मी स्वयंपाकघरात सभा बोलावली. आधी शुकशुकाटच होता. पण भाषणाचा आवाज नरसाळ्यातून येतो तसा यायला लागल्यावर इथे बसायचं तर तिथे असा विचार झाला असावा. बरीच गर्दी जमली. ३ माणसं आकाश कोसळल्यासारखा चेहरा करुन समोर उभी राहिली. मी जाहिर केलं.
"मी गाय पाळणार आहे." सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सभेतले २ सदस्य नेहमीप्रमाणे तोंडात मीठाची गुळणी धरुन होते. स्त्री सदस्य फारच आगाऊ होती. ती अगदी पटकन माझ्यासारखंच म्हणाली,
"घरातले प्राणी कमी पडतायत वाटतं. हे कसलं अचाट खूळ?" ती माझा वारसा चालवते त्यामुळे ’आगाऊ’ न म्हणता तिच्या उर्मटपणाचं मी कौतुक केलं."
"विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्याने मी जाहीर केलं.
"कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं.
"त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा विनोद झाल्यासारखा खो खो हसला.
"बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"
चित्रपट पाहायला कोणाला नाही आवडत..? सगळ्यांनाच आवडतं. मलाही, त्यातल्या त्यात...हॉलीवूड चं अधिक आकर्षण आहे. त्यांच फिक्शन, अॅनिमेशन, व्ही.एफ.एक्स, स्टोरी, डेडिकेशन, टेक्नोलॉजी....वैगेरे, वैगेरे...आणि हा....नट-नटी. त्यांच्या त्या सपोर्टिंग इक्विपमेंट्स, क्र्यू, आणि त्यांच्या मेहनतीच कौतुक. बऱ्याचदा मी ते चित्रपट पाहतो, मला ते भावतात, आवडतात, पटतात....सर्वच असे नाही, मोजकेच. चित्रपट बघून झाल्यावर अर्थात ते आवडो-नावडो चित्रपट बाजूला सारून मी कधी कधी व्यंगात्मक विचार करून स्वतःशीच हसतो. त्यातूनच पडलेले काही प्रश्न....उत्तरं असतील तर नक्की द्या.
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... 
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
आधुनिक शब्दकोशातून:
ट्र्म्पणे!
क्रियापद.
अर्थ:
१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.
२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.
३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)
३ मुलं जी वस्तीगृहात रहात असतात सकाळी उठून तयारीला लागतात. एक होता जाडा जो जरा जास्तच खादाड असतो. दुसरा होता लुकडा जो खूप खट्याळ असतो. आणि शेवटचा होता साधा भोळा जो त्या दोघांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा. सकाळी सकाळी त्यांची पार शर्यत लागत असे की पहीले आंघोळ कोण करणार. कसे बसे प्रत्येकजण आपापली आंघोळ आटपत तयारी करून कामाला जातात. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी थकून भागुन सगळे घरी परततात.
एका रविवारची एक सुमसाम सकाळ.
परममित्र साहित्यिक जगू जगदाळेच्या रुमवर मी... अजूनही त्याच्या ‘नॉर्मल’ ला येण्याची वाट पाहत !
तो लोखंडी कॉटवर कुठेतरी खोलवर शून्यात का काय म्हणतात तशी नजर लावून बसलेला. म्हणजे परीक्षेत आपल्याला जाम काही आठवत नसताना, आपण कसे डोळे बारीक करून, खालचा ओठ तोंडात घेऊन, भिंतीवरच्या उंच कोप-यातले हलणारे जळमट बघत बसतो ना तसा.
मी एकदा त्याच्याकडे, मग मधेच खिडकीतून दिसणा-या फांदीवर निवांत बसलेल्या एका स्थितप्रज्ञ कावळ्याकडे आणि मग जगूच्या मागच्या भिंतीवर लावलेल्या एका विशेष आकर्षक युवतीच्या कॅलेंडरकडे असा आळीपाळीने टकमक बघत होतो.
रागावता साहेब मजला खुप राग आला
तडकाफडकी मी बसलो कविता लिहायला
सणसणीत उगाळलेले शब्द काढले शोधून
अन शिव्या काही यमकात टाकल्या घोटून
तडकाफडकी तसाच राग माझा शांत झाला
म्हटलो चला कवितेला एक विषय मिळाला
जरा विसावतो तोच एक डास खुळावला
येवून कडकडून चक्क मजला चावला
पेपरने मारता मरता हुलाकावून गेला
ओहोहो दुसरी कविता आली उदयाला
रक्तरंजित पिसाट अन अर्थ कोंबलेला
आणि तो पेपर विस्कटून घरभर पसरता
प्रतिभेला बहर आला बातमीत डोकवता
तडकाफडकी पुन्हा बैठक रचली कविता
एकही न्यूज न जावो काही न लिहता
डोळा ठेवून होतो तसाच दुज्या पेपरवरती
सोन्याचीच मजला सारी रद्दी वाटत होती
"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.
घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
नकळत घडली चूक
==============
(कथा काल ऐशीच्या दशकातील).
आम्ही बोकलवाडी सेंट परषु (षु का शू?) माध्यमिक शाळेतील सातवी 'ड' मधली थोर मुलं भुक्कड अशोक सरांना 'पंखा' म्हणतो. त्याची शास्त्रीय कारणे दोन. एक तर शिकवताना टेबला खालून त्यांचे (गुलाबी बेलबोट्म घातलेले) सुकडे पाय कायम समोरच्या बाकाला हवा घातल्या सारखे हलतात आणि दुसरं चित्रकलेच्या देखण्या नयन खेतान बाई. आलं लक्षात? नसेल तर एव्हढच सांगतो त्या काळात खेतानचा पंखा फार पॉपुलर होता. फारच गार गार हवा हो. अतिशय ए वन. असो.