वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.
खास प्लॅन करावं तसं स्वातीच्या वाढदिवसाला म्हंजे २१ फ्रेब्रुवारी २०११ ला म्हणून निघणार होतो. परंतु २४ फेब्रुवारी २०११ या जवळच्या तारखेला टूर निघणार होती. म्हणून आम्ही असेही खुशीतच होतो. परंतु २३ तारखेलाच म्हंजे निघायच्या आदल्या दिवशीच सगळीकडून फोन यायला, मेल यायला सुरुवात झाली. ख्राईस्टचर्चमध्ये भूकंप झाला. ५६२ माणसं मृत्युमुखी पडली. म्हणजे सर्व क्लीनबोल्डच की ! आम्ही ज्या ख्राईस्टचर्चला उतरणार होतो तो विमानतळ ३ दिवस बंद केला होता.
आईशप्पथ...सव्वा दहा झाले...आज पण बॉसचा ओरडा खावा लागणार. श्या.... मनगटावर असलेल्या घड्याळात नजर घालून कळवळीनं कपाळावर हात मारला, त्यात पण केसांतून तसाच हात फिरवण्याचा मोह नाही आवरला. झपाझप पाउलं टाकत रस्ता क्रॉस केला. आज आकाश मोकळं होतं. बऱ्याच दिवसांनी पाउस उघडला होता. “ह्या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं....” मनातल्या मनात दोष देत बिल्डींग खाली पोहोचलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. एकदम धडकीच भरली, लिफ्टने न जाता तड्क पायऱ्यांनी धावत सुटलो. धापा टाकत ऑफिस च्या बाहेर आलो. केसं, इन सावरत दरवाजा उघडून आंत शिरलो. माहौल शांत होता तसा. बॉस आपल्या केबिन मध्ये पेपरात डोके घालून बसला होता.
दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----
नमस्कार,
जी औषधे नेहमी थंड तपमानात ठेवावी लागतात अश्या औषधांकरता प्रवासात कोणती कूलर बॅग वापरावी? त्यात जास्तीत जास्त किती काळाकरता औषधे थंड राहू शकतात? आठ-दहा दिवसांच्या प्रवासाकरता जर मध्ये कुठेच फ्रिजची व्यवस्था नसेल तर कोणती कूलर बॅग वापरणे फायद्याचे आणि सोयीचे ठरेल? मी नेटवर शोधाशोध केली तर ३० तास कुलींगकरता आठ हजार रुपये वगैरे किंमतीच्या बॅगा उपलब्ध आहेत. तुम्हा कोणाला अश्या बॅगा वापरायचा अनुभव असेल तर तुमचे अनुभव जरूर मांडा.
अनेक धन्यवाद.
डिसेंबर आणि जानेवरी महिन्यात काही कामानिमित्त मुंबई आणि आसपासच्या परिसराचे दर्शन झाले होते. ह्या भटकंती दरम्यान आम्ही त्या प्रदेशातील छोटेखानी अश्या किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. जमिनीवर अथवा समुद्र किनारी असलेल्या ह्या किल्ल्यांनी आमच्या मनाला भुरळ घातली.
मुंबई शहरात सुद्धा असे छोटेखाणी किल्ले आहेत ह्याची प्रचिती जानेवारी मधील सेंट जॉर्ज किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून कळून आले आणि मग ध्यास लागला ह्यांच्या माहितीची जुळवा जुळव करण्याचा, ह्यांची एक भ्रमंती करण्याचा.
नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे?
नेहमीप्रमाणेच आज ही.... एक खास किस्सा, जास्त वेळ वाया न घालवता आज सरळ सुरुवात करतो.
नमस्कार मायबोलीकर, कसे आहेत सगळे?
मागील भागात मी स्टेशन वरचा किस्सा सांगितला होता, या भागात मी काही गमतीदार निरीक्षणं मांडणार आहे. मला खात्री आहे, तुम्ही जेव्हा कधी रस्त्याने प्रवास कराल तेव्हा अशी निरीक्षणं करून स्ट्रेस फ्री व्हाल, आणि हसाल.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.