राजकारण

तोंडी परीक्षा

Submitted by सौरभ.. on 29 January, 2014 - 00:00

मम्मा - चला..उठा...सकाळ झाली...
बेटा - फक्त पाचच मिनिट झोपु दे ना आई..please...
मम्मा - अरे उशीर झालाय...आज तोंडी परिक्षा आहे ना एकाची ?
बेटा - ह्म्म...झोपु दे ना...काल जागलोय... खुप तयारी करत...
मम्मा - अरे वा ! शहाणं माझं बाळ ते...किती मेहेनत करतयं...सगळी तयारी झाली ना नीट ? मी सांगितलेले पाच मुद्दे नीट पाठ केलेस ना ?
बेटा - हो मम्मा..नीट पाठ केलेत...पण मला भीती वाटतेय..
मम्मा - कसली भिती वाटतेय माझ्या राजाला ?
बेटा - तोंडी परिक्षेची..पहिलीच आहे ना...
मम्मा - घाबरायच काय त्यात...नीट पाठांतर झालं आसेल की झालं

विषय: 

'आप'कडे धाव कशासाठी?

Submitted by विजय देशमुख on 9 January, 2014 - 21:22

वर्षाच्या सुरुवातीला 'आप' पक्षाने पुन्हा एकदा आपचे कार्यकर्ता व्हा म्हणत नोंदणी सुरु केली आहे. या नोंदणीला आता केवळ दिल्लीतच नव्हे तर इतरत्रही चांगला प्रतिसाद मिळतोय. मोठमोठ्या पदावरुन राजीनामा देऊन काही लोकं आप पक्षात प्रवेश करत आहेत. इतर पक्षातले {नाराज, किंवा तिकिट मिळणारच नाही, असं गृहित धरलेले किंवा संधीच मिळत नाही म्हणणारे} राजकीय नेतेही आप कडे वाट करु लागले आहेत.

विषय: 

करांची कटकट कमी होईल का?

Submitted by विजय देशमुख on 6 January, 2014 - 22:23

कर देणे हे जवळपास प्रत्येकालाच कटकट वाटत असावी. त्यात फक्त कर-कन्सल्टंटच फक्त अपवाद असावा. Happy
माझ्या मते, त्यात करांच्या कटकटी जास्त आणि फॉर्मस, वेगवेगळे कलमं यामुळे जास्तच त्रासदायक वाटतो. ज्याला कर प्रणाली समजते, कदाचित त्यांना ते सोपं वाटत असावं.
नुकतच रामदेव बाबांनी कर प्रणाली संपवा (किंवा सोपी करा) असं म्हटलं. त्यावरुन काही प्रश्न डोक्यात आले. मला अर्थकारणातलं काहीच कळत नाही, त्यामुळे अधिक सोपं करुन लिहिलं तर उत्तमच.
१. एकाच प्रकारचा किंवा कमीतकमी प्रकारचे कर असावे, हे योग्य आहे का?
२. वॅट चा उगम हाच होता ना? त्यातही एका वस्तूवर एक तर दुसर्‍यावर दुसरा % आहे ना?

मतदार नोंदणी, गुगल, सुरक्षा

Submitted by स्वाती२ on 5 January, 2014 - 10:40

आज टाईम्स ऑफ इंडीयातील
http://timesofindia.indiatimes.com/india/Security-fears-over-Election-Co...
ही बातमी वाचली. मतदार नोंदणीचे काम गुगल या कंपनीला दिल्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयाच्या बर्‍या-वाईट परीणामांबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 

भ्रामक मायाजाल

Submitted by Mandar Katre on 1 January, 2014 - 20:37

नुकत्याच दोन बातम्या आल्या

साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_...

2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha...

विषय: 

तेथे पाहिजे ........

Submitted by विजय देशमुख on 26 December, 2013 - 04:13

"काय चाललय काय?"
"साहेब पण..."
"चुप... एकदम चुप..."
".........."
"निवडणुका आल्या, लोकं तोंडात शेण घालतील ना..."
"हो? पण दादा, ते कधी ठरलं........"
"अबे xxxx ती म्हण आहे, पण तुमच्यासारखे डुकरं असतील ना सोबत, तर तेही होईल असं दिसतय"
"दादा... आता मला काय माहित, तो वेळेवर गडबड करेल म्हणुन..."
"मुर्खा, xxxxxx शाई ओतायची कशी हे ही समजत नाही का त्या बह्याडाले"
"दादा, फस्ट टाईम होता ना..."
"मग काय प्रॅक्टिस करायला पाहिजे होती का?"
"दादा, तो घेंगल्या निघाला...."
"अबे शाईची बॉटल आधीच फोडुन नाही ठेवायची का? तो तिथं फोडुन राह्यला..."
"ते चुकलच...."
"अन ते बुटवाल्याचं काय?"

विषय: 

अरविंद केजरीवाल

Submitted by अभय आर्वीकर on 18 December, 2013 - 11:51

मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाईलमध्ये एक "महात्मा" दिसत आहे.
ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. Happy

तुम्हाला काय वाटते?

विषय: 

अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

शेपटावर निभावले - दिल्ली निवडणुकांचे निकाल

Submitted by pkarandikar50 on 10 December, 2013 - 05:13

शेपटावर निभावलं! [दिल्ली राज्य निवडणुकांचे निकाल]

विषय: 

दिल्लीत आता काय घडेल ? ( बदलुन )

Submitted by नितीनचंद्र on 8 December, 2013 - 23:44

दिल्लीचे बलाबल या प्रमाणे

एकुण जागा ७०

बहुमताला आवश्यक ३६

भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.

अपक्ष २

पर्याय उपलब्ध्द

१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.

२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )

३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण