अर्थकारण

२००५ आधीच्या चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्यावे..!!

Submitted by उदयन.. on 22 January, 2014 - 09:16

रिझर्व बँकेने प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की ३१ मार्च २०१४ पुर्वी २००५ पुर्वीच्या सर्व चलनी नोटा बँकेतुन बदलुन घ्याव्यात... ५ , १० , २०, ५०, १०० , ५०० , १००० या सर्व किंमतींच्या नोटा बँकेतुन बदलुन मिळतील

या बाबत अधिक माहीती साठी

http://rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=30458

Banknotes issued prior to 2005 to be withdrawn: RBI Advisory
The Reserve Bank of India has today advised that after March 31, 2014, it will
completely withdraw from circulation all banknotes issued prior to 2005. From April 1,

शब्दखुणा: 

करांची कटकट कमी होईल का?

Submitted by विजय देशमुख on 6 January, 2014 - 22:23

कर देणे हे जवळपास प्रत्येकालाच कटकट वाटत असावी. त्यात फक्त कर-कन्सल्टंटच फक्त अपवाद असावा. Happy
माझ्या मते, त्यात करांच्या कटकटी जास्त आणि फॉर्मस, वेगवेगळे कलमं यामुळे जास्तच त्रासदायक वाटतो. ज्याला कर प्रणाली समजते, कदाचित त्यांना ते सोपं वाटत असावं.
नुकतच रामदेव बाबांनी कर प्रणाली संपवा (किंवा सोपी करा) असं म्हटलं. त्यावरुन काही प्रश्न डोक्यात आले. मला अर्थकारणातलं काहीच कळत नाही, त्यामुळे अधिक सोपं करुन लिहिलं तर उत्तमच.
१. एकाच प्रकारचा किंवा कमीतकमी प्रकारचे कर असावे, हे योग्य आहे का?
२. वॅट चा उगम हाच होता ना? त्यातही एका वस्तूवर एक तर दुसर्‍यावर दुसरा % आहे ना?

वीज बचतीचे उपाय

Submitted by चायवाला on 5 December, 2013 - 00:41

वीजटंचाई आणि लोड शेडिंग व इतर कारणांनी वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. त्यासंबंधातली परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल.

पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याची चर्चा आपण इथे करुया. अगदी आपल्या मोबाईल पासून ते घरातल्या इतर जड उपकरणे वापरताना वीज बचत कशी करता येईल याची चर्चा आणि उपाय सुचवणे हे इथे करुया.

उदाहरणादाखल काही अगदी छोटी उदाहरणे:

ग्राहकांची फसवणूक .. कशी टाळू शकता ?

Submitted by अभि१ on 27 November, 2013 - 10:12

मला आलेले काही अनुभव आणि त्यावरचे मला सुचलेले उपाय . तुमचे मत आणि असेच काही अनुभव तुम्हाला आले आहेत का ?

१. रद्दी . आपल्याला वाटते कि रद्दीवाले हे गरीब बिचारे लोक. त्यांनी मारले थोडे पैसे तर मारू दे. १०/२० रुपयांनी काय नुकसान होते आपले ? मुळात रद्दीचा भाव - १० रु / किलो . जेव्हा ते हा भाव आपल्याला देतात तेव्हा त्यना नक्कीच १२ ते १३ रु / किलो कमीत कमी मिळत असणार. कदाचित १५ रु पण.

शेमलेस लव्ह बर्डस

Submitted by सखा on 16 September, 2013 - 22:36

पाडगावकरांची "प्रेम म्हणजे प्रेम असतं"
कविता आमचे सर अगदी
तल्लीन होवून शिकवतात.

तुमचं अन आमचं सेSSम असतं
म्हणताना "ते" दिवस आठवून सरजी
कधी भावूक तर कधी लाले लाल होतात

लेकांनो अर्धं अर्धं चोकोलेट खाल्लं आहे का कधी?
पावसात सोबतीने भिजला आहेत का कधी?
अरे तुमच्या पिढीला बुडलेली होडी कळणार कशी?
लाटां वर बेभान होवून नाचणं शिका आधी

कर्जबाजारी

Submitted by नंद्या on 6 September, 2013 - 13:47

काँग्रेस वि. भाजपा सर्वविषयक चर्चा या पानावर करू नये ही आग्रहाची विनंती .

लोकसत्तेतला गिरीश कुबेर यांचा लेख वाचून बरेच प्रश्न उभे रहातात. आत्ता पर्यंत बघितलेले स्कॅम हे 'जर तर' प्रकारातले आहेत. कागदावर 'असे केले असते तर एवढे पैसे मिळाले असते ते आता मिळणार नाहीत कारण मा. मंत्री श्री अमुकतमुक यांनी ते खाल्ले' अशी घोडी नाचली आहेत.

पण या लेखातले कर्जाचे आकडे आणि ते कर्ज कुठून कुठे गेले आहे ते बघता थक्क व्हायला होते. हे आकडे किती खरे आहेत किती खोटे, असा जरी विचार केला तरी मल्ल्या प्रकरण ताजेच असल्याने हे आकडे विश्वासार्ह वाटतात.

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

अन्न सुरक्षा कायदा - अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम करणार?

Submitted by सावली on 27 August, 2013 - 23:38

नविन अन्नसुरक्षा कायदा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम करेल?
आणखी २/ ५ वर्षांनी देश डबघाईला येऊन पार दिवाळखोरीच्या दिशेने जाईल का?
आधीच्या बिपीएल, रेशन वगैरे योजना मधे आणि यात काय फरक आहे?
आधीच्या योजना बंद होऊन नव्या योजना चालू होणार का? कारण आधीच्या योजनांनुसार आधीच अतिशय कमी दरात धान्य उपलब्ध आहे.
या योजनेचा फायदा नक्की कोणाकोणाला होणार आहे?
या योजनेमुळे गरीबी रेषेखालच्या लोकांना विशेष मेहेनत न करता जगण्याची सवय लागेल का?
महागाई कशी आणि किती प्रमाणात वाढेल?
त्यामुळे आत्ता जेमतेम मध्यमवर्ग असलेला एक समाजसुद्धा गरीबी रेषेखाली ढकलला जाईल का?

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

Submitted by पाषाणभेद on 17 August, 2013 - 21:05

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

शब्दखुणा: 

घसरता रुपया

Submitted by विजय देशमुख on 20 June, 2013 - 00:25

गेल्या काही दिवसात रुपयात प्रचंड घसरण चालु आहे. आज डॉलरमागे ५९.९४ रुपये असा भाव आहे. युपीए सरकारच्या स्थपनेच्यावेळी हाच भाव ३४ रुपयांच्या आसपास होता. रुपया घसरण्यामागे नेमकं कारण काय आहे? रुपया घसरला म्हणुन महागाई वाढलीय (कारण प्रेट्रोल साठि द्यावी लागणारी जास्त रक्कम). खुद्द पंतप्रधान अर्थतज्ञ्य असुनही अशी वेळ का येतेय?

याचा पुढचा टप्पा म्हणजे आर्थिक दिवाळखोरी किंवा आर्थिक संकट आहे का?

की पैसा असुनही तो योग्य प्रकारे वापरल्या जात नाही आहे.

मला अर्थशास्त्रातलं काहीही कळत नाही, त्यामुळे कोणी सोप्या शब्दात सांगीतल तर बरं होईल.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण