दुपारचे बारा वाजत आले होते. इ. देशमुख तणतणच रॉबिनच्या घराजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर ताण आणि राग दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. देसाई खून प्रकरण लवकरात लवकर सोडवावं असं त्यांना वाटत होतं. तसचं त्यांना वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश सुद्धा होते. पण त्यांच्या हाती काही लागतं न्हवता. खुनाच हत्यार पण अजून त्यांच्या हाती लागलेलं न्हवत. तपासाची पुढची दिशा निश्चित होत न्हवती त्यामुळे एका वेगळ्याच तणावाखाली ते होते. आणी अशाच अविर्भावात ते रॉबिनच्या घराच्या दरवाजाजवळ आले आणी जोरजोराने दरवाजा ठोठावू लागले. दरवाजा उघडायला काही वेळ लागला पण नंतर आतून रॉबिनने दरवाजा उघडला.
"खरं बोलू? बुरा मत मानना"
"बोला ना. आम्हाला तुमचा फीडबॅक हवाच आहे."
"कुत्रं विचारणार नाही या यूआयला."
या अचानक झालेल्या हल्ल्यानं चित्रांगदा एकदम बॅकफूटला गेली. "काय?...”
"पण का? आम्ही स्टॅन्डर्ड्स फॉलो केली आहेत." मीटिंगला जमलेल्या टीमकडे बघत तिनं करणला प्रतिप्रश्न केला.
"असतील, पण मार्केटला स्टॅन्डर्ड हवं आहे असं कोणी सांगितलं?"
"सांगायला कशाला पाहिजे? जे वापरायला सोपं ते चांगलं. सगळ्यांना हा यूआय ओळखीचा आहे. त्यामुळे सगळ्यांना सोयिस्कर पडणार, हे आंधळासुद्धा सांगेल."
दुपारचं ऊन सरून संध्याकाळ होत आलेली होती. दत्त नगरजवळील वस्तीमध्ये आतल्या गल्ल्यांमध्ये माणसांची जरा वर्दळच होती. उन कमी झाल्याने लहान मुले गल्ल्यांमध्ये खेळत होती, वयोवृद्ध लोकं घराच्या बाहेर उभी राहून शेजारच्यांशी चकाट्या पिटत उभी होती. घरातल्या कर्त्या पुरुषांची कामावरून येण्याची वेळ झाल्याने त्यांच्या बायका स्वयंपाकाची तयारी करण्यात गुंतल्या होत्या. दत्तनगरच्या आसपासच संध्याकाळच्या सुमारासच हे नेहमीचच वातावरण होतं. वस्तीमध्ये बरीच छोटी मोठी घरे होती. आता म्हणायला वस्ती असली तरी तेथील घरे हि पक्क्या स्वरूपाचीच होती. तिथली लोकं पोटापुरत कमावत होती.
(सूचना: विषय गर्हणीय आणि भाषा गलिच्छ आहे याची नोंद घ्यावी)
आज साला कंट्रोल हवा होता. साली झोपायला नाय म्हणाली. पण साली ती डोक्यातच गेली. एवढं खूष ठेवलं तिला. पण साली रंडीच ती! नागवं होताना काय वाटलं नाय तिला इतके दिवस अन सालं आज झोपवायचा मूड होता तं बिथरली. भेंxx आपलं पण टाळकं सटकलं. दीडदमडीची साली, मला नाय म्हणते. सालीला फ्लॅटमधून बाहेरच पडू द्यायला नको होतं, भेंxx
काही वेळातच पोलिसांच्या गाडीमधून रॉबिन देसाई वाड्याचा जवळ पोहोचला. देसाई वाडा तसा प्रशस्त आणी आकाराने सुद्धा मोठा वाटत होता, वाडा दुमजली होता. मोठ्या दगडाचं बांधकाम जुन्या काळातील होतं. मात्र वाडा अजूनही भक्कम असल्याप्रमाणे उभा होता. आजूबाजूला काही अंतरावर देसाई वाड्यासारखेच काही प्रशस्त वाडे होते. तिथे काही म्हातारी जोडपी राहायची त्यांची मुले इतर ठिकाणी कामाला असल्याने ती दांपत्य इथे एकटेच राहत असत अशी माहिती देशमुखांनी पुरवली. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ एक पाटी होती “ देसाई वाडा “ अशा नावाची. गाडीतून उतरून रॉबिन त्या पाटीजवळ उभा राहून तिला न्याहाळू लागला. मागून इ.
अर्जुन मीटिंग संपवून परतला तेंव्हा उदयन आणि चित्रांगदा केबिनमध्ये होते. ते लंच करून परत आले होते. या मीटिंगमध्ये अडकल्यानं अर्जुनचा लंच बुडला होता. पण टेबलावरच त्याचं सॅन्डविच दिसत होतं. धापकन खुर्चीत सांडत अर्जुन म्हणाला, "च्यायला, संपता संपत नाहीत यांच्या कटकटी. हे असंच हवं अन् तसंच हवं." तो लॅपटॉप उघडत होता. "का विचारलं तर एकाला धड कारण देता येत नाही. मग साठमारी. तुझं खरं का माझं खरं... झाला तुमचं लंच?"
उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. रस्त्यावरून चाकरमान्यांची कामाच्या ठिकाणी जायची लगबग चालू होती. सकाळी अगदी नऊच्या सुमारास या बागेमध्ये लहान मुले आणि बिनकामाचे म्हातारेकोतारे लोक फेरफटका मारायला येत. त्यातले काही आपापल्या नातवांना घेऊन येत तर काही म्हातारे पाय मोकळे करायच्या नावाखाली मुलांच्या किंवा मुलींच्या संसारातील कागाळ्या एकमेकांना सांगायला येत असत. बाग तशी खूप मोठी होती. दुपारी १-४ काही तास बंद असायची आणी सकाळी ६ वाजताच उघडायची. आजसुद्धा बागेमध्ये बऱ्यापैकी लहान मुले आणी म्हातारी माणसे यांची गर्दी होती. सकाळचे कोवळे उन जाऊन आता त्याची जागा कडक उन्हाने घेतली होती.
हजार गणिते आयुष्याची चुकली होती
नंतर मजला सुंदर कविता सुचली होती
भरून गेली असे वाटले लोकांना पण
जखमेवर त्या भळभळणारी खपली होती
अजून माझा आला नाही बहर सुखाचा
पडली ती तर फळे उन्हाने पिकली होती
स्टेशनवरती धावत गेला तिला भेटला
स्तब्धतेत मग निर्दय गाडी सुटली होती
चिंचा , बोरे, फळा , बाकडे, उदास खिडकी
आठवणींची मनात शाळा जपली होती
या कर्जाचे ओझे झाले फांदीलाही
उतरवला तो देह तरीही झुकली होती
वनात सीता , सभेत कृष्णा छळली गेली
तीच कहाणी पुन्हा नव्याने घडली होती