नुकताच कोर्टाचा निकाल लागला,राजपाल खोश्यारी पण योग्य वेळी दुसरी कडे गेले ,संजय राऊत पण यीग्य वेळी सुटले
पण एक गोष्ट
कोर्टाच्या निकालात दोन्ही बाजूंचा इगो साम्ह्लाला आहे ,हे पण म्हटले आहे कि आम्ही घड्याळ्याचे काटे फिरवू शकत नाही
पण मग फेर निवडणूक का नको?
हा मुद्दा मला दिसला नाही
दिसल्यास दाखवावे
काल दोन हजाराच्या नोटा बंद करायच आरबिआयन सांगितल नी गावच्या पारावर गन्या म्हनला ज्या अर्थ शास्त्रज्ञांनी नोटबंदीच समर्थन केलत नी दोनहजाराच्या नोटाच फायदे जनतेला सांगितल त्या समद्यास्नी नागपुरले बलिवल हाय नी त्यायले जनतेले दोन हजाराच्या नोटेमुळे व्हनारे तोटे नी ती बंद केल्यान व्हनारे फायदे जनतेले सांगायच प्रशिक्षण देनार हाय त्यासाठी प्रशिक्षण वर्ग ठेवलाय नी भाड्यातोड्या सकट जेवनखावन फुकट हाय तवा आपल्या सरपंचाले धाडायच का नोटबंदीच्या येळेला त्यो लयच फायदे सिंगत व्हता नी दोन हजाराच्या नोटाच फायदेभी तवा द्याव धाडुन
श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.
एप्रिल २०२३ मधे, भारताच्या लोकसंख्येने आकडेवारित चीनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला असे विविध बातम्यांत प्रसिद्ध झाले आहे. आज जगामधे सर्वात मोठी लोकांची संख्या भारतात आहे. या बातमीने आपण आनंदी व्हायला हवे का एव्हढ्या मोठ्या लोकांच्या संख्येसाठी अन्न, वस्त्र , निवारा, रोजगार यांच्या काळजीने गंभिर व्हायला हवे? दोन्हीही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रसिद्धी माध्यमांतून प्रसारीत झालेल्या या बातमीला आधार आहे भारताने २०११ मधे घेतलेल्या जनगणनेचा.
साहेबांचा अध्यक्षपदाचा राजिनामा....!
तशी अनपेक्षित अन वादळी बातमी. नव्या पर्वाला सुरुवात?
भाकरी फिरवून झाली की फिरवणे सुरु झाली?
म.वि.आ. : असून अडचण नसून खोळंबा
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन वर्षात राजकारण प्रेमींना धक्क्यावर, धक्के बसण्याचा कालावधी होता.. शिवसेनेने सोडलेली बीजेपीची साथ, म वि आ ची निर्मिती, शिंदेच् बंड, गुवाहाटी, गुजरात, गोवा ह्या राज्यात घेतलेला आश्रय, ठरेंचा राजीनामा, म वि आ चे सरकार पडणे, शिंदे फडणवीस सरकार येणे, फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणे, निवडणूक आयोगा कडून शिंदे कडे शिवसेना देणे. बऱ्याच घडामोडी अजून घडणार आहेत. ह्या घटनाचं इतक्या अनाकलनीय होत्या की एकही राजकीय ज्योतिषी तोंड उघडायला तयार नाही . आपली झाकली मुठ सव्वा लाखाची बरी.
21 फेब्रुवारी 2023 ला रशियन राष्ट्रपती व्लदिमीर पुतीन यांनी जाहीर केलं की, रशिया नव्या व्यूहात्मक अस्त्र कपात संधीमधला (New START) आपला सहभाग संस्थगित करत आहे. सध्याच्या परिस्थितीत पाश्चात्यांचा रशियाबाबत असलेला दृष्टिकोन विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचं राष्ट्रपती पुतीन यांनी म्हटलं आहे.