मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
ध्यान
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद
योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)
योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना
२: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)
२८ सप्टेंबर. सकाळी लवकर उठून जायचं आहे. आज पहिला दिवस आहे, पण सामान बांधणं, सगळ्या गोष्टी तयार ठेवणं ह्याची तयारी आधीच केली आहे. त्यामुळे सकाळी आरामात निघू शकलो. मन खूप शांत आहे. कालपासून काहीच तणाव नाही आहे. नेहमीचीच बाब आहे, असं वाटतंय. उजाडायच्या आधी पावणे सहाला निघालो. आजचा टप्पा छोटासाच आहे. पूर्वी अनेकदा ह्या मार्गावर गेलो आहे. सुमारे सव्वा तीन तासांमध्ये पोहचेन, असं वाटतंय.
लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!
मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग ३)
(संदर्भासाठी: गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट, आणि दलाई लामा यांच्याबरोबर ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतल्या गेलेल्या परिषदेमधील काही वक्त्यांचे निवडक विचार येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’.
साक्षीचे आकाश..
श्वास प्रश्वासाच्या
आरोह अवरोहाला
पाहता पहाता मी
सावध होत गेलो
मनाची बेलगाम
धाव सजग होवून
न्याहाळू लागलो
पाहतांना त्यात कधी
वाहून जावू लागलो
वाहने लक्षात येताच
पुन्हा मनापासून
वेगळे होवू लागलो
साक्षीच्या अथांग
निळ्या आकाशात
विहार करू लागलो
दृष्ट्त्वाच्या शिखरावर
सावध बसू लागलो
होता होता असे काही
शून्याच्या स्पर्शाचे
संकेत आकळू लागलो .
“अरे हेच तर मिळवायचे होते
मग आजवर टाळले का ?
मीच मला विचारले .
अन मीच उत्तर मला दिले
कारण त्यात
चुकायचे भय होते
स्वत:च स्वत:ला नित्य
सांभाळायचे होते
अन मला तर
सुरक्षित नीट पोहचायचे होते
ध्यान (ओशोची पत्र कविताअनुवाद)
ध्यानातून काहीही मिळवायची
“आकांक्षा ”
सर्व प्रथम मनातून काढून टाका .
अगदी सहज पणे ध्यान करा .
जे घडायचे ते घडू द्या .
एक दिवस अगदी सहज
सारे काही घडू लागेल.
प्रयत्नांनी ध्यान कधीच होत नाही .
खरतर ,
प्रयत्न हाच अडथळा असतो
प्रयत्नात आणि अभ्यासात
एक प्रकारचा तणाव असतो
एक प्रकारची अपेक्षा असते
अगदी शांतीची अपेक्षा सुद्धा
अशांती निर्माण करते
हा तणाव जायला हवा.
ज्या क्षणी हे पटते
दैवी शक्तीचे अवतरण होते.
“मी हे करतो”
हे वाटणेच थांबवा.
त्या ऐवजी अनुभूत करा.
मी मला, स्वत:ला
त्याच्या हवाली करत आहे.
हेच समर्पण आहे.
स्वत:चे संपूर्ण समर्पण करा.
जेव्हा हे कराल तेव्हाच
जप, ध्यान आणि प्रवास.....
जप, जाप्य.. तप, तपश्चर्या वगैरे शब्द नविन नाहीतच.
तप आणि तपश्चर्या कदाचित आता तितक्याश्या अपिलींग राहिल्या नसल्या तरी अगदी पुराण कालापासून आजही जपाचे महत्व टीकून आहे. जपालाच बिलगून असते ते ध्यान. "सुंदर ते ध्यान ऊभे विटेवरी" मधले ध्यान नव्हे- त्या ओळीत, दगडात कोरलेल्या एखाद्या मूर्त रूपातही नाथांना सौख्य, शांती, लोभस असा जिवंत अनुभव मिळाला त्याचे ते वर्णन आहे. ईथे रूढ अर्थाने "ध्यान" करणे, मेडीटेशन या अर्थी म्हणतोय.
तर जप आणि ध्यान याचे आजच्याही युगात महत्व/अपिल कमी झालेले नाही.