येचे चुटकीसरशी निराकरण होते. असे स्वतः अनुभव घेतलेले तोडगे शक्यतो आपण येथे लिहू, केवळ पुस्तकी तोडगे लिहूया नको.
डीसान अॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला.
मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.
बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?
(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)
यंदा विद्रोही साहित्य संमेलन बीडमध्ये भरणार आहे असे ऐकले. २२ व २३ डिसेंबर रोजी होणार्या ११ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला कोण कोण असेल हा विचार मनात आला. महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या परंपरा असताना विद्रोही नावाचे साहित्य संमेलन का व्हावे? असा प्रश्न पडला. या साहित्य संमेलनाची बातमी वाचताना सत्यशोधक असाही उल्लेख सापडला. या उल्लेखामुळे, "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" असे ठासून सांगणार्या आणि अद्वैतवादाचा प्रसार भारतभर करणार्या आद्य श्रीशंकराचार्यांची आठवण लगेचच झाली. मात्र, आता हे विद्रोही साहित्यिक त्यांना मानत असतील का? असाही प्रश्न मनात आला.
सिंगापुरात असलेल्या सर्व माबोकरांना नमस्कार...
मी आणि माझा नवरा डिसेंबर पासून तिकडे येतो आहोत. आमच्यासाठी घर शोधणे आणि माझ्यासठी नोकरी शोधणे हे सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.....पण इथे असलेल्या सगळ्यांनी हे प्रश्न कसे सोडवले हे समजलं तर गोष्टी जराशा सोप्या होतील.....क्रुपया प्रतिसादात लिहा....
जगन्नाथाचा रथोत्सव-- एक अर्थान्वयन-रसग्रहण
(स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात जन्मठेप भोगत असतांना केलेले हे काव्य)
ऐश्वर्ये भारी |या अशा ऐश्वर्ये भारी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी |धृ||
दिक क्षितिजांचा दैदिप्य रथ तुझा सुटता
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता
नक्षत्रकणांचा उठे धुराळा वरता
युगक्रोश दूरी| मागुती युगक्रोश दूरी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?||
(२)
पुसूं नयेचि परी| पुसतसे पुसूं नयेचि परी|
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी
दुज्या कुण्या द्वारी| जावया दुजा कुण्या द्वारी
किंवा केवळ मिरवत येई परत निजागारी
या छोट्याश्या घराचे मालक आणि त्यांची पत्नी ओरासिओ आणि इलियाना (वय वर्षे ५६ आणि ४७)...त्यांना सहा मुलं......सगळ्यात मोठी मुलगी इसाबेल (३२ वर्षे) तिच्या नवर्याबरोबर राहते. तिला तीन मुलं आहेत. मनुवेल, मारिया आणि सादी...वय वर्षे अनुक्रमे ७, ४ आणि १...इसाबेल घरात तयार केलेला ब्रेड रस्त्यावरच्या बाजारात विकते आणि तिचा नवरा अगुस्त हा घरातल्याच शेतात कॉफी आणि कसावा चे पीक घेतो. जेव्हा इसाबेल आणि अगुस्त पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी बरोबर राहायचा निर्णय घेतला तेव्हा अगुस्त फोटोग्राफर म्हणून काम करत असे.
नमस्कार,
नवीनच लेखनाला सुरुवात केली की कदाचित असंच होत असावं.....रोज येऊन रिफ्रेश कर-करून काही नवीन कमेंट्स आहेत का बघणे...असेल तर खुश होणे.....आणि खुश होऊन आपण एकटच हसतोय असं लक्षात आलं की परत चेहरा होता तसा करणे.....आणि नसेल आलं काही तर परत रिफ्रेश करणे......
माझ्या अंगोलावर लिहिलेल्या २ लेखांना मी नवीन सभासद असूनही खूपच छान प्रतिसाद मिळाला......मिळेल का नाही असं वाटलं होतं कारण....गटबाजी वगैरे वाचलं होतं अगदी नवीन नवीन असताना.....पण तसं काही असेल असं मला तरी जाणवलं नाही....असो....
प्रत्येक देशाची आपली अशी एक संस्कृती असते. रितीरिवाज असतात, खाद्यप्रकार असतात. अंगोलात येउन आता ५ महिने झालेत त्यामुळे इथल्याही अशा काही गोष्टी तुमच्या बरोबर शेयर कराव्याशा वाटल्या. मी काही सगळंच बघितलेलं नाही अजून पण मला सगळ्यात जास्त विशेष वाटलं ते म्हणजे इथलं जेवण, इथली लग्न पद्धती, घरात मृत्यू झाल्यावर करण्यात येणार्या गोष्टी आणि इथल्या बायकांचे पारंपारिक ड्रेस!