भाद्रपदाचे कवतिक
रंगपिसारा उघडून देई
श्रावण वेडा अवखळ भारी
हाती येता रंग ढगांचे
भाद्रपदाची खुलते स्वारी
मधेच ओली उन्हे तळपती
सर सर थिरके थेंबघुंगरु
क्षणात लपते उन सोनेरी
पानाकाठी जरा झुरमुरु
कडेकपारी रंग उमलले
माळरान झोकात सळसळे
भिरभिरती रंगांचे अवघे
थवे चमकती रेशिमकवळे
उन्हे तापूनी जरा विसावी
गर्द तरुच्या तळात थोडी
मेघ अडविती किरणांना त्या
डोंगरातुनी येत गडबडी
सरता पाऊस बघे मागुता
पापणकाठी हळवे पाणी
पुन्हा उचलूनी टाके पाऊल
पायवाटीची झुळझुळ गाणी
बरसू दे मज मेघसा
भार हो आठवांचा वसा
क्षणैक ये गे चमकुनी
सौदामिनीशी मदालसा
© निखिल मोडक
वनस्पती उद्यान आणि फ्रिडा काह्लो यांच्या कलेचा उत्सव
एखाद्या सकाळी तुम्ही जागे होता. आणि तुमच्या नेहमीच्या सरावलेल्या कामाला लागता, ते म्हणजे - Brooding. हे अर्थात रुसणं, चिडलेलं असणं, नाराज असणं, स्वत:शी नकारात्मक बोलणं यात तुम्ही इतके पारंगत झालेले असता म्हणुन सांगू - की तुमच्या लक्षातही येत नाही आपण स्वत:वरती, जगावरती इन फॅक्ट आपल्याला झेलणाऱ्या आपल्या प्रियजनांवरती नाराज आहोत. अहो का म्हणुन का विचारता - नेहमीचं अगदी सवयीचं असतं ना ते. शिवाय कित्ती कित्ती सोईस्कर!! एकदा चिडीला आलेलं असलं की लोक आपल्याला एकटं सोडतात. बद्ध्कोष्ठ झाल्यासारखा आपला चेहरा पाहून कोणी आपल्याशी बोलायला धजावत नाही.
जंगल परिसंस्थेनंतर जमिनीवरची आपल्या ओळखीची दुसरी परिसंस्था म्हणजे गवताळ प्रदेश. आजच्या भागात आपण केतकीशी गवताळ प्रदेशांविषयी गप्पा मारणार आहोत.
आधीच्या भागात आपण माणसं आणि जंगलं यांच्यातल्या संबंधांबद्दल अगदी थोडक्यात बोललो. त्यात देवरायांचं महत्त्व आणि राखण्याविषयी बोललो. मग महाराष्ट्रातली जंगलाची इकोसिस्टिम जास्तीत जास्त अबाधित राखत मानवी विकास करणं शक्य कसे करता येईल याबद्दल थोडे बोललो. आता या भागात जंगलांविषयी थोडं अधिक जाणून घेऊयात.
रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अब्ज सजीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल, किंवा
भौतिकीचे नियम जरासे
वागतील वेगळेच तेव्हा
ही घटना आहे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो सॅव्हानातील. लिम्पोपो हा दक्षिण आफ्रिकेतील उत्तरेकडील प्रांत. १९८० च्या उत्तरार्धात या लिम्पोपो सॅव्हानात एक रहस्यमयी मृत्यूतांडव घडलं. त्या काळी भयंकर दुष्काळ पडला होता, जंगलात काहीच हिरवळ शिल्लक राहिली नव्हती. पाण्याचे सगळे स्रोत देखील पार आटून गेले होते. फक्त बाभळी त्या दुष्काळात तग धरून होत्या. कुडू जातीच्या हरणांसाठी ही एक संजीवनीच होती. हे कुडू त्या बाभळीची कोवळी पाने त्याच्या काट्यांची पर्वा न करता आरामात खाऊ शकत होते. त्यामुळे कुडू हरणांना आता या दुष्काळाची काहीच भीती नव्हती.
गेल्या भागात आपण जंगलाची इंग्रजीतल्या फॉरेस्ट शब्दाची फोड करून सांगितलेली व्याख्या पाहिली. मूळ जंगलं कशी तयार झाली आणि सेकंडरी फॉरेस्ट्स म्हणजे काय, जंगलाची क्लायमॅक्स किंवा मॅच्युअर स्टेज कशी असते हे पाहिलं. त्यानंतर आपल्याकडच्या जंगलातली विविधता आणि IUCN च्या रेड लिस्ट याद्यांविषयी बोललो. आता या भागात आपण जंगल परिसंस्थेविषयी गप्पा अशाच पुढे चालू ठेवू!
वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे।
पक्षीही सुस्वरें आळविती।। - संत तुकाराम
आपण गेल्या काही भागांत गोड्या पाण्याच्या परिसंस्था - नदी आणि पाणथळ जागा याबद्दल माहिती घेतली. आता या पुढच्या काही भागात आपण जंगल या परिसंस्थेविषयी केतकीशी गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्राच्या भागात आपण पाहिलं की इथली मुख्य परिसंस्था ही विविध प्रकारची जंगले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला जंगलांविषयी थोडी तरी माहिती हवीच!