बघ माझी आठवण येते का?
हॅलो मित्रा,
कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं.
हॅलो मित्रा,
कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं.
आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/81819
बंगलोरच्या त्या दोन कुटुंबांनी ही सहल अगदी भरगच्च आखलेली होती. चक्राताला येण्याआधी ते अजून दोन ठिकाणी दोन दोन दिवस फिरून आले होते. सकाळी लवकर, म्हणजे साडेसातलाच त्यांनी नाश्ता सोबत पॅक करून घेतला आणि ते बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघाले. एकाच दिवसात बुधेर आणि टायगर फॉल्स, अशी दोन्ही ठिकाणं त्यांनी केली.
ऑक्टोबर २०१९ मध्ये किरण पुरंदर्यांच्या निसर्ग निरीक्षण शिबिरासाठी चक्राताला जाऊन आल्यानंतर मी चक्राताचं एवढं वर्णन घरीदारी केलं होतं, की ते ऐकून ऐकून माझ्या घरच्यांनाही चक्राताला जावंसं वाटायला लागलं होतं. त्यामुळे २०२२ मध्ये प्रवास करता येईल अशी खात्री वाटल्यावर एप्रिलमधली चक्राताची सहल ठरवून टाकली. आधी तेव्हा किकांचं शिबिर असणार आहे का, याची चाचपणी केली, पण त्यांचा तेव्हा तरी तसा विचार नसल्याचं कळल्यावर आमचे आम्हीच जायचं ठरवलं.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सायकल वरच्या प्रभातफेरीला निघालो. आज रविवार असल्याने जरा लांबचा पल्ला गाठणार होतो. मावळातल्या खेड्यापाड्यातून सकाळी सकाळी सायकल चालवायचा आनंद काही वेगळाच आहे. मंदिराच्या घंटानादाशी जुगलबंदी करणारा बैलांच्या गळ्यातला घंटेचा आवाज. थंड हवेवर पसरलेला गोठ्यातील गोमुत्राचा गंध. अश्या वातावरणात सायकल चालवायचा आनंद काही औरच. अंगणात पहाटेची झाडलोट सुरु होती. एवढ्यात, अश्या सुरेल सकाळी (बे)सूर कानावर पडले. समोरच्या गल्लीत दोन बायका हे (बे)सूर आलापत होत्या. एवढ्या सकाळी भांडण? अश्या रामप्रहरी या बायांना भांडणासाठी कोणता वैश्विक मुद्दा मिळाला असेल?
मला लहानपणी, बस स्टॅण्डवर मिळतात तसली पॉकेट बुक्स वाचायची सवय लागली होती. खुनी कौन? गहरा सच, वगैरे डिटेक्टिव्ह कहाण्या वाचत बकऱ्या चारताना, शेतात बांधावर बसून, झाडावर बसून, अंगणात खाट टाकून किंवा छतावर चटई टाकून या रहस्यकथा वाचण्यात मी रंगून जायचो. मोठेपणी आपण डिटेक्टिव्ह होऊ असं ठरवलं होतं. कहाणीतील डिटेक्टीव्हने खुन्याला पकडला की, त्याची कॉलर पकडून मीच त्याला पोलिसांच्या तावडीत देतोय असं दिवास्वप्न मी पाहायचो. गावात एकमेव टीव्ही आला तेव्हा कृष्णधवल 'व्योमकेश बक्षी' ने त्या विचारांना अजून खतपाणी घातलं. मोठं झाल्यावर डिटेक्टिव्ह होता आलं नाही. पण ते कसब जागोजागी कामाला आलं.
भयंकर आहे हे सगळं! कोकण ट्रीपला जाताय? सावधान, आधी नीट चौकशी करा.
*येवा कोकण आपलाच (अ)नसा*
आणि कोकण अजिबात सुरक्षित नसा
(हा गेल्या आठवड्यातील AdvDr Suchitra Ghogare-katkar यांचा अनुभव आहे, गेल्या सोमवारचा)
असा शाम मोही
कधी शीळ येते पहाटे कुणा ती अनोख्या अनामा खगाची तरी
भुलावून टाके मनाला स्वभावे निळे स्वप्न तेही निळी बासरी
निळेभोर आकाश पूर्वे उजाळे क्षितीजात मंदावला शुक्र तो
हिरा कोंदणी शुभ्रचि तेवणारा रुळे कुंतली श्याम निद्रिस्त जो
झळाळे सुवर्णी जरी माखलेला निलावर्ण शेला कटीचा तया
ललाटी तया कस्तुरीचा सुरंगी टिळा शोभलासे रवी सौम्यसा
असा शाम मोही मना वेढुनिया ह्रदी ज्योत तिही निळी गोमटी
कळेना कदा ती कुडी व्यापूनिया निळा डोह कालिंदि घाली मिठी
......................................................................................
गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा जाळ सोसत आणि पायवाल्यांना सावली देत उभे आहेत.
सायंकाळ
सायंकाळी एकाजागी, आज वाटते स्वस्थ बसावे
उलगडणारे क्षण वेचावे, विसरून त्यांना कधी रुसावे कधी हसावे
विहरत जाते मन वाऱ्यावर अन् तुझ्याच पाशी येऊन घेई क्षणिक विसावा
नव्हते काहीच पाश त्याला, तुलाच स्मरता सायंकाळी कातर व्हावे
उनाड झाल्या आठवणींची, अलगद सुटली एक एक गाठ
दूर वाटल्या होत्या त्यांना, तुझ्याच म्हणूनी बिलगून माझ्या हृदयी घ्यावे
संध्या छाया पसरत जाई, लाल गुलाबी किरणे घेता काळी चादर
काळोखाने प्रकाश होता, रूप तुझेही असे आठवून मोहून जावे
ब्रह्मदेवाला वाटलं एकदा
करावं काहीतरी अफाट!
पृथ्वी बनवण्याचा घेतला मक्ता
नवनिर्मितीचा गिरवत कित्ता,
पृथ्वीभोवती दिला एक पहारेकरी
त्याच्या हाती समतोलाची दोरी,
चंद्र आपला घालत राहिला गस्त
काही वर्षात तिचे हाल बघून झाला त्रस्त!
एके दिवशी म्हणाला ब्रह्माला,
हा असा नग देवा, तुला कसा सुचला?
बाकी सगळी सृष्टी चालते नियमाने,
नियम मोडायच काम हा करी नेमाने!