स्वतंत्र भारताचा सामरिक इतिहास - १९४७ ते १९७१
India's Wars: A Military History, 1947-1971 एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम
India's Wars: A Military History, 1947-1971 एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम
मित्रवर्य Mandar Anant Bharde याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला.
सिनेमातल्या पात्रांच्या तोंडी चटपटीत, टाळीबाज डायलॉग आपण नेहमीच ऐकतो पण पुस्तकातल्या पात्रांचे? सिनेमात संहितेपासून संवाद लिहिणारे वेगवेगळे तज्ञ लोक असतात पण पुस्तकाच्या/कादंबरीचा लेखक ईमानेईतबारे ह्या सगळ्या जबाबदार्या शब्दशः एक हाती पेलत असतो.
मार्लन ब्रँडो किंवा आपल्या राजकुमार सारख्यांनी रंगवलेली पात्रे डायलॉगबाजीतून जबरदस्त टाळ्या मिळवतात पण लेखकांची पात्रे? त्या बिचार्यांच्या नशीबी वाचकाच्या चेहर्यावर ऊमटलेल्या एखाद्या स्मिताशिवाय, डोळ्यातल्या पसंतीच्या पावतीशिवाय किंवा कपाळावर पडलेल्या वा ऊलगडलेल्या आठीशिवाय फार काही येत नाही.
पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे)
2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगंधरही वाचली.
मी कॉलेज मधे असताना एक जुने मराठी पुस्तक वाचले होते. साधारण अशी कथा होती. कथेतल्या मुलीला एक मुलगा बघायला येतो. त्यचा मित्र खूप सभ्य असतो, पण मुलगा खूप बडबड करणारा,वव्चावचा खाणारा असा असतो. मुलीचा गैरसमज होतो की जो चांगला आहे तोच बघायला आला आहे. लग्नाच्या वेळी ते कळते, पण जुना काळ असल्यामुळे ती बोलत नाही. नंतर केव्हातरी शेतातले वानर मारताना चुकून त्या मित्राची गोळी या मुलीच्या नवर्याला लागते आणि तो मरतो. मित्राला शिक्षा होत नाही, पण तो मनाने उध्वस्त होतो आणि शेवटी नायिका त्याच्याकडे जाते असे काहीसे. कोणी सांगू शकेल का पुस्तकाचे नाव आणि लेखक? जु न्या कोकणातली गोष्ट आहे बहुधा.
आता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची दोघांना ही झोप लागत नव्हती. प्रियाच्या ही मनात आल आपण ही अमोल ला पत्र द्यावं. अता तिने ठरवलं ती पण त्याला पत्र लहीणार पण मुली जरा ह्या बाबतीत सावधान असतात हे पत्र तिने घरी न लहीता कॉलेज मध्ये
लिहायचे ठरवले. सकाळ झाली प्रिया कॉलेज ला आली लेक्चरला न बसता ती थेट लायब्ररी मध्ये गेली सकाळची वेळ लायब्ररी मध्ये जास्त गर्दी नव्हती. प्रिया ने पत्र लिहायला सुरुवात केली.
ऋत्विक आणि पर्णिका ही माझी दोन रत्न नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे भूतलावर प्रकटली. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं मागे पुढे पण पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं दुर्लक्ष! पुस्तकाचा जन्म म्हणजे मात्र कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत. मी मात्र पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं रे म्हटलं की, 'आलं, आलं' करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं ते सर्वांना दाखवत होते.
'हजारो ख्वाहिशें ऐसी......'. माणसाच्या आयुष्यात अनेक अधुरी स्वप्नं, आकांक्षा असतात, काही पूर्ण होतात तर काही अस्तित्वात आहेत हेही आपल्याला माहित नसतं. मागच्या वर्षी मी 'प्रेमपरीक्षा' ही पत्रमालिका लिहायला सुरुवात केली होती, 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर. तेव्हा फक्त एकच इच्छा होती, कुणाला तरी पत्रं लिहायची. पण ती इच्छा हळूहळू एक कुतूहल आणि मग एक आव्हान बनली. कारण पत्रातून एक आयुष्य उभं करायचं. त्या पात्राच्या अवतीभवती होणाऱ्या सर्व गोष्टी पत्रातूनच व्यक्त करायच्या आणि तरीही कथानक कुठेही थांबू द्यायचं नाही, हे आव्हान. जेव्हा पत्रमालिका संपली तेव्हा एक सुंदर गोष्ट बनली होती.