....................... सह्याद्रीच्या गर्भामध्ये दडलेलं मानवी लोकवस्तीपासून दूर असलेलं जणू काही या मानवरूपी जनावराच्या माणसाळलेल्या प्रवृत्ती पासून सावध राहण्यासाठी हा 'आसरा' काही दैवी दानशूरांनी निर्माण केला होता. दुतर्फा अशोक आणि शाल वृक्षांची गर्दी असलेलं, सभोवताली 'कदंब', 'किकर', 'मधुक', 'पिंपळ', 'किथुक' वृक्षांनी बहरलेलं 'आसरा' हे एक नीरव शांततेचं सौख्य होतं! या वृक्षावर आपले पंख फडफडवणाऱ्या 'तितिर', 'चक्रवाक', 'सारंग','धनछडी','रानराघू' यांच्या मंजुळ ध्वनींनी सदासर्वदा फुललेलं असायचं!
- कथेचा पहिला भाग इथे आहे..
- कथेचा अंतिम भाग इथे आहे...
-------------------------------------------------------------------------------
.....भराभर पाऊलं उचलत ती निघाली... छातीशी पदर घट्ट आवळून... जणू सांडल्या असत्या भावना रस्ताभर.. हातातले पत्र अजूनच चुरगाळत!!
पापणीतले पाणी परतवत...रस्ता कापत ती देवळाच्या आवाराशी येऊन थांबली!
तिथे पोहोचताच, संथ नदीवरून आलेल्या हवेच्या झोताने जरासं हलकं वाटल्यासारखं झालं तिला..
देवळाच्या अगदी पायरीशीच बसली ती!
- कथेचा दुसरा भाग इथे आहे...
- कथेचा अंतिम भाग इथे आहे...
----------------------------------------------------------------------------------
.....आणि तिने तानपुरा खाली ठेवला... ठेवताना झालेला झंकार, खोलीच्या चारही भिंतीना धडकून परतला...
आजही तिची माळावरची खोली सुरांनी न्हाऊन निघाली....