शाळा
अशी पाखरें येती
आज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती जुनी पोस्ट.
शिक्षकदिनाच्या आठवणी
मित्रांनो, आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्या 'शिक्षकदिना'च्या उपक्रमात नक्कीच सहभाग नोंदविला असणार. आपल्यापैकी अनेकांच्या या दिवसाच्या काही खास संस्मरणीय आठवणी असतील. आपल्या मायबोलीवरील विद्यार्थी आणि शिक्षक यांना आपल्या 'त्या' संस्मरणीय आठवणींना ऊजाळा देता यावा म्हणून हा धागाप्रपंच.
मायबोलीवर अशा प्रकारचा धागा आहे किंवा नाही माहीत नाही. जरी असेल तरी या धाग्यावर नवमायबोलीकरांना लिहीता येईल. 
अबॅकस
सक्तीचे रक्षाबंधन
सद्य परिस्थीतीत अमेरिकेत स्थलांतर करावे का ?
मुलं हाय्स्कुल ल गेल्यावर अमेरिकेत स्थलांतर करावे का... मुलांना अभ्यासात काय अड्चणी येउ शक्तिल आणि ते शाळेत अडजस्ट होउ शकतील का...
कुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा....
होळी, मुले आणि वर्गणी
आज सकाळी घडलेली घटना. दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात किशोरवयीन मुलांचं टोळकं उभं होतं. ओळखीची नव्हतीच. होळीची वर्गणी मागायला आली होती. ‘ शाळा नाही का रे? शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय?’ असं विचारलं तर शाळेला सुट्टी आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अशी मध्येच कशी असेल सुट्टी?
खरं तर हा मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. अभ्यासाचे दिवस. ते सोडून होळीची वर्गणी मागत मुलं फिरत होती. आणि समजा सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.
किस्से आणि निरीक्षणं (भाग ६)....काॅप्या, परिक्षा, पेपर, अन् फाटका खिसा.
स्वप्न ऐन रंगात असताना दाणदिशी टीरीवर दणका बसला, खडबडून जाग आली. “ए हरामखोर...वाजले बघ किती...पेपर आहे ना आज? पेपरला कोण बाप जाणार आहे का तुझा ?” स्वप्नाचा पार चुराडा झाला होता. सकाळी सकाळी मधुरवाणी कानावर पडली, पेंगतच पप्पांकडे बघू लागलो. “ए ##घाल्या...उठ कि आता...” तसा पुन्हा एकदा खडबडलो. वेळ बघायला घड्याळात पाहिलं, आई शप्पथ...मी पळतच बाथरूम मध्ये शिरलो. पटापट आवरून मम्मी-पप्पांच्या पाया पडून परीक्षेसाठी निघालो. आज उशीर होणार म्हणून, लांब लांब ढेंगा टाकत मान खाली घालून निघालो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे वर्दळ खूप विरळ होती. मागे असलेलं दप्तर खाड्खुड आवाज करत माझ्या चालीवर डुलत होत.
किस्से आणि निरीक्षणं (भाग ३) ...अन् बल्ब पेटला.
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे?
प्रत्येकाला आपल्या शाळेच्या बऱ्याच आठवणी असतात. आणि त्या आठवणी खरंच खुप अनमोल असतात. प्रत्येकाच्या काही भन्नाट आठवणी असतील यांत शंकाच नाही. खरंतर शाळेचे दिवसच खुप वेगळे असतात. जगातली कुठलीच किंमत देऊन ते परत नाही मिळवता येणार. कधीच नाही.
आज आॅफिसच्या लंच टाईम मध्ये असाच एक शाळेतला किस्सा आठवला, खुप हसलो. तुमच्याशी शेअर करण्याचा मोह नाही आवरला. म्हणुन....
शाळेचे ते दिवस परत नाही येणार...
काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली माझ्यानंतर माझ्या लहान भावंडानी पण हीच कविता त्यांच्या निरोप समारंभात वाचून दाखवल्या. खरतर फोटोच पाठवणार होतो पण कुठेतरी चायनीज भाषा वाचतोय की काय असं वाटू नये म्हणून कीबोर्ड वर बोटे आपटली.
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
काही रस्ते आम्ही न थकता चालायचो
काही क्षण थांबवून थांबत नाहीत
आठवणी बनला तो प्रत्येक क्षण
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
लहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं
आणि लहानपणच आठवण झालेली होती
आनंद कशात असतो हे आज कळलय
हार्दिक शुभेच्छा