प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
पूर्ण भारतात दिसू शकेल
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण
पूर्ण भारतात दिसू शकेल
भूशास्त्राच्या अंकलिपीची
पाने इथली उलटी
रंगभारले पहाड, अवघड
रस्त्याची वेलांटी
रण वाळूचे पायतळी अन्
हिमकण माथ्यावरती
किती विरोधाभास पचवुनी
फुलते इथली सृष्टी
रंग नभाचे प्राशुनी वाहे
निवळशंख हे पाणी
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी
(नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)
कणेकरांची "माझी फिल्लमबाजी* परिचित आहेच, ह्या धाग्याच फक्त शीर्षक त्यावरून घेतल आहे, पण हा धागा फिल्म फोटोग्राफीशी (चित्रफित प्रकाशचित्रण) संबंधित आहे. सध्या मोबाईल कॅमेरा च्या युगात फिल्म फोटोग्राफी पुरातन काळातील गोष्ट वाटेल. पण माझ्या सारखे कूणी हौशी असतील, त्यांच्या कडे काही जुने/नवे फोटो, फिल्म कॅमेरा ने काढलेले असतील तर ती प्रदर्शित करता यावी तसच त्याबद्दल चर्चा व्हावी ह्या हेतूने हा धागा सुरु करत आहे.
ह्या भागात फिल्म कॅमेरा बरोबर मॅक्रो लेन्स वापरून काढलेली प्रकाशचित्र पोस्ट करत आहे.
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?
लहान मुलांचे पावसाळ्यातील सर्वात आवडते गीत म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?खरंतर लहान मुलांना पावसाळा ऋतू खूप आवडत असतो त्याला कारणेही भरपूर आहेत. उन्हाळा संपून शाळा सुरू झाल्या की पावसाळा ऋतू येतो आणि आम्हा विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो.पावसाळा ऋतू आल्यावर शाळांना सुट्ट्या मिळतात.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे खूप-खूप आवडते.
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.
न्हाऊ घालती वर्षाधारा
तृप्त जाहली तप्त धरा
सांगाती हा अल्लड वारा
पानोपानी सुखद शहारा
डोंगरदऱ्या सजून निघती
रांगोळ्या घालीत शुभ्र धारा
ओला गंध भारून टाकी
कुंद आसमंत सारा
हिरवाकंच शालू लेवूनी
धरती पाही मृगसोहळा
श्रावणात तव सुरेल नखरा
भाद्रपदी मग अनंतधारा
दिवसाढवळ्या ढगांआडूनी
लपंडाव तो खेळी तारा
रानी घुमतो निळा पिसारा
नभातूनी जणू बरसे पारा
आभाळभरल्या सांजेला
इंद्रधनुचा मोहक नजारा
विजाही पाहती मेघांआडूनी
अवघा अपूर्व वर्षासोहळा
हॅलो मित्रा,
कसा आहेस? गेले कित्त्येक वर्षे, नव्हे काही दशकं आपण भेटलोच नाही. आपण गावामध्ये एकत्र हुंदडत घालवलेलं बालपण आठवलं, आणि इतक्या वर्षांनी का होईना तुला पत्र लिहावसं वाटलं.
आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/81819
बंगलोरच्या त्या दोन कुटुंबांनी ही सहल अगदी भरगच्च आखलेली होती. चक्राताला येण्याआधी ते अजून दोन ठिकाणी दोन दोन दिवस फिरून आले होते. सकाळी लवकर, म्हणजे साडेसातलाच त्यांनी नाश्ता सोबत पॅक करून घेतला आणि ते बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघाले. एकाच दिवसात बुधेर आणि टायगर फॉल्स, अशी दोन्ही ठिकाणं त्यांनी केली.