भेटायाचे नाही आता ....

Submitted by कविता क्षीरसागर on 7 February, 2016 - 00:59

भेटायाचे नाही आता ....

काहुर उठले मन कातरले जेव्हा गगनी झांजरले
परतीच्या त्या वाटेवरती सखया काळिज अंथरले

भेटायाचे नाही आता ठणकावुन मी सांगितले
जाई ना पण दुःखच लोचट वेडच त्याने पांघरले

मुरलीच्या त्या धुंद सुरांनी भान हरपले गोपींचे
ठाउक त्यांना की कृष्णाने राधेला होते स्मरले

डबडबले सर्वांचे डोळे करुण कहाणी ऐकुन ती
पाहुन माझे डोळे कोरे मीच स्वतःला घाबरले

आयुष्याचा गुंता झाला प्रारंभ नव्याने केला
देते उत्तर दैवाला "बघ अजुनी नाही रे हरले"

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users