माझा उद्योग...
नमस्कार मायबोलीकर,
माझा मागील धागा आमच्या स्पोर्टस ट्रेनिंग सेंटरचा होता, खूप उत्साहाने हे प्रोजेक्ट बनवलेले आहे, पण कोरोनाने मुले घरात, शाळा, ट्रेनिंग सेंटर बंद!
त्यामुळे आम्ही पण गप्प बसलो. पण हे गप्प बसणे पण झेपेना! काहीतरी करायला हवेच ना! काय करावे बरे?
मी विचारात होतेच....
आणि अचानक....
झाले असे, मला चिंच फार प्रिय...चिंच नाही मिळाली तर चिंचेचा पाला खाणारी मी! मधे सार बनवायला चिंच आणली. बघते तर चिंचेची सालं, रेशा, पाने सगळे त्याला चिकटलेले, तशीच ती दाबून पॅक केलेली.
नव्या ने मंजूर करवुन घेतलेल्या शेती विषयक कायद्यां बद्दल चर्चे साठी धागा.
कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द केल्या गेल्या आहेत. कायदा लागू झाला की त्यांचे काम थांबेल. तिथे काम करणार्या मजुरांचे रोजगार जातील व तिथे माल विकायला आणणार्या अल्प भूधारक शेतकर्यांचे सेफ्टी नेट निघून जाईल. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ह्या बाबतीत आमूलाग्र बदल घडवणा रे व नव्या पद्धती लागू करणारे हे कायदे आहेत. पण ह्यात नक्की भले कोणाचे होणार आहे हे उमजत नाही आहे.
मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..
कागदोपत्री इथला स्प्रिंग सुरु झाला म्हणे. गार्डन सेंटर्स मधे बियांची पाकिटे, अंगणातल्या गवतासाठी वीड & फीड ची पोती , माती, कॉम्पोस्ट , सीड स्टार्टिंग मिक्स यांच्या बॅगा दिसायला लागल्या. फोर्सिथिया, मॅग्नोलिया, चेरी ब्लॉसम यांच्या फांद्या टपोर्या कळ्यांनी डवरल्या आहेत. क्रोकस , हायासिंथ, डॅफोडिल्स बहरले आहेत. बर्फाच्छादित रस्ते आणि अंगण काही काळा करता विसरायला हरकत नाही ( बहुतेक) .
इथल्या मंडळींचे बागकामाचे काय बेत यावर्षी ? विंटर सोइंग केलं का कोणी ? अर्ली स्प्रिंग व्हरायटीज काय काय लावणार ?
भारतात किंवा परदेशात विविध प्रकारचे बागकाम /शेतीकामासंबंधी लहान-मोठे अभ्यासक्रम आणि कार्यशाळा होत असतात. काहीवेळा प्रत्यक्ष जाऊन सहभाग घेणे अपेक्षित असते तर काही वेळा ऑनलाईन कोर्स किंवा वेबिनार असे स्वरुप असते. तुम्हाला अशा उपक्रमांबद्दल माहिती असेल तर ती माहिती इतरांना देण्यासाठी हा धागा.
.
मी भूमिपुत्र
सर्व भुकेल्यांचा मित्र
जीवन विखुरले हो सर्वत्र
गोठुनि गेली आता काळरात्र
मी भूमिपुत्र
कष्टाळलेे माझ्या जीवनाचे चित्र
रंग सर्व उडुनि गेले
रक्ताचा लाल उरला मात्र
मी भूमिपुत्र
सामान्य जगण्यांसही अपात्र
बायको मुलांस न देवू शकलो
सुख समृद्धीचे स्थिर छत्र
मी भूमिपुत्र
कर्जात जाहलो गलितगात्र
नव्या मौसमाच्या आधारे
उमीद जागवून राहिलो मात्र
भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.
पाणी
पाण्यावाचुन घसा कोरडा,
सर्वांचा जिव कोंडला।
पाण्यामुळ बळीराज्याचे कर्ज वाढले,
जिव देऊन केले मोकले।
मुक्या जिवाचे हाल देखवेना,
काय करावे काय सुचेना।
पाण्यासाठी केला निसर्गाचा धावा,
निसर्ग म्हणाला पाहिले झाड़े लावा।
झाड़े लावून करू धरती हिरवीगार,
निसर्गाचे मानु आभार।
माणुस म्हणुन आपले कर्तव्य,
पाणी संवर्धन हेच आपले लक्ष।