नुकतंच एका मित्राला सांगत होते, एका विषयावर एक सलग लिही, अजिबात वाहवत न जाता, निबंध लिहितात ना तसं, प्रत्येक मुद्दा मांडत, ओळीने. त्याला वाहवत जाण्याची सवय आहे. पण त्या वाहण्यात बरंच काही बाहेर येतं. विसंगत वाटलं तरी जसं आहे तसंच बाहेर पडतंय असं वाचताना तरी वाटतं. तसं लिहायला यायला हवं. मनात येईल तो प्रत्येक शब्द कागदावर येऊ द्यायचा. पण माझं तसं होतं नाही. शाळेत असताना एका बाईंनी आम्हांला सलग १० विसंगत वाक्यं एका पाठोपाठ बोलायला लावली होती. तिसऱ्या वाक्यापर्यंत माझी विसंगती संपली होती. भरकटत जाणं मला जमलं नाही तेव्हाही आणि आताही बरेच वेळा जमत नाही.
अनेकदा काही विचार मनात येतात आणि समोर असलेल्या कागदावर लिहून टाकले जातात. त्याचे फोटो काढून ठेवू लागले कारण तो कागद पुन्हा सापडेल याची खात्री नाही. मग ठरवून कधीतरी ते डायरीत उतरवून ठेवते. हे असे विचार म्हणजे एखादा लेख, कथा लिहिताना अवांतर सुचलेलं काही असतं तर कधी तो एक क्षणाचा विचार असतो. हे सर्व लेखाच्या स्वरुपात मांडलं जात नाही त्यामुळे माबो वर येत नाही. यातल्या प्रत्येक कागदात एखादी गोष्ट दडलेली असेल असं वाटतं. ती कधी कागदावर येईल माहीत नाही. आज यातलेच काही आज एकत्र पोस्ट करत आहे, चिटोऱ्या.
विद्या .
चैतन्य राजाच्या दरबारी
रुपसुंदरी दासी मिरा
जगकौतुक करती ज्याचे
नयनी त्याच्या चित्र दासीचे
गोष्ट पसरली परराज्यातून
लहर निंदेची आली पत्रातून
नावं बुडालं, ढासळली कीर्ती
अट आली चैतन्याच्या कानी
काय हवे तुझं, राज्य वा प्रीती?
क्षणाचाही विलंब न करता
चैतन्य उभा समीप मिरा
मुकुट काढुनी केलं हस्तांतर
दरबार सोडूनी निघाला चैतन्य
जाता जाता बोलले शिवराज
काय मिळवले चैतन्य राजा?
हास्य उमगवून म्हणी चैतन्य
प्रेम मिळविले शिवराजा.
.
– दिपक.
जीवनात येणार्या बर्याचशा छोट्या-मोठ्या किचकट समस्या सोडवण्यासाठी तर्क (logic) या विचारपध्दतीचा उपयोग होतो.पण प्रत्येक व्यक्ती याचा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याइतपत हुशार असेलच नाही.पण उत्तमपैकी तार्किक विचार करता येणं ही काही जन्मजात देणगी नव्हे.बर्यापैकी अचूक तर्क कसा करायचा हे व्यवस्थित समजल्यास,थोडा अभ्यास केल्यास,सराव केल्यास यात बर्यापैकी प्रगती होऊ शकेल.अनेक समस्या सहज सुटू शकतील.समस्यांनी चिंताग्रस्त होऊन हतबल होण्याऐवजी आणि भावनेच्या भरात काहीवेळा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होण्याऐवजी तर्काने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलंच!
मी कॉलेजमध्ये असताना मावशीचं घरंही जवळच होतं. महिना-पंधरा दिवसांतून मावशीकडे जायचे. एकतर एरवी मेसमधलं जेवण असायचं आणि मावशीचं जेवण असंही खासच. त्यामुळे तिथे गेलं की मेजवानीच व्हायची. खरं सांगायचं तर अनेकवेळा असंही व्हायचं की मी दुपार मावशीकडे पोचले आहे. तोवर त्यांचं सर्व जेवण उरकून, भांडी आवरून झालीत आणि आता वामकुक्षीची वेळ झालीय. मी पोचले की मावशी दुपारच्या जेवणातलं छोट्या छोट्या वाट्यात काढून ठेवलेलं वाढून द्यायची. नेहमी वाटायचं, इतकंसं कसं पुरेल मला, पोट भरेल का? पण असं कधीच झालं नाही की मी गेलेय आणि अर्धवट पोट भरलंय. उलट चार घास जास्तच जायचे.
दोन महिन्यांपासून चाललेलं आजारपण, त्यातून ठरलेली सर्जरी, ती झाल्यावर औषधांच्या अंमलात असलेली गुंगी, मधूनच येणारं डिप्रेशन आणि इतक्या सर्वातून जाऊनही 'पुढे सर्व ठीक होईल की नाही' हा मोठा प्रश्न!!सर्जरीच्या आधी धुतलेले केस आणि त्यानंतर एकदोन वेळा जमेल तसं अंगावर घेतलेलं पाणी. औषधं, आजारपण यातून उतरलेला चेहरा. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर गळत असलेले केस, ओढून आलेला चेहरा,सगळं कसं नको वाटू लागलं. अजून किती दिवस, महिने, वर्षं हे असं चालणार या विचारांनी अजूनच वाईट वाटू लागलं. नवीन दिवस उजाडला, थोडं खाऊन घेतलं, औषध घेतलं तरी मन काही 'उंच भरारी' घेण्याच्या मूड मध्ये नव्हतंच.
पुण्यात रहाणाऱ्याला डेक्कन जिमखान्यावरचे ‘ग्रीटवेल’ दुकान माहित असणारच. हे पुण्यातले पहिले वहिले फक्त ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट आर्टिकल्स विकणारे दुकान! १९७८ मध्ये श्री. दिलीप जाधव आणि त्यांचे जेष्ठ बंधू श्री. नंदकुमार जाधव यांनी ग्रीटवेल सुरु केले. गेली एकोणचाळीस वर्षे या व्यवसायात असणाऱ्या जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्स बाजारात रुजवण्याकरता अथक प्रयत्न केले आहेत. या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ......
काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता.