रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्या खोलीबाहेर पडला.
कुठल्याही पदावरील दुसऱ्या मानकऱ्याला पहिल्या इतकी ओळख आणि प्रसिद्धी मिळत नाही. लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीतही नेमके तेच झाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे दुसरे पंतप्रधान. मात्र त्यांच्या नशिबी प्रसिद्धी कमीच आली.
तू आणि पाऊस
गच्च भरलेलं आकाश जणू,
तसच काहिसं निखरतं रूप,
तू आणि श्रावण सरी,
दोघांत आहे साम्य खूप.
बहरल्या हिरव्या डोंगर कडा,
गाभारी घुमला शंखनाद,
कौलावरती टीपटीप पाणी,
शब्द तुझे मज देती साद.
दुथडी भरून वाहे सरिता,
रोज तुझा वर्षाव नवा,
लपून बसला दिनकर कोठे?
स्पर्श गार ना उबदार हवा.
धो धो पडतो नुसता पाऊस,
तू श्रावण मी शब्द ओले,
ओलावल्या त्या भिंती काही,
असेच काही मन ही झाले...
गजानन बाठे
तू आणि पाऊस
गच्च भरलेलं आकाश जणू,
तसच काहिसं निखरतं रूप,
तू आणि श्रावण सरी,
दोघांत आहे साम्य खूप.
बहरल्या हिरव्या डोंगर कडा,
गाभारी घुमला शंखनाद,
कौलावरती टीपटीप पाणी,
शब्द तुझे मज देती साद.
दुथडी भरून वाहे सरिता,
रोज तुझा वर्षाव नवा,
लपून बसला दिनकर कोठे?
स्पर्श गार ना उबदार हवा.
धो धो पडतो नुसता पाऊस,
तू श्रावण मी शब्द ओले,
शेवाळल्या त्या भिंती काही,
असेच काही मन ही झाले...
गजानन बाठे
लहानपणीची एक गमतीशीर आठवण सहज आठवली म्हणून..
पेमा शॉदरॉन यांच्या "Start where you are" पुस्तकातील एक उत्तम प्रकरण "Be grateful to everyone" वाचनात आले. अतिशय आवडले कारण त्याच्याशी रिलेट होऊ शकले.
गेल्या आठवड्यात शण्मुखानंद हाॅलमध्ये एका कार्यक्रमास गेलो होतो. नृत्य, गायन, सत्कार असे विविध कार्यक्रम होते. त्यात सिंधूताई सपकाळांचा सत्कार होता. सिंधूताई अतिशय साधे पातळ नेसून कार्यक्रमास आल्या होत्या. ७२ वर्षांच्या सिंधूताईंना चालण्यास थोडे कष्ट पडतात. स्टेज चढून आल्यावर जवळच त्यांच्यासाठी खुर्ची मांडण्यात आली व ज्या संस्थेतर्फे कार्यक्रम होता त्या संस्थेचे चारही पदाधिकारी आदराने त्यांच्या खुर्चीमागे उभे राहिले. सिंधूताईंनी माइक हातात घेतला व त्या फक्त पुढची १०-१५ मिनिटे बोलल्या. पण एवढ्या वेळात त्यांनी सगळे सभागृह दणाणून सोडले.
गेल्या आठवड्यात शण्मुखानंद हाॅलमध्ये एका कार्यक्रमास गेलो होतो. नृत्य, गायन, सत्कार असे विविध कार्यक्रम होते. त्यात सिंधूताई सपकाळांचा सत्कार होता. सिंधूताई अतिशय साधे पातळ नेसून कार्यक्रमास आल्या होत्या. ७२ वर्षांच्या सिंधूताईंना चालण्यास थोडे कष्ट पडतात. स्टेज चढून आल्यावर जवळच त्यांच्यासाठी खुर्ची मांडण्यात आली व ज्या संस्थेतर्फे कार्यक्रम होता त्या संस्थेचे चारही पदाधिकारी आदराने त्यांच्या खुर्चीमागे उभे राहिले. सिंधूताईंनी माइक हातात घेतला व त्या फक्त पुढची १०-१५ मिनिटे बोलल्या. पण एवढ्या वेळात त्यांनी सगळे सभागृह दणाणून सोडले.
तशी ती मुळची गावची.....लग्न झाल्यावर १०-१२ वर्षे गावी राहिलेली..... खटल्याचा संसार करून खूप राबुन तिने संसाराचे १०-१२ वर्षे कसेतरी ढकलले. तिच्या बोलण्यातून नेहमीच कळून यायचे कि सासरी खूप जाच झाला....कधी कधी भाकरी बरोबर खायला भाजी देखील राहायची नाही....सर्व पुरुष आणि छोटी मंडळी जेवायची आणि मग शेवटी बायकांच्या पंगती....उरलेले जेवण त्यांच्या वाटेला.... आणि जर भाजी उरली नसली तर पाण्यात चटणी टाकून ती भाकरी बरोबर खायची
"मी" माझ्यातली..
सहजच फोन केला माझ्या सेमिनारला गेलेल्या मैत्रिणीला
म्हटलं बाई, कशी आहेस..
खाणं, पिणं, रहाण्याची व्यवस्था कशी आहे..बरी आहे..?
ती उत्तरली, झकास, अगदी उत्तम
हाॅटेल मस्तच आणि रुम मधे सोबतीला कोणी नाही, हे तर अति उत्तम...
नाहीतर बिन ओळखीच्या, जराशा ओळखीच्या कुणीतरी एकीने सोबतीला यावं..
आणि सोबत म्हणता म्हणता तिच्यासवे आणखीनंच एकटं व्हावं…
तशी काही वाईट नसते ती, चांगलीच असते..
पण आपली आपली नसल्याने तीही कानकोंडी होऊन बसते…