राजकारण

ठाणे महानगर पालिका आणि तिचे खाबुगीरीचे नवे फंडे

Submitted by अभि१ on 21 May, 2014 - 09:19

आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते. त्यामुळे माती रस्त्यवर येत नाही.

Narendra Bhai Modi yanche abhinadan

Submitted by Babaji on 20 May, 2014 - 10:43

Narendra Bhai Modini aaj sansadela dandawat ghatala ani aplya rajyachi suruwat keli. He adhi kunalach kasa suchale nahee ? Sansadet aaj te radale. Bhavuk jhale. pahilch diwas hota. sagale bhavuk jhale. ha kshan dolyat panee ananara tharala. I am not Bhajapeyee, but became fan of this man. I am confidant that He will do everything, he promised. Great beginning.
khup bolawese vatate, pan itakech.

विषय: 
प्रांत/गाव: 

नवे सरकार - नवे मंत्रीमंडळ

Submitted by हायझेनबर्ग on 16 May, 2014 - 10:00

निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!

तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?

घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?

लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?

विषय: 

केंद्रातील सत्तापालट

Submitted by बेफ़िकीर on 16 May, 2014 - 08:09

मोदी सरकार आलेले आहे. तळागाळात पोचलेल्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहणार्‍या आणि प्रत्यक्षात सत्ता प्राप्त करू न शकणार्‍या भाजपला ह्यावेळी मतदारांनी सुस्पष्ट बहुमत प्रदान केलेले आहे.

विषय: 

निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय

निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

विषय: 

इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन श्री नितीन गडकरी यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2014 - 02:20

Nitin Gadkari.jpg

आत्ताच झी न्युजवर आणखी एक बातमी झळकली. आर.टी.आय कार्यकर्ते श्री सुमीत दलाल यांनी आर.टी.आय या अतर्गत श्री नितीन गडकरी यांची चौकशी प्रल्ंबित आहे का असा माहितीचा अर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये केला होता.

या संदर्भात आपला अर्ज बाद करण्यात आला आहे असे इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन कळवण्यात आले. हा अर्ज का बाद केला याचा खुलास इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन केले गेला नाही.

प्रांत/गाव: 

हट्टीपणाचे फळ

Submitted by किशोरडी on 8 May, 2014 - 06:50

महेश आणि रमेश दोघे भाउ - भाउ. महेश लहानपणापासुनच मस्तीखोर तर रमेश शांतवृत्तीचा. महेश चाड्या करायचा खोटे बोलायचा, मिर्चमसाला लावुन इकडच्या गोष्टी तिकडे करायचा. कोणाचे काही गुपीत असेल तर मुद्दामुन सगळ्यांसमोर मोठ्याने सांगायचा. वर मी काही केलेच नाही अश्या निर्विकार चेहर्‍याने सोसायटीत फिरायचा.

विषय: 

इशरत प्रकरणात अमित शहा यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 7 May, 2014 - 06:07

AMIT SHAH 2.jpg

२६ मार्च २०१४ रोजीची महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली ही बातमी व त्याची खालील लिंक पहा

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Ishrat-case-Court-grants-t...

महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, बाबू लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान .

Submitted by अभि१ on 5 May, 2014 - 03:55

नुकताच १ मे महाराष्ट्र दिन होऊन गेला. इथल्या सरकारला किवा मुख्य करून बाबू लोकांना (जे खरे राज्य चालवतात ) काहीही पडली नाहीये . महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान . मी काही उदा देत आहे . आपण पण इथे द्यावीत. बघूया किती स्कोर होतो तो .

१. सह्याद्री चानेल वर पंतप्रधान ऐवजी मुद्दाम वापरण्यात येणारा हिंदी शब्द - प्रधानमंत्री !!

Pages

Subscribe to RSS - राजकारण