पत्रक
कृष्णविवरांच्या काळ्या करतुती
श्यामची आज्जी
आज मी सगळ आवरुन जळगांवला निघालो होतो. मी घेतलेला निर्णय चुक की बरोबर कळत नव्हते. कल्याण स्थानकावर उभ राहुन आम्ही सेवाग्राम एक्सप्रेसची वाट पहात होतो. मन मात्र गेल्या अनेक वर्षात मुंबईत अनुभवलेल रंगीबेरंगी आयुष्य आठवत होतं. मुळातच आयुष्यातला क्षण नी क्षण वेचुन घ्यायचा, जे काही अनुभवायच, उपभोगायच ते "सर्वोत्तमच" असावे असा आग्रही स्वभाव! डोंबिवलीतल्या त्या छोटयाश्या दोन खोल्यांच्या घरात जे काही जमवलं होत ते सगळ अप्रतिम! त्या काळात म्हणजे ८०-८२ चा काळ
उद्योजक आपल्या भेटीला - मिलिंद देशमुख
किचन डेकोर. उत्कृष्ट मॉड्युलर किचन्ससाठी पुण्यातले अग्रगण्य नाव.
मिलिंद देशमुख हे 'किचन डेकोर' चे सर्वेसर्वा. सर्वोत्तमतेचा अविरत ध्यास, कामातली सततची शिस्त, प्रयोगशीलता आणि हेवा वाटेल अशी उद्यमशीलता यांच्या जोरावर अकरा वर्षापुर्वी डेक्कनच्या पुलाच्या वाडीत थाटलेल्या छोट्या ऑफिसपासून कोथरूड आणि औंध इथे मोक्याच्या जागेवर उभ्या केलेल्या प्रशस्त आणि आधुनिक शोरूम्सपर्यंतचा केलेला प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो. आणि त्यांच्याशी बोलताना चिकाटी, आत्मविश्वास आणि 'एंडलेस जर्नी फॉर द एक्स्लन्स इज माय डेस्टिनेशन' या उक्तीचा प्रत्ययही येतो.
आपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे
आपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीकारलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली.
अन्नं वै प्राणा: (७)
मेरी जान भी ले जा दिल्ली
ससुरी काट कलेजा दिल्ली
मुई दिल्ली ले गई...

मैत्र जिवांचे : मायबोलीकरांची समाजसेवा!!!
प्रिय मायबोलीकर,
पत्रास कारण की मायबोलीकरानी मिळून सुरू केलेल्या एका स्तुत्य कार्याचा शुभारंभ नजीक आला आहे.
काही दिवसांपुर्वी हबा यांनी लिहीलेल्या एचआयव्ही विषयीच्या लेखाच्या अनुशंगाने बरीच चर्चा झाली. त्या लेखाचा हा दुवा...
लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...
तिथे प्रत्येकाने सामाजिक जागृतीचे महत्व, प्रत्यक्ष कार्य करण्याची इच्छा तसेच आप-आपल्या वैयक्तिक पण विविध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल इ. बाबत आपली मते मांडली. या सगळ्या सुसंवादातून एखाद्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेची स्थापना करण्याचा विचार येथे मांडला गेला.
विहारा वेळ द्या जरा !
आर्थरायटिस- एक लढाई
आर्थरायटिस हा सांध्याशी संबंधित एक आजार आहे जो ऑटो-इम्युन म्हणजे शरीरातल्या प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे. आर्थरायटिसचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1. रूमाटाइड आर्थरायटिस (आमवात)
2. ऑस्टिओ आर्थरायटिस
3. गाऊट
यातला ऑस्टिओ आर्थरायटिस हा आजार मुख्यत्वे वाढत्या वयात होतो आणि त्यात गुडघ्यामधलं वंगण कमी होऊन हाडं एकमेकांवर घासली जातात. या घर्षणामुळे गुडघे खराब होऊन त्यांचं ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. गाऊट हा मुख्यत्वे पुरुषांना आणि रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या स्त्रियांना होऊ शकतो. याची लक्षणं आमवातासारखीच असली तरी तो थोडा वेगळा प्रकार आहे.
इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट - मनजीत बावा / इना पुरी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटले आणि आधुनिक भारतीय चित्रकलेचं दालन समृद्ध झालं. आरा, हुसेन, बाकरे, रझा, सुझा यांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपाची स्थापना केली. तय्यब मेहता, अकबर पदमसी यांसारखे चित्रकारही नंतर या ग्रुपाचे भाग झाले. मात्र या कलाकारांवर युरोपीय चित्रकलेचा प्रभाव असल्याचे आरोपही केले गेले. असं असलं तरी आधुनिक भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर नेण्यात या चित्रकारांचा फार मोठा वाटा होता, हे नक्की.

Pages
