मतदान केलंत का? त्याबद्दलचे अनुभव लिहिण्यासाठी हा धागा.
ज्यांना मतदार माहिती चिठ्ठ्या मिळाल्या नसतील, ते https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर आपल्या मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे शोधू शकतीत.
मतदान केंद्राचा पत्ता, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक ही माहिती गरजेची आहे.
निश्चयाचा महामेरू। पॅट्रियटांसी आधारू।
मागाशक्तीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।
हाउसपति सिनेटपति । इलेक्टोरल कॉलेजपति।
पॉप्युलर आणि व्होटपति। सकलही स्विंग स्टेट।।
कमलाहर मेलनियावर। शूरवीर अल्फा नर।
सावधपणे लिबरल। तुच्छ केले।।
लिबरलमीडिया नीच। डेमॉक्रॅट उन्मत्त।
नमविले सकलही। ग्रॅबुनिया पुX।।
गन गर्भ अधिकार। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला अंकलसॅम। प्रेरणा केली।।
या अम्रिकेचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
रिपब्लिकनधर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६६४ कोकण स्वारीत मालवण बंदराच्या समुद्रात कुरटे बेट हेरले आणि इथली जागा हेरून त्यांनी इथे जलदुर्ग उभारण्याची योजना केली. मोरयाचा धोंड्यावर भुमिपुजन करुन जलदुर्गाची उभारणी सुरु झाली. दरम्यान शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाउन कैदेत अडकले, मात्र सिंधुदुर्गाच्या उभारणीचे काम थांबले नाही. पुढे सिंधुदुर्ग पुर्ण झाला. इतक्या महत्वाच्या पाणकोटाचे संरक्षण म्हणून त्याचे उपदुर्ग म्हणून राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड असे तीन जलदुर्ग उभारले. यापैकी एक राजकोट मालवण किनार्यावर आहे.
काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री असलेल्या अजीत पवारांनी युतीसरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला लोकसभा निवडणुकीत युतीन सपाटून मार खाल्ल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीतही युतीला यशाची खात्री नसल्याने लोकानुनय करणारा अर्थ संकल्प असेल हे माहीतच होत म्हणून या अर्थसंकल्पात आश्वासनांची गाजर दाखवली गेली पण ती सर्व समावेशक जनतेला नाही तर फक्त एका वर्गाला खुष करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे.
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

१.
ये समयी दिवस कष्टाचे आले. पातशाही उन्मत्त जाली. पैका बहु मेळविला. ते कारणे पातशाहा चौखूर उधळिले. खराबी बहुत केली. कारभाराचे धोरण योग्य नाही. बेरोजगारी मातली. पिकांस मोल नाही. सर्वांस पोटांस लावणे हा तो राजधर्म. पातशहा राजधर्म पाळित नाहीत. माणसामाणसांत भेद करतात.
तेसमयी म-हाट देशी काका पुतण्यांत जोरदार बिघाड जाला. दादासाहेब मीच कारभार करितो असे हटास धरून बैसले. रूसोन पातशाहीत निघोन गेले. लेकरू समजून वाढविले. प्रतिपाळ केला. ऐसे दादा निघोन गेले. उघड दावा मांडिला. घरची उणीदुणी बाहेर काढिली. गनिम बोलला नाही ते दादा बोलिले. हे बरे जाले नाही.