राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ - मतदान

Submitted by भरत. on 19 November, 2024 - 20:58

मतदान केलंत का? त्याबद्दलचे अनुभव लिहिण्यासाठी हा धागा.

ज्यांना मतदार माहिती चिठ्ठ्या मिळाल्या नसतील, ते https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर आपल्या मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे शोधू शकतीत.
मतदान केंद्राचा पत्ता, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक ही माहिती गरजेची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन!!!

Submitted by मोरोबा on 6 November, 2024 - 05:49

निश्चयाचा महामेरू। पॅट्रियटांसी आधारू।
मागाशक्तीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

हाउसपति सिनेटपति । इलेक्टोरल कॉलेजपति।
पॉप्युलर आणि व्होटपति। सकलही स्विंग स्टेट।।

कमलाहर मेलनियावर। शूरवीर अल्फा नर।
सावधपणे लिबरल। तुच्छ केले।।

लिबरलमीडिया नीच। डेमॉक्रॅट उन्मत्त।
नमविले सकलही। ग्रॅबुनिया पुX।।

गन गर्भ अधिकार। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला अंकलसॅम। प्रेरणा केली।।

या अम्रिकेचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
रिपब्लिकनधर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।

विषय: 

विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 

राजकोट शिव पुतळ्याच्या निमीत्ताने

Submitted by दुर्गविहारी on 2 September, 2024 - 15:51

शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६६४ कोकण स्वारीत मालवण बंदराच्या समुद्रात कुरटे बेट हेरले आणि इथली जागा हेरून त्यांनी इथे जलदुर्ग उभारण्याची योजना केली. मोरयाचा धोंड्यावर भुमिपुजन करुन जलदुर्गाची उभारणी सुरु झाली. दरम्यान शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाउन कैदेत अडकले, मात्र सिंधुदुर्गाच्या उभारणीचे काम थांबले नाही. पुढे सिंधुदुर्ग पुर्ण झाला. इतक्या महत्वाच्या पाणकोटाचे संरक्षण म्हणून त्याचे उपदुर्ग म्हणून राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड असे तीन जलदुर्ग उभारले. यापैकी एक राजकोट मालवण किनार्यावर आहे.

विषय: 

पराभव डोळ्यासमोर दिसताच बहिण भाऊ लाडके झाले पर माय बाच काय?

Submitted by ashokkabade67@g... on 18 July, 2024 - 02:01

लोकसभेत महाराष्ट्रात युती सरकारला लोकसभेत शर्मनाक हार पत्करावी लागली आणि आजही युतीला पराभव डोळ्यासमोर दिसत असतांना निवडणूक तीन महिण्यावर असतांना महाराष्ट्र सरकारला अचानक जाग आली आणि बहिण भावांची आठवण होत लाडकी बहिण लाडक्या भावांना रेवडी वाटप सुरु झाल पण साठ वर्षावरील माय बाच काय ? खरे गरजू ते आहेत अनेकांना ना मोदींच राशन भेटत ना योजनांचा फायदा त्यांची वय संपत आली पण भाकरीसाठी असलेली लढाई सुरुच आहे .

अर्थ संकल्प की निवडणूक जाहिरनामा

Submitted by ashokkabade67@g... on 29 June, 2024 - 11:22

काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री असलेल्या अजीत पवारांनी युतीसरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला लोकसभा निवडणुकीत युतीन सपाटून मार खाल्ल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीतही युतीला यशाची खात्री नसल्याने लोकानुनय करणारा अर्थ संकल्प असेल हे माहीतच होत म्हणून या अर्थसंकल्पात आश्वासनांची गाजर दाखवली गेली पण ती सर्व समावेशक जनतेला नाही तर फक्त एका वर्गाला खुष करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे.

विषय: 

२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

महायुतीला अजीत पवार नकोसे झालेत काय?

Submitted by ashokkabade67@g... on 20 June, 2024 - 13:43

लोकसभा निवडणुकाआधी महायुतीला हवेहवेसे वाटणारे अजीतदादा निवडणूक निकाला नंतर नकोनकोसे झालेत तशी धुसफुस आधीच सुरु होती कारण बहुमत असतांनाही अजीत पवारांना पक्ष चिन्ह व आमदारांसहीत आयात करणे शींदे गटाला रुचणारे नव्हते कारण त्यांची मंत्रीपदे कमी होणार होती व ती झालीही फडणवीस कितीही म्हणत असले की मी आलो पण दोन पक्ष फोडुन आलो तरीही ते सत्य कधीच नव्हते हे महान कार्य करणारे होते ते मोदी आणि शहा कारण संघासह या दोघांनाही पराभवाची जाणीव निवडणुकीपुर्वीच झाली होती आणि शींदेच्या ताकदीचीही शींदेच्या भरोश्यावर 45 पार तर सोडाच पण दहा जागाही जींकणे अशक्य आहे हे लक्षात येताच भाजपने अजीत पवारांना आयात करण्याचे

पवारसाहेबी बखर

Submitted by संप्रति१ on 13 June, 2024 - 00:40

.
ये समयी दिवस कष्टाचे आले. पातशाही उन्मत्त जाली. पैका बहु मेळविला. ते कारणे पातशाहा चौखूर उधळिले. खराबी बहुत केली. कारभाराचे धोरण योग्य नाही. बेरोजगारी मातली. पिकांस मोल नाही. सर्वांस पोटांस लावणे हा तो राजधर्म. पातशहा राजधर्म पाळित नाहीत. माणसामाणसांत भेद करतात.

तेसमयी म-हाट देशी काका पुतण्यांत जोरदार बिघाड जाला. दादासाहेब मीच कारभार करितो असे हटास धरून बैसले. रूसोन पातशाहीत निघोन गेले. लेकरू समजून वाढविले. प्रतिपाळ केला. ऐसे दादा निघोन गेले. उघड दावा मांडिला. घरची उणीदुणी बाहेर काढिली. गनिम बोलला नाही ते दादा बोलिले. हे बरे जाले नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण