भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!
शनिवारी, यावर्षीची बॉस्टन ऍथलेटिक असोशियनची पहिली रेस झाली ५किमी अंतराची. यावर्षी १० किमी आणि हाफ मॅरॅथॉनही आहे. याला खरेतर रेस म्हटलंच नाही पाहिजे. कारण मला कुठेही पहिले बक्षीस मिळवायचे नसते. अर्थात हवे असले तरी ते काय जमणार नाहीये. इथे भले भले लोक सुसाट वेगाने पळत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करणे हे ध्येय नाहीच मुळी भाग घेण्याचे. पण तरीही आपलं लोक म्हणतात म्हणून 'रेस' म्हणायचं. तर ही ५किमीची रेस शनिवारी पार पडली. आता हे अंतर तसं फार जास्त वाटत नाही आणि नसतंही.
आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली.
चक्रधर समारोह करिता रायगढ़ला जातांना शहनाईनवाज उस्ताद बिस्मिल्ला खान तासेक भरासाठी बिलासपुरच्या रेलवे स्टेशनावर थांबले होते. त्यांची आठवण म्हणून हा लेख लिहिला होता. पण तो हिंदीत आहे...इथे देत आहे...
‘रोको-रोको भई...मेरा सामान, मेरे साज कहां हैं...? मेरा सामान-साज आगे चलेंगे...तब मैं भी आगे बढ़ूंंगा...।’
मी बरोबर दहा वर्षांपूर्वी हा लेख लिहिला होता. मनातले विचार तेव्हा लिहून ठेवल्याचा आज आनंद होत आहे. तेव्हाची लिहिण्याची पध्द्त वेगळी होती, अनुभव वेगळे होते. तेव्हा नुकतंच लग्न झालेलं होतं. नंतर मुले झाली, घरी राहून झालं, नोकरी करून झाली आणि बरंच काही. आनंदाची गोष्ट म्हणजे यात मांडलेली माझी मत अजूनही तशीच आहेत आणि मी स्वतः ते अंगिकारले आहे. दुःखाची गोष्ट ही की १० वर्षांनंतरही मी अजून अशा मैत्रिणी, मुली, आई-सासू आजूबाजूला बघते ज्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, अंगिकारले पाहिजे. खरंच कधी फरक पडणार यात काय माहित? अजून एक प्रयत्न म्हणून पुन्हा पोस्ट करत आहे.
------------------
२४ x ७
दूर अंधाऱ्या रात्री ..
एकांतात वाट सरते जेंव्हा...
चंद्र आहे सोबतीला म्हणून चालतच राहावं...
भोवतालच्या गर्दीत ...
ओसवटत असत मन जेंव्हा ...
गाणं आहे सोबतीला म्हणून गुणगुणतच राहावं...
ना कोणाची चिंता, ना कोणाची याद...
आपलाच रास्ता ...इथे आपल्यालाच आपली साथ....
कधी कधी..
आपण आपल्या मस्तीत जगावं....
आज ८ मार्च. साहिर लुधियानवी ह्या कमालीच्या मनस्वी आणि प्रतिभावंत कवीचा जन्मदिवस. माझ्या फार जवळच्या माणसांपैकी एक साहिर.
आज, त्याच्या जन्मदिवशी त्याची आठवण तर आलीच, पण त्याचबरोबर आठवण झाली मागच्या २५ ऑक्टोबरला , त्याच्या मृत्यूदिनी त्याला आठवताना आपसूकच रेखाटल्या गेलेल्या डूडलची.
आज ते डूडल मायबोलीकरांबरोबर शेयर करतीये, २५ ऑक्टोबरच्या रायटपसकट.
------------------------
Remembering Sahir…
जमुनाबाई एकदम फाटक्या तोंडाची,
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..
तू बारा गावचे पाणी पिला असशील, मी बारा गावची लोकं पचवलीत."
असं सांगताना ती छातीवर तळहाताने ठोकत असते अन तिच्या चेह-यावर अनामिक अभिमान असतो.
या अभिमानाची वर्गवारी मला अजूनही करता आली नाही.
हातातल्या पंख्याने ओल्या झालेल्या गळ्यावर हवा घेत ती आधी पचकन थुंकते, पुढे बोलते,
"इथे कुठली गीता अन कुठला भगवान ?"