हा चित्रपट मी खुप आधी दुरदर्शनवर पाहिला होता एका पावसाळी शनिवारी, काल असाच एक शनिवार होता अन मुख्य म्हणजे मी बंगालात होतो, तेव्हा हा नितांतसुन्दर प्लॉट परत आठवला, मी हा प्रयत्न फ़क्त त्या कलाकृतीच्या आठवणी जागवायच्या म्हणुन करतोय, पात्रांची नावे, अभिनेत्यांची नावे, अगदी फ़िल्म चे नाव हि मला आठवत नाहिए पण कथा पुसटशी आठवते आहे, तिची मागे केलेल्या “बुल दे सुफ़” अन “ दगडाच्या सुप सारखी ही एक भावनिक पुनर्बांधणी, कशी वाटते नक्की सांगा”
तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत
आपण एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो . असेच एक सुराज्याचे स्वप्न आई जीजाऊने पहिले 'श्रीमंतयोगी "शिवरायांच्या रूपाने साकार केले ... या स्वप्न पूर्तीसाठी त्यांना साथ लाभली ती या निष्ठावंत आणि उभ्या सह्याद्रीची …
पण आज त्यांचे सुवर्ण स्वप्नाची अनास्था आपण उघड्या डोळ्याने पाहत आलो , ज्यांच्या अंगाखांदयावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमाचे रक्त वाहिले त्यांची अवस्था काय आहे आज ? त्यांच्या चिरा चीर्यातून मदतीची आर्त आपणास का ऐकू येत नाही ??
कैच्याकै आहे सगळंच.
फुलं, पानं, फांद्या, रस्ते, घरं.... सगळंच कसं दमट, ओलसर...
सादळलेला एक-एक अणू, अन् प्रत्येक काच थोडी धुसर!
हवा कोंदट, माती भिजकट, वारा हलकट!
मृद्गंध अगदिच बिचारा वगैरे... दबकून लपलेला मातीच्याच श्वासांत...
अन् त्यावर वरचढ झालेला आंबट कचर्यााचा वास कुजकट!
कणाकणात... क्षणाक्षणात... बाहेर आणि आतही...
उगाच भरून राहिलाय तो केंव्हाचा.
अधांतरी तरंगतो आहे. बरसत नाही. झिरपत नाही.
सगळ्याच नियमांना कंटाळल्यासारखा... स्वत:लाच वैतागल्यासारखा...
प्रवाहीपणाचं एकूणच गृहीतक चक्क चक्क फेटाळल्यासारखा...
उदास असल्यासारखा अन् तेही मान्य असल्यासारखा!
तो साचून राहिला आहे.
हे पान हलेनासे का झाले आहे
हे गूढ कळेनासे का झाले आहे
फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे
डोळ्यांत तुझ्याही इच्छा धूसर धूसर
काहीच दिसेनासे का झाले आहे
प्रेमात निखरले एके प्रतिमेचेपण
हे रंग विटेनासे का झाले आहे
हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे
"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."
"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."
"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."
एखादी व्यक्ती जन्माला येते ती कलाकार बनूनच. असेच एक म्हणजे विश्वनाथ राघो पाटील उर्फ नाना!
नानांचा जन्म पनवेल तालुक्यातील उलवे ह्या गावातील एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. नानांना चार भाऊ. पण शिकण्याची आवड किंवा कला ही फक्त नानांमध्येच होती म्हणून गरीब परिस्थितीतही त्यांनी दहावी पर्यंत शिक्षणाची मजल मारली. शाळेतील पौराणिक नाटकांत नाना हिरीरीने भाग घ्यायचे. त्यात कधी राम तर कधी हनुमंताची वेषभूषा परिधान करून ते आपली भूमिका गाजवायचे. नानांच्या नकला करण्याने ते पात्र स्टेजवर जिवंत उभे राहत असे व टाळ्यांच्या गडगडाटात नानांचे अभिनंदन होत असे.
रंग्याने त्याच्या दप्तरातून सतरंजीची पट्टी बाहेर काढली आणि भिंतीच्या बाजुला बसलेल्या एका पोरावर खेकसला...
"ए जाड्या, सर तिकडं. माझी जागा हाये ही. "
तसं ते पोरगं बाजूला सरकलं आणि रंग्याने आपली सतरंजी (पट्टी) तिथे अंथरली. अर्ध्या पट्टीवर स्वतः बसत, डोळ्यानीच मला पण बसायला सांगितलं. मी जरा घाबरतच खाली बसलो.....