सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.
*****मूळ कथा इथे वाचू शकता******
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..
Synchronicity किंवा अगदी शुद्ध मराठीत समकालिकता हा एक असा अविष्कार आहे ज्यामध्ये व्यक्तीला मनामध्ये चालू असलेल्या गोष्टीशी साधर्म्य असलेला त्याच्याशी निगडीत अनुभव येतो.याला इंग्रजीमध्ये synchronicity असे म्हणतात .मला असे खुप अनुभव सतत येत असतात.युट्युबवर यावर ढिगाने व्हिडीयोपण आहेत.
ब्रह्म होता पहिला,
त्याने ओमकार केला,
उसंत असता, निमिषात
ब्रह्मांड बाहेर खोकला.
.
वळले त्याने सूर्य, चंद्र,
ग्रह, नक्षत्र, तारे,
वळली त्याने पृथ्वी,
भरले पशू- पक्षी, फुले झाडे.
.
पृथा थोडी त्याला भावली,
म्हणून माणूस नामक बाहुली
बनवून, कल्पकतेची
शर्थ त्याने लावली.
.
माणूस राहिला गुणी,
परी बनू लागला कुटील,
षड्रिपूंच्या आहारी गेला,
बनला हवालदिल.
.
एका रात्री भेदरून उठला,
घामाने थपथपलेला,
बिथरलेले मन साठवून,
ब्रह्म ब्रह्म ओरडला.
.
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥
तू तो आमुचा सांगात
भंडार्याच्या माथ्यावर
नाम घेत बैसे तुका
त्याचे एकतानपण
विठू निरखे कौतुका
नाम घेता तुकयाची
मावळली देहबुद्धी
नाम, विठू आणि तुका
एकरुप हो त्रिशुद्धी
विठ्ठलासी मोठा घोर
कैसे सांभाळावे यासी
स्वये बैसोनी दुकानी
चालवितो संसारासी
आवलीसी कळेना हे
बैसे दुकानी हे कोण
विक्री बहु होत तेथ
सारे वाटे विलक्षण
बुवा येती सांजच्याला
पुसे आवली तयाला
कोण गडी हो ठेविला
काही कळेना मजला
दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!