आमच्याकाळी काय एक एक सिरीयल असायच्या!
तेव्हा असं ढ्याण ढ्याण ढ्याण करून तीन वेळा बटबटीत मेकअपचा क्लोजअप नसायचा. सिरीयलमधले लोक अभिनय करतायत आणि त्यांना कुणीतरी त्याचे पैसे देऊ करतंय असंच मुळी वाटायचं नाही. अहाहा! काय ती अमुक सिरीयल! अहाहा!काय ती तमुक सिरीयल!
ह्या असल्या चर्चा आताशा फार होऊ लागल्या आहेत. आणि चर्चा करणारे माझ्या आई वडिलांच्या वयाचेही नाहीत! ते माझ्याच वयाचे आहेत!
आई-वडील आनंदाने ढ्याण ढ्याण बघतात.
तो: हॅलो.
ती: हं बोला.
तो: काय गं, झोप झाली का?
ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.
तो: हं.
ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.
तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?
निसर्ग, ऐतिहासिक, खाद्य संस्कृति, पारंपारिक, प्राणी--वर्णन आणि व्यक्ति-वर्णन तसेच अनेक विषयांवरती लिहणारी सर्वांची आवडती, अभ्यासु व अष्टपैलू लेखिका जागू (प्राजक्ता म्हात्रे) यांचा लेख शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसत्ता पेपर मधे वास्तुरंग या सदरात आला होता. काही गोष्टी माहित नव्हत्या त्याची सुद्धा माहिती मिळाली. छान लेख जागू. लेख आल्या बद्दल अभिनंदन...
बातमी लिंक साठी येथे क्लिक करा https://epaper.loksatta.com/2308060/loksatta-mumbai/31-08-2019#page/12/2
९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत .
ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.
२३ तारखेला लोकसभेचा निकाल लागल्यापासून सर्वत्र मोदी मोदी चाललेय. त्यांचे यशही मोठे आहे. पण ह्या सगळ्यात सुरतमध्ये जे अग्नी तांडव झाले, ज्यात अंदाजे २१ विद्यार्थ्यांनी आपला जीव गमवला. ही बातमी अगदी थोड्या वेळासाठी न्युज चॅनेल वर दाखविण्यात आली. नंतर जणू काही झाले नाही असे सगळे विसरले
सगळी माध्यमे जाऊ द्या, इकडे मायबोली वर पण कोणी काहीच बोलताना दिसले नाही.
असे का बरे????????
जर हा निवडणूकांचा काळ नसता, तर ही नक्कीच ब्रेकिंग न्युज असती????
हीच का लोकशाही, जिथे सामान्य माणसापेक्षा नेते , राजकारण श्रेष्ठ.
नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्या मधे भारतीय माध्यमांनी आदर्श वस्तुनिष्ठ बातमीपत्र म्हणजे काय असते याचे वस्तुपाठच जगाला घालून दिले आहेत. या वाहीन्यांचा अभ्यास आता जागतिक स्तरावर चालू आहे असे समजते. युद्धाचे रिपोर्टिंग कसे करावे याबाबत फॉक्स टीव्ही मधे भारतीय माध्यमाचे दाखले दिले जात आहेत. सीएनएन ने सर्व वाताहरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसी या वाहीनीची तर भारतीय माध्यमांनी केलेल्या शोधपत्रकारीतेने लाजच गेली आहे. खालील वाहीन्या / निवेदक यांची थोडक्यात वैशिष्ट्ये
आताच टीव्ही बघताना एका चॅनलवर व्हिडीओ दाखवत होते, तोही बातम्यांमध्ये...
"पुण्यातील सोनवणे कुटुंबियांनी केला कोंबड्याचा वाढदिवस"