माझा आधी कमलेश पाटील या नावाने आयडी होता तो ब्लॉक झाला आहे. मी परवलीचा शब्द मागायचा प्रयत्न केला तर मला हा इमेल अस्तित्वात नाही सां सांगीतलं जात. आणी त्याच इमेल ने नविन खातं उघडायला गेलं तर इमेल अस्तित्वात आहे म्हणून सांह्जां जात. मी जुन्या आयडीवर खूप लेखन केलं होतं.
संपादकांनी कृपया मदत करावी.
तर आता हा रिकामा ब्लॉक राहण्यायोग्य करायचा तर सुरुवात करायला हवी होती ती पहिले इंटरनेटकनेक्शन आणि झोपायला गादया. कारण भांडीकुंडी आणि रेशन तर आम्ही बॅगा भरभरून घेऊनच आलो होतो.
आजकाल जगायला हवा, पाणी, अन्न, निवारा आणि इंटरनेट लागतं.
अभिलाष टोमी, नाव ऐकलंयत?
नसेल तर थोडक्यात ओळख सांगतो:
कमांडर (निवृत्त) अभिलाष टोमी, भारतीय नौसेना, कीर्ति चक्र, नौसेना पदक.
"सिंगलहॅंडेड नॉनस्टॉप सर्कमनॅव्हिगेशन अंडर सेल" करणारा हा पहिला भारतीय. म्हणजे एकहाती विनाथांबा शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला भारतीय. नौसेनेत सेवारत असताना त्यानं हा भीमपराक्रम केला होता. त्यावेळी भारत सरकारने कीर्तीचक्र देऊन त्याचा सन्मान केला होता.
मायबोली सदस्य सस्मित यांच्या सख्ख्या भावाच्या डोक्याला मार बसल्या कारणाने ऑपरेशनसाठी पैश्यांची गरज आहे. काही पैसे त्यांनी जोडले आहेत. काही जोडायला मदत हवी आहे.
छोटीशी का होईना मदत करायची ईच्छा असल्यास संकोच बाळगू नका. कारण पैश्यापेक्षाही जास्त किंमत त्या वेळेला असते. Anonymously देखील मदत करायचा पर्याय आहे. आर्थिक मदत केल्यास ईथे नोंद करू शकता. किंवा त्यांना विपू वा संपर्कातून मेल करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांना किंवा मला व्हॉटसप मेसेज करू शकता. हा माझा व्हॉटसप नंबर आहे - 8425888364. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.
डिसेंबरची असली तरी दुपारी दीड-दोनची टळटळीत वेळ होती. निगडीच्या स्टॉपवर जवळपास सत्तर-ऐंशी लोकं तळेगाव-वडगावकडे जाणाऱ्या बसची वाट पहात होते. तिथे कोण नव्हते? शाळेच्या गणवेशातील मुलं होती, कॉलेजकुमार आणि कन्यका होत्या, आजी आजोबा होते. कुणी खरेदी करून परत चाललं होतं तर कुणी झाकलेली टोपली घेऊन विकायला चालले होते. पाठीवर दप्तरं होती तसेच लॅपटॉपच्या बॅगा होत्या. खांद्यावर बॅगा होत्या, हातात पिशव्या होत्या. डोळ्याला गॉगल होते, तर पांढरी काठी घेऊन एक अंध जोडपं ही होतं. गर्दी पाहून मी मागेच राहिलो होतो. जोडीला एक आजोबा होते. जसा जसा बसला उशीर होत होता, तशी गर्दी वाढत होती.
ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!
गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.
२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.
पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.
हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.
त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं. गेली 18 वर्ष वाटत पाहण्यात गेली होती, पण आता प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आलेला होता.
आज सकाळी माझ्या काकांचा फोन आला होता. वय वर्षे ८०, व्यवसाय - शिक्षक. मी 'निवृत्त' असं लिहिलं नाही, कारण हाडाचा शिक्षक कधीच रिटायर होत नाही! कोरोना, मुलांची ऑनलाईन शाळा, त्याचे फायदे-तोटे अशी चर्चा ठराविक वळणं घेत घेत मुलांचं वाचन, मराठी पुस्तकं, आणि मुलांसाठीची मासिकं या विषयावर आली. मग उजळणी झाली ती चांदोबा, आनंद, अमृत, मुलांचे मासिक (हे आजही बहुधा नागपूरहून प्रकाशित होतं) यांच्या आठवणी! त्यांना किशोर हे मासिक फारसं माहिती नव्हतं याचं मला जरा आश्चर्य वाटलं. पण या मासिकांच्या उल्लेखामुळे आठवणी जाग्या झाल्या आणि उसंडु, मुरावि यांच्या आठवणींनी आम्ही दोघेही मनमुराद हसलो!
काही गोष्टी लिहिल्या जात नाहीत. काही रहस्ये आपण आपल्यासोबत घेऊनच ईहलोकाचा रस्ता धरतो. बरेचदा झाकली मूठच सव्वा लाखाची असते. पण कधी कधी आपल्या लोकांचा पराकोटीचा आग्रह मोडवत नाही, आणि ती गुपिते उलगडायला भाग पाडतो.
अशीच एक कथा, जी दंतकथा म्हणून आजही दक्षिण मुंबईत प्रसिद्ध आहे. आज मी जो सांगणार आहे, हा तोच मायबोलीप्रसिद्ध किस्सा आहे. जो तुम्ही ईथे तिथे फुटकळ प्रतिसादात ऐकला असेल. किस्सा ए माझगाव-डोंगर जाळण्याचा!.. वाचा आणि विसरा. किंवा कवटाळून बसा. पण या मायबोलीच्या चार भिंतीबाहेर जाऊ देऊ नका.
------------------------------------------------
न अब मंज़िल है कोई
न कोई रास्ता है..
मध्यंतरी आकाशवाणी विषयीच्या आठवणींची एक पोस्ट व्हॉट्सॅप वर फिरत होती. मला ती खूप भावली! क्रिकेट कसोटी चालू असताना कानाला ट्रॅन्झिस्टर लावून फिरायच्या काळातला मी माणूस, कदाचित त्याच काळात रमलेला. या अनेक वर्षांच्या साहचर्यात किती असे प्रसंग आले आहेत, की आकाशवाणीने दिन सुहाना केलाय, वा रातें जवां केली आहेत. पण कधी कधी हे नातं या ही पलिकडे जातं. अंतर्मनाला स्पर्श करणारी एक माझ्या आयुष्यातली घटना सांगतो.