मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अवांतर
! अत्तर कांड !
गावात बालवाडी पासून ते डीएड पर्यंतच सगळं शिक्षण उपलब्ध होतं. पण तरीही मला माहीत नाही वडिलांच्या मनात काय आलं आन त्यांनी पहिलं मला पहिली ते चौथी बोर्डिंग, मौजे खामगाव नंतर पाचवी ते सातवी मौजे चारे आणि परत आठवीला तालुका बार्शी जिंदाबाद ! नशिबात आई-बाप हायेत तरी च्यामायला रांडंच पोर बोडकच ! मी सोलापुरी आणि शिव्या अस्सल कोल्हापुरी भले शाब्बास ! असोत , नाही म्हणलं तरी साला आनंद आणि दुःख एकाच वेळेस झालेलं. आनंदी या साठी कि तालुक्याचं ठिकाण , मोट्ठी शाळा , एका एका वर्गाला आठ आठ तुकड्या , नवा गणवेश , नवं दप्तर पण दुःख यासाठी कि परत बोर्डिंग ! मंझी बोडकंपन संपायलाच तयार नाही.
निरोप
गदगदल्या सनईला,
गवसेना सूर
गहिवरल्या घना रे,
नको सोडू धीर
मावळता दिनकरही,
थबकला पळभर
हळहळते इंद्रायणी,
अहो अश्रूंचा पूर
दृष्टीने संवाद घडे,
दाटुनीया ऊर
शब्दांना मौन पडे,
सखा जाई दूर
लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे.. -- ऋन्मेऽऽष
लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे.. -- ऋन्मेऽऽष
तुला मुलींशी बोलायची अक्कल नाही, ते तुला बायकांशी बोलायला बरे जमते.. असा माझा आजवरचा प्रवास आहे. या भरवश्यावर ईतक्या मोठ्या विषयाला हात घालायचे धाडस करत आहे
चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान - मुग्धटली- समर्थ
मायबोली गणेशोत्सवामध्ये गेल्या वर्षी प्रमाणे लेकाची एन्ट्री.
पृथ्वीवरून चन्द्राकडे झेपावणारे चान्द्रयान ३ आणि चन्द्रावर झालेले विक्रम लॅन्डरचे यशस्वी लॅण्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
हांगचौमध्ये आपलं स्वागत!
हांगचौमध्ये आपलं स्वागत!
हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक
लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष
लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष
शुभेच्छा
सर्व मायबोलीच्या चाहत्यांना आणि गणेश भक्तांना बाप्पच्या आगमणाच्या हार्दिक शुभेच्छा, आता कामनापुर्ती गणेशाला एकच प्रार्थना करा की बाप्पा कुठलभी सरकार असेना पर महागाई, बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या यासमद्यापासुन मुक्त करनारे सरकार येऊदे पण पण फक्त गाजर दाखवणार आणि फेकु सरकार नको .
डबल डेकर !! मुंबईची शान - ८६ वर्षांचा हा प्रवास अखेर थांबला!
पाऊस, मरीन ड्राईव्ह आणि एक मुंबईकर.. आमचे एक वेगळेच नाते असते. तिघातले दोघे उपस्थित असलो तरी मेहफिल जमते. सध्या पावसाचा सीजन असल्याने वारंवार तिथे जाणे होते. मोजून सांगायचे झाल्यास, गेल्या तीन महिन्यात पाच वेळा. मी आणि सोबत माझी दोन पोरे. त्यांनाही तिथल्या जादुई वातावरणाची आवड लागली आहे. कधीही ऊठा, जीन्स चढवा आणि निघा. कंटाळा येतच नाही. उलट आला कंटाळा की ऊठा आणि तिथला समुद्र गाठा. नुसता समुद्रच नाही तर त्या भोवती पसरलेला कट्टा, आणि त्या कट्ट्याभोवतीचा पट्टा, कितीही गजबजलेला का असेना कधी गर्दीचा वाटत नाही. मन रमतेच..