आज अचानक कांताराला जायचा योग आला.
अचानक आला, कारण मला जायचे नव्हते. मला त्याचा ट्रेलरच भडक उथळ वाटलेला. तरी बहुतांश लोकं नावाजताहेत तर ओटीटीवर आल्यावर चान्स घेऊया म्हटलेले. तिथे रिमोट आपल्या हातात असतो. थिएटरमध्ये मात्र चित्रपट कितीही कंटाळवाणा वाटला तरी अर्ध्यावर उठून जायचा विचार आजवर माझ्या मध्यमवर्गीय मनाला शिवला नाही. वेळेचे रताळे झाले तरी चालेल, डोक्याची मंडई झाली तरी चालेल, पण समोर जो रायता फैलावून ठेवला असतो तो चाखूनच जायचा असे घरचे संस्कार आहेत.
यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.
काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!
आर आर आर चित्रपट त्यावरची चर्चा ऐकून पाहिला. अपेक्षा बाहुबलीच्या होत्या. पण बघितल्यावर आरारारा का बघितला असे झाले.
केजीएफबाबत सावध भुमिका घेतली आणि थोडक्यातच तो चित्रपट काय कॅटेगरीचा आहे हे ओळखत वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचवले.
पुष्पा मात्र पुर्ण बघितला. अल्लू अर्जुन नाव ऐकून होतो. त्याचा स्वॅग आवडला. पुर्ण चित्रपटाचा डोलारा त्यावरच होता. बाकी चित्रपट म्हणून कलाकृती सामान्य वाटली.
दिवाळीची सुटी तोंडावर आलेली.
हवेत गारवा वाढायला लागलेला.
दुपारचं मऊ ऊन हवंहवंसं वाटणारं.
जवळपास रिकामं झालेलं कॉलेज आणि होस्टेल.
कुठेतरी तुरळक चुकार मुलंमुली.
तेही आपल्यासारखेच निवांत.
कॅन्टीनही शांत.
किंबहुना सगळ्या हवेवरच एक उबदार, आनंदी निवांतपणा पसरलेला.
आपलं काही तरी बारीकसं काम कॉलेजमध्ये.
ते आटपून आपणही दिवाळीला घरी जायला निघणार.
अशा वेळी कॅन्टीनमध्ये अनपेक्षितपणे भेटलेला मित्र आणि त्याच्याबरोबर घेतलेला चहा.
काय रंगतात ना गप्पा अशा वेळी!
ती, मी आणि मुंबईची खादाडी !
-------------------------------------
हम एक बार जीते है,
हम एक बार मरते है..
प्यार न जाने कितने बार करते है
पर दिन मे चार बार चरते है
यातले 'चरते है' म्हणजे चरणे.
म्हणजेच शुद्ध मराठीत हादडणे!
ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??
धागे काढणे ही कला आहे की रिकामटेकड्या लोकांचे धंदे आहेत हे माहीत नाही. पण मायबोलीवर काही मी एकटाच नाही जे धागे काढतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मायबोलीवर किमान दहा वा दहापेक्षा जास्त धागे काढले त्या सर्वांनी मिळून हे ठरवावे. मी कोण एकटा ठरवणारा..
पण एक सत्य हे सुद्धा आहे की कोणी धागे काढलेच नाही तर जगातले कुठलेच संकेतस्थळ चालणार नाही. त्यामुळे कोणी कमी काढा वा जास्त काढा, पण धागे काढणे ही जगण्याची गरज आहे. तरीही एण्ड ऑफ द डे, ऋन्मेष एकटाच फार धागे काढतो म्हणून बदनाम आहे.
सुरुवातीची ओळ बा. भ. बोरकरांच्या सुप्रसिद्ध कवितेवरून सुचल्यामुळे त्यांची मनापासून क्षमा मागत आहे.
खूप या पुलास फाटे
एक जाया, कैक याया
सायंकाळी अन् सकाळी
वेळ हा जाणार वाया
विमाने देशी-विदेशी
उतरती ती उत्तरेला
मार्ग हैद्राबाद जाण्या
होय तोही त्या दिशेला
रिंगणे वा कंकणे दो
बंगळूरूच्या सभोती
नाव त्यांचे रिंग रोड
आहे सर्वांच्याच खाती
ओलांडुनी त्या रिंग रस्त्या
प्रवेशिण्या शहरामध्ये
वाहनांची रांग येथे
पुलावर्ती चढू लागे
येत्या 8 ऑक्टोबरला भारतीय हवाईदलाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं.
आमच्या घरातल्या भिंती बोलतात..
छे!, भुताटकी नाही. चमत्कार तर बिलकुल नाही. पण खरेच आमच्या घरातल्या भिंती बोलतात. घरात गोकुळ नांदतेय याची साक्ष देतात. (हि उपमा मायबोलीकर विशाल कुलकर्णी यांच्या प्रतिसादातून ढापलेली )