राजकारण

हिंदी का?

Submitted by केअशु on 11 April, 2022 - 09:37

तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-diff...

फ्रेंच राष्ट्रपतींचा प्रासाद

Submitted by पराग१२२६३ on 8 April, 2022 - 04:34

पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते.

आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

ईतना सन्नाटा क्यों है भाई ?

Submitted by ashokkabade67@g... on 22 March, 2022 - 05:29

।।राजकारण भारतात।।या ग्रुपमधे सध्या शिमगा संपला तरी बोंबाबोंब नाही झाली तिकडे प्रत्यक्ष राजकारणात रोजच शिमगा चालू आहे पण मायबोलीकरांची नाशिमगा ना बोबांबोंब काय राजकारणातून सन्यास घेतला कु काय ।सहज आठवण आली म्हणून इचारल बाकी समदी ठीक हाय ना ।

मध्य आशियाशी घनिष्ठ संबंध

Submitted by पराग१२२६३ on 30 January, 2022 - 02:51

27 जानेवारी 20222 रोजी तिसरी भारत-मध्य आशिया परिषद (India-Central Asia Summit) पार पडली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मध्य आशियातील पाचही देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते. पण या काळातच भारतासह अन्य देशांमध्ये वाढलेल्या Omicron संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्या नेत्यांचा भारत दौरा रद्द करावा लागला होता. त्यामुळे आधी नवी दिल्लीमध्ये पार पडणार असलेली ही परिषद व्हिडिओ काँफरंसिंगद्वारे आयोजित करण्यात आली.

कझाखस्तानमधील अशांतता

Submitted by पराग१२२६३ on 14 January, 2022 - 12:46
कझाकस्तान Kazakh unrest

कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले.

आंदोलनजीवींनी उन्मत्त सत्ताजीवींना शरण आणले

Submitted by ashokkabade67@g... on 30 November, 2021 - 12:58

छप्पन ईंच छाती ,एकदा घेतलेला निर्णय कधीच माघारी न घेणारा नेता अशी भ्रामक प्रतिमा मीडियाच्या सहाय्याने भक्तांच्या मनात जोपासणारा नेता आपला पराभव डोळ्यासमोर दिसताच कणखरपणाचे घातलेले खोटे कवच फेकून देत राष्ट्रीय एकात्मता ,तपस्या ,माफी आदी शब्दांचा फुलोरा पसरवत अक्षरशः भक्तांचा भ्रमनिरस करत शेतकरी कायदे परत घेऊन पराभव पत्करतो तेंव्हा आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिनवणारा नेताही फक्त आणि फक्त सत्ताजीवी ठरतो।आपणास जनतेने बहुमत दिलेल्या म्हणजे मी म्हणेल ते सारेच जनतेने मान्य करायला हवे विरोध करणारे सारेच देशद्रोही आहेत अस समजणाऱ्या आणि स्वताला देशाचा महान क्रांतिकारी ने

विषय: 

कंगना राणावत चे वादग्रस्त विधान..

Submitted by सचिन पगारे on 30 November, 2021 - 10:40

येड्यांची जत्रा हा चित्रपट बघत होतो तितक्यात मित्र आले गप्पा सुरु झाल्या . चित्रपट बदलून न्युज् चॅनेल लावले त्यात
कंगणा रणावात ह्या नटीने केलेल्या स्वातंत्र्याबाबतच्या विधानावर चर्चा सुरु होती.

कंगणा रणावात ही नटी आपल्या रोखठोक वा फटकळ वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ऋतिक रोशन बरोबरचा वाद असो वा आमच्या मुंबईला pok मगण्याबद्दलचा वाद असो ती नेहमी येणकेन प्रकारे चर्चेत असते. सध्या ती नेहरू , महात्मा गांधीजी कसे चुकीचे होते, त्यांनी काय करायला हवे होते यावर आपले दैदिप्यमान विचार मांडत असते.

विषय: 

अशांत भारत-चीन सिमा: ड्रॅगनला कसे रोखायचे?

Submitted by उदय on 14 November, 2021 - 22:06

ऑक्टोबरच्या सुरवातीला एका बातमीने लक्ष वेधले होते. भारत-चीन दरम्यान सुरु असलेल्या military -to -military (M-to-M) वाटाघाटींची तेरावी फेरी कुठलाही ठोस निर्णय न घेता समाप्त झाली.
https://indianexpress.com/article/india/lac-talks-end-in-stalemate-chine...

विषय: 

ऑस्ट्रेलिया-ब्रिटन-अमेरिका म्हणजेच ऑकस

Submitted by पराग१२२६३ on 25 September, 2021 - 00:46

अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकतीच नव्या त्रिपक्षीय ऑकस संधीची (AUKUS PACT) अचानक घोषणा केली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 2016 मध्ये फ्रांसबरोबर झालेला पाणबुड्या खरेदीचा करार रद्द केला असून आता तो अमेरिकेकडून अणुपाणबुड्या खरेदी करणार असल्याही घोषणा केली आहे. ऑकस या लष्करी संधीद्वारे अमेरिका ऑस्ट्रेलियाला 12 हल्लेखोर अणुपाणबुड्या विकणार आहे. हा व्यवहार सुमारे 90 अब्ज अमेरिकन डॉलरचा असणार आहे. हे सर्व निर्णय आपल्याला अंधारात ठेवून अचानक घेतले गेले असल्याचे सांगत पॅरिसहून त्या नव्या संधीविरोधात तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली गेली आहे.

Pages

Subscribe to RSS - राजकारण