घाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं कि कोकण आपले रूप दाखवू लागतं. गर्द हिरवाइतून वळणे घेत जाणारा रस्ता , मधूनच डावीकडे आणि उजवीकडे दिसणार्या डोंगर आणि दर्या.. आणि रंग फक्त दोनच. धरित्रीचा हिरवा आणि आकाषाचा निळा.. आणि हो.. मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खूष आहे इथला कि , तुम्ही कॅमेरा कसाही कुठेही धरून क्लिक करा , येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल.
मी प्रथम कोकणात , गुहागरला गेलो मित्रांसमवेत , मित्राच्याच घरी... १९८५ मधे.
अगदी आपण कोकणतलं घर म्हणून जे सर्व ऐकलेलं असतं , ते सारं आहे त्या घरात. खालच्या पाटातलं हे १०० वर्षे वयाचं कौलरू घर . पडवी , सोपा , झोपाळा , माजघर , देवघर इतर खोल्या...मागे परसात विहीर , नारळ , सुपारी ची शेकडो झाडं... आणि त्या मागे थेट पुळण आणि अथांग पसरलेला , डोळ्याला फक्त आणि फक्त निववणारा सागर... सतत गाज देऊन आधाराची भक्कम जाणीव करून देणारं त्याचं अस्तित्व !
एका लहान मुलीने मला तिच्या मैत्रिणींबरोबर समुद्रावर बोलावलं. अगदी पोचल्या दिवशीचीच गोष्ट. मी सगळा जामानिमा बरोबर घेतला. स्विमिंग सूट घातला, पाण्यापाशी जाईपर्यंत वरून घालण्यासाठी जवळपास शरारा वाटेल असा स्कर्ट चढवला, पंचे वगैरे गोळा केले... मग त्या मुलीचे आई-वडील शोधून तिला समुद्रावर नेत्ये असं सांगायचं आणि फटावळ पोहायला न्यायची असं ठरवलं होतं. आवरून मी खाली उतरले तेव्हा तिच्या आईनेच मला तिचा निरोप कळवला : “तू येईपर्यंत आम्ही पोहत जिथवर पोचलो असू तिथे येऊन भेट!” त्या मासळ्या कधीच पाण्यात उतरल्या होत्या.

अथांग हा तुझा देह न पुरे या लोचनी
नजर होते सैरभर पहातो श्वास रोखुनी
तळाची परिसीमा भिडते हृदयाच्या अंतरी
भासते नववधू प्रिये समान तू या भूवरी
मंथनाच्या डोहात जग हे सामावलेले
निळाशार स्पर्शात शरीर आसुसलेले
उत्कटतेच्या परमबिंदूत मन शहारलेले
जसे दिवस नि रात्र भेटीस आतुरलेले
कोकणात मुरूड-जंजिरा ट्रिपला जायचा प्लॅन केलाय. बरोबर लहान मुलं असल्याने जंजिर्यावर जायचा विचार नाहीये.
पण मुरूडला नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने काळजीत पाडले आहे. तो समुद्रकिनारा सुरक्षित आहे का?
साधारणपणे बीचवर जातांना काय काळजी घ्यायला हवी? भरती/ओहोटी चे टाईमटेबल आधी कळते का? ऑनलाईन शोधले पण मुंबईचे मिळाले फक्त.
प्लिज टिप्स द्या. पहिल्यांदाच लहान मुलांना घेऊन जात आहे.
********************************************************************************************
खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद लोक्स 
अवेळी पाऊस, एकटेपणा आणि कंटाळा मिळून एकच गोष्ट होऊ शकते.. एन्जॉय ☺

माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्या, मालवणार्या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे....
लगानच्या "काले मेघा काले मेघा पानी तो बरसा दो..." या गाण्याची प्रचिती सध्या सगळ्यांनाच येत आहे.पण इथे ढग काळे असण्याऐवजी सफेद रंगाचे जमा झाले आहेत.गेल्या वर्षी अशीच स्थिती होती आणि त्याच्याही गेल्यावेळी पाऊस जुलैपर्यंत फरपटत गेला.आता पावसाची तेही मान्सूनसारख्या,ही गत का झाली? कोणी म्हणाले जागतिक तापमान वाढ,कुणी म्हणते प्रदुषण,कुणी जंगलतोड आणखी बरेच काही.माबोवरपण चर्चा झाली,बाहेरही बघितले पण याविषयावर गुरुवर्य डॉ.माधव गाडगीळांचा लेखपण आला,तरीही लोकांना पाऊस रुसला असेच वाटले.
बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्या मतलई सुरमई वार्यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा.
कर्कश वाजणार्या फोनमुळे साराला जाग आली. बेडवर उठून तिने उशी खालचा मोबाईल शोधला, पण मोबाईल तिथे नव्हता, कसेबसे डोळे चोळत ती बेडवरून उठली, आणि वाजणारा मोबाईल नक्की कुठे वाजतोय ते बघायला लागली. मोबाईल नेहमीप्रमाणे किचनमधे मायक्रोवेव्हवर होता. झोपेतच तिने फोन घेतला “हॅलो” ती म्हणाली.
पलिकडे नक्की कोण होतं हे माहित नाही, पण धनु, बॉलीवूड, न्युजपेपर असले शब्द ऐकून हा रॉंग नंबर नाही, इतकं तिच्या लक्षात आलं. पलिकडचा माणूस जाम वैतागलेला होता, तमिळमधून काय बडबडत होता, ते मात्र तिला अजिबात समजलं नाही.