मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
इतिहास
उल्का, अशनी, डायनोसॉर्स आणि 'प्रिय अमुचा …'*
रात्री झोपताना छताकडे डोळे लावून झोपण्याची माझी सवय. आजही तसाच पडलो. नेहेमीप्रमाणे अंधारात छत कोठे अाहे हे पाहण्याच्या प्रयत्नात पापण्या जड होउन झोप लागेल ही अपेक्षा. पण अाज काही वेगळाच अनुभव येतोय. मी जे पाहातोय ते छत नाही, अथांग अंतराळ आहे. त्या काळ्या अवकाशात छोटे छोटे ठिपके; सोनेरी, लालसर, पांढुरके, निळसर. त्यातच एक फिकट ठिपका अगदी दिसेल न दिसेल असा. पण अाज तो मला अगदी स्पष्ट दिसतोय. इतर ताऱ्यांप्रमाणे हा ही एका जागी स्थिर नाही. प्रचंड वेगाने तो ठिपका अगदी थेट माझ्याकडेच धाव घेत अाहे हे मला ठाऊक अाहे.
जरा याद करो कुर्बानी (आझाद) : विनम्र अभिवादन
ए मेरे वतन के लोगों
जरा याद करो कुर्बानी
थोर स्वातंत्र्यसेनानी व भगतसिंह, राजगुरू , सुखदेव आणि अन्य अनेक प्रखर देशभक्त व क्रांतीकारकांचे गुरू असलेले चंद्रशेखर आझाद यांचा आज स्मरणदिन आहे. आजच्या दिवशी दि. 27 फेब्रुवारी १९३१ रोजी, त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या सशस्त्र क्रांतीच्या प्रणेत्यास अभिवादन करूयात.
( स्व. चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाशझोत टाकणारे किस्से, घटना लिहीण्यास हरकत नाही. वादविवाद नको. )
आमचें गोंय -समारोप -आजचा गोवा
भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्या नेत्याचे भय असते.
पेशवाईतील साडेतीन शहाणे
मला कोणी सांगु शकेल का, की पेशवाईतील साडेतीन शहाणे कोण होते?
माझ्या माहितीप्रमाणे
सखाराम बापु बोकील - १
विट्ठ्ल सुंदर - १
देवाजी पंत - १
नाना फडणवीस - अर्धा
कोणी ह्याच्यावर अधिक प्रकाश टाकु शकले तर चांगलेच.
‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...
कधी वाटतं, दोन-चार दिवस फुरसत काढून, निवांत एखाद्या जुन्या-जाणत्या गडावर शोधयात्रा काढावी..
..वा-यां-वादळांत टिकाव धरून राहण्यासाठी गडावरच्या शिबंदीची, पाण्याची, चोरवाटांची, संरक्षणाची कशी व्यवस्था असेल, याचे आडाखे बांधावेत..
..माचीवरच्या कारवीतून, तिरपांड्या घसा-यावरून घुसत जाताना जीव मेटाकुटीला यावा, अन् अवचितंच पहा-यासाठी खोदलेली विवरं सापडावीत...
..खो-यात उतरणारी दुर्घट वाट सुगम करावी, अन् झाडीत दडलेलं देवीचं ठाणं गवसावं..
..एखादं बुजलेलं वैशिष्ट्यपूर्ण टाकं तास न् तास खपून श्रमदानानं मोकळं करावं, अन् टाक्यावरच्या कोरीव कामानं अचंबित व्हावं..
गोष्ट मेंढा गावाची - लेखक - मिलिंद बोकील
गोष्ट मेंढा गावाची - लेखक - मिलिंद बोकील
हे पुस्तक मला पुण्यातल्या मित्रमंडळींनी भेट दिलेय. याचे प्रकाशक आहेत, ग्रामसभा, मेंढा (लेखा), पो. हेटी, ता. धानोरा , जि. गडचिरोली ४४२६०६, महाराष्ट्र आणि अर्पण केलेय, "भारतीय जनतेस...". या दोन बाबींवरुनच
हे पुस्तक खुपच वेगळे आहे, हे जाणवलेच. आहे केवळ १४० पानांचे. एवढ्या आकाराचे पुस्तक, मला
वाचायला फारतर २ तास लागतात. पण हे पुस्तक मी गेले महिनाभर थोडे थोडे करत वाचतोय. कारण ते
तसेच वाचावे लागते.
असे काय आहे या पुस्तकात ?
हि गोष्ट असली तरी काल्पनिक नाही. ज्या गावच्या ग्रामसभेने ते प्रकाशित केलेय, त्याच गावाची सत्यकथा.
आमचें गोंय - भाग ११- कोंकणी भाषा: इतिहास आणि आज
शिवजयंती विशेष लेख - शिवकालीन शस्त्रभांडार
शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते.अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत,बिचवा यांचा प्रभावी वापर असेल ,पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल.शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे.अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न करत आहे.