केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात आता फक्त सहा सिलेंडरवर सबसिडी मिळेल ,सातवा सिलेंडर बाजारभावाने रु ७२० ते रु ७८० च्या दरम्यान मिळणार .याचे मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होतील?

डीझेलची दरवाढही पाच रुपये प्रतिलिटर झाली आहे. इंधन दरवाढ गेले काही सततचीच बाब झाली आहे. वीजेच्या वापरावरही भरमसाट खर्च मध्यमवर्गीयांना करावा लागत आहे .
.
उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन !
रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत..
भ्रष्टाचार - - बेसुमार
महागाई -- बेसुमार
भाववाढ - - बेसुमार
वाहने -- बेसुमार
लोकसंख्या - - बेसुमार
अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार
घुसखोर -- -बेसुमार
रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार
रस्त्यात खड्डे .. ! ! !
आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली ..
"बेसुमार" म्हणून ओरडणारे..
मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून -
घरातच का बरे गप्प बसून रहातात - ?
त्याचं आणि माझं बजेट आणि क्रयशक्ती
नमस्कार,
टर्म इन्शुरन्स बद्दल काही प्रश्नः
१. टर्म इन्शुरन्स मधे कुठला चांगला आहे (तुमच्या अनुभवानुसार)?
२. आय सी आय सी आय चा ऑनलाईन इन्शुरन्स कसा आहे? (त्याय मेडिकल टेस्ट नाही)
३. आय सी आय सी आय चा सोडला तर इतर बाकी सगळ्यात मेडीकल टेस्ट आहे. मेडीकल टेस्ट न करता इन्शुरन्स घेण्यात क्लेम च्या वेळी गडबड होउ शकते का?
नाशिक मधे काम करताना खोट्या नोटांचा फार त्रास होत आहे... १००० आणि ५०० च्या नोटामधे फारच खोट्या नोटा दिसुन येतात... बँकेत पैसे भरताना चा त्रास वेगळाच ... १ लाख भरताना ५ नोटा १००० च्या खोट्या निघाल्या..म्हणजे ५००० चा फटका..:( बँक डायरेक्ट फाडुनच टाकते...वर आपल्या नावाची कंप्लेंट सुध्दा..पोलिसांना चा त्रास सुध्दा..काही माहीती होती खोट्या नोटा कश्या ओळखायच्या तरी सुध्दा येतच होत्या..वर बँक वाले पण निट सांगत नाहीत... भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक मधे काम करणारे लोक ग्राहकांवर उपकारच करतात काम करुन ......अश्या थाटातच वावरत असतात.. उडवाउडवीची उत्तरे मिळतात..
'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे.
"आज रुपयाचा निच्चांक".
"रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत आतापर्यंत सर्वात कमी."
"रुपया ५५ रुपये पर्यंत घसरला"
"आज रुपया परत घसरला, आजचे मुल्य ५६ रु प्रती $"
अरे काय आहे हे, आठ-दहा दिवस झालेत रोज ह्याच बातम्या पाह्तोय. का आणि कश्यामूळे ही घसरण.
आज परत हेच कारण सांगितले ७.५० रु पेट्रोल भाववाढीस. म्हणजे परत सर्व जिवन आवश्याक वस्तु महागणार. व्यापारी, ठेकेदार , दलाल वस्तुंची कृत्रीम टंचाई करून यात भर घालणार.