आज सकाळी घडलेली घटना. दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात किशोरवयीन मुलांचं टोळकं उभं होतं. ओळखीची नव्हतीच. होळीची वर्गणी मागायला आली होती. ‘ शाळा नाही का रे? शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय?’ असं विचारलं तर शाळेला सुट्टी आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अशी मध्येच कशी असेल सुट्टी?
खरं तर हा मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. अभ्यासाचे दिवस. ते सोडून होळीची वर्गणी मागत मुलं फिरत होती. आणि समजा सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.
स्वप्न ऐन रंगात असताना दाणदिशी टीरीवर दणका बसला, खडबडून जाग आली. “ए हरामखोर...वाजले बघ किती...पेपर आहे ना आज? पेपरला कोण बाप जाणार आहे का तुझा ?” स्वप्नाचा पार चुराडा झाला होता. सकाळी सकाळी मधुरवाणी कानावर पडली, पेंगतच पप्पांकडे बघू लागलो. “ए ##घाल्या...उठ कि आता...” तसा पुन्हा एकदा खडबडलो. वेळ बघायला घड्याळात पाहिलं, आई शप्पथ...मी पळतच बाथरूम मध्ये शिरलो. पटापट आवरून मम्मी-पप्पांच्या पाया पडून परीक्षेसाठी निघालो. आज उशीर होणार म्हणून, लांब लांब ढेंगा टाकत मान खाली घालून निघालो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे वर्दळ खूप विरळ होती. मागे असलेलं दप्तर खाड्खुड आवाज करत माझ्या चालीवर डुलत होत.
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे?
प्रत्येकाला आपल्या शाळेच्या बऱ्याच आठवणी असतात. आणि त्या आठवणी खरंच खुप अनमोल असतात. प्रत्येकाच्या काही भन्नाट आठवणी असतील यांत शंकाच नाही. खरंतर शाळेचे दिवसच खुप वेगळे असतात. जगातली कुठलीच किंमत देऊन ते परत नाही मिळवता येणार. कधीच नाही.
आज आॅफिसच्या लंच टाईम मध्ये असाच एक शाळेतला किस्सा आठवला, खुप हसलो. तुमच्याशी शेअर करण्याचा मोह नाही आवरला. म्हणुन....
काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली माझ्यानंतर माझ्या लहान भावंडानी पण हीच कविता त्यांच्या निरोप समारंभात वाचून दाखवल्या. खरतर फोटोच पाठवणार होतो पण कुठेतरी चायनीज भाषा वाचतोय की काय असं वाटू नये म्हणून कीबोर्ड वर बोटे आपटली.
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
काही रस्ते आम्ही न थकता चालायचो
काही क्षण थांबवून थांबत नाहीत
आठवणी बनला तो प्रत्येक क्षण
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
लहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं
आणि लहानपणच आठवण झालेली होती
आनंद कशात असतो हे आज कळलय
तुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.
बालपण देगा देवा
पुन्हा तो निरागस ठेवा
बालपण देगा देवा
पुन्हा तो निरागस ठेवा
काय मौजेची ती लंगडी
आणि पकडा पकडी
शिकवण त्यात भरूनी राहिली
दु:खातही सुखे पकडण्याची ओढी
खेळता मित्रांसंगे लगोरी
त्याची तरहा अजुनी न्यारी
नेम साधुनी घेतलास तू
संकटावर मात आणि उद्दिष्टे सारी
एकीचे बळ अनुभवले
खेळताना मी कबड्डी
सप्त -चक्रांचे महत्व ठसवलेस
उपयोगी पडले घडोघडी
पुण्यात पूर्वप्राथमिक (Pre-primary) शाळा सुरु करायची असेल तर त्या करीता कोणत्या परवानग्या लागतात व काय प्रोसेस आहे त्या विषयी कुणाला माहिती असल्यास कृपया सांगणे.
मी गुगल करून पाहिले तर या संबंधी काही वृत्ते वाचायला मिळाली. त्यानुसार २०११ पूर्वी पूर्वप्राथमिक शाळेस कोणतीही परवानगी लागत नसे. पण मागच्या पाच सहा वर्षात सरकारने या शाळा सरकारी नियंत्रण अंतर्गत आणण्याचे घाटले आहे असे एकंदर लक्षात आले. काहींना विचारले तर वेगवेगळी माहिती मिळत आहे व गोंधळात भरच पडत आहे.
माझ्या एका मित्राने नुकतेच चर्चा करत असताना सांगितले कि गेले काही दिवस त्याच्या मुलाचे डोके दुखत आहे व ते त्याबाबत डॉक्टरना विचारणार आहेत . कारण विचारले असता तो म्हणाला कि त्याचे (मुलाचे) गणिताचे शिक्षक त्याला गणित आले नाही किंवा गृहपाठ नीट केला नाही तर अधूनमधून डोक्यात फटके मारतात. त्यामुळे डोके दुखत असावे.
भा म्हणजे "तेज" आणि रत म्हणजे "रमलेला" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश
या देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........
भारत की प्रशंशा में कहे गए कथन
Quote 1:We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.In Hindi :हम भारतीयों के कृतज्ञ हैं , जिन्होंने हमें गिनना सिखाया , जिसके बिना कोई सार्थक वैज्ञानिक खोज नहीं की जा सकती थी .
........Albert Einstein ऐल्बर्ट आइन्स्टीन
मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......
निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे