हो - नाही - हो करता करता अखेर फायनल झालेलं आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था लवकरच मंगळावर (तोच तो आपल्या भारतीयांच्या जीवनात 'चहा' , इस्त्री यांच्या खालोखाल 'कडक' मानला जाणारा…) यान पाठवणार आहे. मोहीम यशस्वी होईल असं गृहीत धरू.. नाही धरू'च' (कारण शेवटी आपल्या खिशातूनच जाणार आहेत हे पैसे). सारे काही नियोजनानुसार झाल्यास या महिन्याच्या अखेरीला भारताचे 'मंगलयान' मंगळाच्या दिशेने झेपावेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ आपली मुद्रा आणखी ठळक करतील.
आता मला अशी शंका आहे कि, जर आज - उद्या - १०० वर्षांनी मंगळावर वस्ती शक्य झाली तर....
गेले २/३ दिवस होणार होणार म्हणून मायबोली वर गाजणारा "डोंबिवलीत राहणारे मायबोली कर" काल दसर्यानिमीत्ताने भेटले.
खरे तर गणपती उत्सवापासूनच एकमेकांना भेटायची ओढ होतीच पण मुहुर्त लागत न्हवता.तो काल लागला. अंजू आणि मी एकमेकांना ओळखत होतोच.पण आता अजुन इतर जणांना पण एकमेकांना भेटायची ओढ होतीच.
एकमेकांना व्यक्तिगत निरोप दिल्या गेले आणि वेळ / ठिकाण नक्की करण्यात आले.४/५ जणच असल्याने श्री.एस.आर.डी. ह्यांनी सांगीतलेले बालभवन ठिकाण लगेच मंजूर पण झाले.संध्याकाळी साडे पाच ते सहा पर्यंत जमायचे असेही ठरले.
माझेच मी
कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो
शहरात या, नाव माझेच मी विचारतो !
*
असा दूर आलो कळेना कुठे पोहोचलो
प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो !
*
काढले विकाया, माझेच सर्वस्व मी
लिलावात या, भाव माझेच मी विचारतो !
*
तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे
शत्रूस या, डाव माझेच मी विचारतो !
*
जायबंदी शरपंजरी शेवटी युद्धात मी
किती जाहले, घाव माझेच मी विचारतो !
-अशोक
काल मायबोली माध्यम प्रायोजक असलेला ’इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला.

इन्व्हेस्टमेंट च्या निमित्ताने...
अयोग्य जागी केलेली गुंतवणुक ही फायदा तर मिळवुन देत नाहीच पण मुळ मुद्दल ही धोक्यात पडतं .

पत्र १
प्रिय गौरी, १/९/१३
प्रिय गणोबा,
सस्नेह नमस्कार..
नुसतं "सस्नेह नमस्कार" असं लिहिण्याईतका काही मी तुमच्या बरोबरोबरीचा नाही ना वयानं, अनुभवानं आणि मानाने हे... पण असं "सस्नेह" लिहिलं की मनातल्या या वयाच्य अनुभवाच्या आणि मानाच्या भिंती दुर होतात आणि एकदम परिचित आणि आपल्या माणसाशीच बोलत असल्याचा फिल येतो...आणि मला नक्की माहीतेय कि तुम्हालाही हे नक्की पटेलच.
विषय क्रमांक-१ : काळरात्रीनंतरचा उषःकाल
भारतमातेला जखडून ठेवणाऱ्या पारतंत्र्याच्या बेड्यांनी अस्वस्थ झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याग, बलीदानानंतर मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचे अप्रूप सगळ्या भारतीयांना होते. समाजात, राजकारणात मुल्यांची, तत्वांची चाड असलेली माणसं अजून कार्यरत होती.
आता जिणे बास झाले...
आता जिणे बास झाले
पावलो पावली उपहास झाले
वाट पाहतो रोज तुझी
तुझे येणे महामास झाले
झोंबता वारा सहीला परी
झुळुक येणे त्रास झाले
तरळते डोळ्यात पाणी
तुझ्या आठवांचे भास झाले
आपल्यांनीच छळीले आता
वैरीच आता विश्वास झाले
झेलले वार किती तरी
जखमांचे व्यास झाले
सजवले होते फुलांनी तरी
कफनाचे निमित्त खास झाले
राजेंद्र देवी.
रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ?