लेखन

विषय क्रमांक २ - आदूस ...

Submitted by तुमचा अभिषेक on 5 July, 2014 - 04:53

तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच!

*****

आदूस ! एकेकाळचा आमचा आदू मामा ..

विषय: 

बाबा

Submitted by लाल्या on 5 July, 2014 - 04:45

नोंद - १४ जानेवारी २०११ ला लिहिलेला हा लेख इथे पुन्हा सादर करतोय. याच दिवशी ज्येष्ठ अभिनेते श्रि. प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं. त्यांच्याबरोबरच्या काही आठवणी!प्रतिक्रिया जरूर द्या!

विषय: 

विषय क्रमांक - २ - 'स्वामी उर्फ अवधुतानंद उर्फ धुम्रानंद'

Submitted by कविता१९७८ on 4 July, 2014 - 15:02

मला एकदा आमच्या फॅमीली डॉक्टरांनी गो.नी.दांडेकरांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा" हे पुस्तक वाचायला दिलं होतं , एका नर्मदा परीक्रमावासीच्या प्रवास वर्णन मला खुपच आवडले , वास्तविक अध्यात्म ह्या विषयापासुन मी खुप

विषय: 

लेखन क्रमांक - २ - विनीत मोडक

Submitted by समीर परान्ज्पे on 4 July, 2014 - 09:39

विनीत मोडक

एके दिवशी संध्याकाळी निवांत घरी बसलो होतो. नव्या वर्षाचा उपक्रम ठरवला होता कि निवांत वेळी उगीच परत परत फेसबुक आणि whatsapp बघत बसायचे नाही, जी कामे बरेच दिवस करायची राहून गेली आहेत ती लवकरात लवकर संपवण्याचा निर्धारही केला होता. सकाळपासून आत्तापर्यंत पहिला फेसबुकचा उपक्रम तरी अमलात आणला गेला होता. तेवढ्यात आठवलं कि अरे बरेच दिवसांपासून मला वरचा माळा साफ करायचा आहे. आज करू उद्या करू असे म्हणत म्हणत ६ महिने होऊन गेलेत. आता हे काम आजच करावे असा बेत होता. अर्थात हि योजना प्रत्यक्षात अमलात आणणे तितकेच कठीण आहे हे हळू हळू माझ्या लक्षात येऊ लागले.

विषय: 

नवा पाऊस

Submitted by चाऊ on 3 July, 2014 - 02:12

आज नवा पाऊस आलाय
आता तुझा फोन येईल
बोलू आपण बरच काही
रोजच्याच गोष्टी,
रोजचच जगणं, जिंकणं, हरणं,

कोठेही पावसाचा उल्लेख न करता
उरात भरलेला मातीचा गंध लपवत
थंड वा-यानं अंगावर फुललेला काटा
मनात उठणारी ढगांची सावळ संध्या
आणी आपल्या दुराव्याची कळ सोसत

एक शब्द ही नसेल जवळिकेचा
दडवलेला सल, न भेटण्याचा,
तरीही
ओल्या स्पर्शाची फुलं
उबदार श्वासाची भूल
आणी डोळ्यातली ओल
पोहोचवील मेघदूत तूझ्यापर्यंत
शब्दांमधल्या निश:ब्दतेमधून

शब्दखुणा: 

तू गेल्यावर.....!!

Submitted by दुसरबीडकर on 2 July, 2014 - 12:01

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

आय अ‍ॅन्ड मी: भाग ७

Submitted by चैर on 2 July, 2014 - 03:46

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

आज दुपारी:

भिडे गुरुजी देवळातली सकाळची 'शिफ्ट' संपवून घरी जायला निघाले होते. संध्याकाळी एका यजमानांकडे सत्यनारायण करायचा होता. तेवढ्यात एक बाई समोर आल्या--
"गुरुजी मला नवस करायचा होता…त्याला काही विधी वगैरे असतो का?"

विषय: 

जमलंच तर

Submitted by anjali maideo on 1 July, 2014 - 10:19

जमलंच तर

जमलंच तर लाट बन
एकदा तरी किना-यावर भेटशील

जमलंच तर दवबिंदू बन
गोळा करुन ठेवता येतील

*कधीतरी पाऊस बन
तुझ्या वर्षावात न्हाऊन जाईन

नाहीतर मग धूकं बन
निदान तुझ्यात गुरफटून जाईन

काहीच नाही तर वादळ बन
नक्की तुझ्यात हरवून जाईन

अंजली मायदेव
५/६/२०१४

विषय: 
शब्दखुणा: 

लेखनस्पर्धा २०१४ -- विषय कमांक २ - व्यक्तिचित्रण -- " जानकीका़कू "

Submitted by मनीमोहोर on 1 July, 2014 - 10:13

" औक्षवंत व्हा, सुखाने संसार करा. " ....... जानकी काकू आम्हाला आशीर्वाद देत होत्या.

"लग्नाला काही मी येऊ शकले नाही , बरं झालं हो दाखवायला आणलीस ते "...... हे त्यांच्या पुतण्याला उद्देशुन.

विषय: 

कृष्णमेघ

Submitted by anjali maideo on 1 July, 2014 - 10:08

कृष्णमेघ

एक खुळासा कृष्णमेघ तो पाहुनिया अंबरी
सखे गं झाले मी बावरी

दूरदेशी गं साजण गेला
चैन पडेना, जीव रमेना
कसा धरु गं धीर जमेना
अश्रुंच्या डोहात जणू ही भिजलेली चुनरी
सखे गं झाले मी बावरी

कसले नटणे सुटले कुंतल
श्रुंगाराला नसेच कारण
अष्टमास सोसले रितेपण
पावसाळी ते घरा परततील आस मनी अंतरी
सखे गं झाले मी बावरी

दूर पाहिला कृष्णमेघ तो
वाटे दूत सख्याचा ना तर
येईल साजण माझा सत्वर
दारी पपीहा पाहून हृदयी तार झंकारली
सखे गं झाले मी बावरी

अंजली मायदेव
१/७/२०१५

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन