ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.
मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो. लोक बिरादरी मधील अवॉर्ड रूमच्या खालच्या वॉर्ड मध्ये, रेडीओवरच्या बातम्या-गाणी ऐकत रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी “गौज पिस” तयार करतांना ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच दिसणार.
दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो...
... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले.
ना. धों. !
एक कवि तोहि शेतकरी
मातीत रूजली खोल मुळे
रानांतही लदबदलेली त्यांच्या
कवितेतली मधूर फळे.!
कवि तोवर पांढरपेशे
पुणे मुंबई अन् नाशिकचे
वाटत नव्हते कास्तकरी हे
असतील आपल्याच गांवाचे..!
हरखून गेले भान जेव्हा
झोपडीतला कवी वाचला
हा तर माझा शेजारी जणू
मृदगंधाने लदबदलेला..!
सरस कोण बरे यांच्यामधे
तुलना तयांची करा तरी
बेहोशलेला कविराज खरा
कि गहिवरलेला शेतकरी..!
मृगातल्या सरींनी चिंब
हा माझा आरसाच होता
काट्याकुट्यांच्या वाटेवरचा
आशेचा कवडसाहि होता..!
ना. धों. !
एक कवि तोहि शेतकरी
मातीत रूजली खोल मुळे
रानांतही लदबदलेली त्यांच्या
कवितेतली मधूर फळे.!
कवि तोवर पांढरपेशे
पुणे मुंबई अन् नाशिकचे
वाटत नव्हते कास्तकरी हे
असतील आपल्याच गांवाचे..!
हरखून गेले भान जेव्हा
झोपडीतला कवी वाचला
हा तर माझा शेजारी जणू
मृदगंधाने लदबदलेला..!
सरस कोण बरे यांच्यामधे
तुलना तयांची करा तरी
बेहोशलेला कविराज खरा
कि गहिवरलेला शेतकरी..!
मृगातल्या सरींनी चिंब
हा माझा आरसाच होता
काट्याकुट्यांच्या वाटेवरचा
आशेचा कवडसाहि होता..!
“There are four things in this life that will change you. Love, music, art and loss. The first three will keep you wild and full of passion. May you allow the last to make you brave.” Erin Van Vuren
“रेस्ट इन पीस” असं कोणी म्हणणार असाल तर कळलीच नाहीये ती तुम्हाला. कारण रेस्ट असं काही नव्हतंच आजीच्या लेखी. अख्खा स्वर्ग कामाला लावलेला असेल तिने आता. ती ब्रह्मदेवाला बाजूला बसवून वॉशिंग मशीन पुसायला शिकवत असेल. अप्सरेला आमटीची फोडणी आणि रंभेला आमसुलं घालून अळकुड्या शिजवायला शिकवत असेल. त्या व्यापातही वरून आमच्या डोक्यावर खोबरेल तेलाचा नळ सोडला असेल तिने.
केशव शिंदे हा एक लहानपणापासूनचा माझा एक मित्र.माझा मित्र म्हणण्याऐवजी मी त्याचा मित्र असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.कारण त्याच्या दारापुढे त्यानेच लावलेले अशोकाचे झाड हे आमच्या दृढ मैत्रीचे खास द्योतक. श्रीकापरेश्वर निस्सीम भक्त असलेल्या भागोजी शिंदे यांचा द्वितीय सुपुत्र. एड्गाव, जुन्नरचे मूळ रहिवासी असलेले भागोजीबाबा निर्वतल्यावर त्यांची गादी खुल्या मनाने स्वीकारीत सांजसकाळ कापरीबाबाच्या चरणीलीन होत नामस्मरणाचा रोग जडलेले आगळे वेगळे दिलखुलास व्यक्तिमत्व. चांगल्या विचाराची उंची असलेला सहा फुटी मध्यम बांध्याचा एखाद्या स्वच्छ सुंदर निर्झरा सारखा खळाळून हसणारा.
घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया.