उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १
"उपनिषदांचा महिमा अनेकांनी गाइला आहे. कवीने म्हटले आहे, हिमालयासारखा पर्वत नाही आणि उपनिषदांसारखे पुस्तक नाही. पण माझ्या दृष्टीने उपनिषद् हे पुस्तकच नाही. ते एक प्रातिभ दर्शन आहे. शब्दात मांडायचा प्रयत्न केला असला तरी शब्द लटपटले आहेत. पण निष्ठा मात्र उमटली आहे. ती निष्ठा ह्रदयात भरुन आणि शब्दांच्या सहाय्याने शब्द बाजूस सारुन अनुभव घ्यावा तेव्हाच उपनिषद् उमगते.
पुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....
आचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१च्या सुमारास. त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला "गीता प्रवचने" पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके हे....
झालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती कायमचीच..
मग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.
हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉल्किंग सेंट’
१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत.
गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्या.
१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.