अगदी आजचीच बी. बी. सी. मराठी (वेबसाइट) बघत होतो....तशी अधून मधून बघतो....पण मला ती बव्हंशी एकांगी (मुद्दाम काड्या करणारी) अशी वाटते.
आपल्या शेजारच्याचा नेहमीच उल्लेख असतो. बरेच वेळा गडे मुर्दे उखाडून काढ्ण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न वाटतो. आज बैरूत ब्लास्ट बद्दल बातमी वाचावी म्हणून उघडले तर 'त्या' देशाची व्यक्तव्ये, जम्मु कश्मीर, बाबरी मस्जिद, ओवेसी आणी मुस्लिम लॉ बोर्ड ह्यासंर्भात ठळकपणे बातम्या आहेत. बैरूत ब्लास्ट बद्दलअवाक्षरही नाही!!
आपला काय अनुभव आहे?
ह्यांचा विचार काय आहे?
वी लिव इन इंटरेस्टिंग टाइम्स...
३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती.
नमस्कार,
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच ही सीरिज पहिली असेल, किंवा काहीजण आत्ता पाहत आहेत. सर्व कलाकारांचे दमदार अभिनय आणि वेगवान कथा ह्या बलस्थानांमुळे मलाही ही सीरिज प्रचंड आवडली. या धाग्यावर स्पोईलर सकट चर्चा करायला नक्की आवडेल मला, म्हणून हा वेगळा धागाप्रपंच...
बर्याचदा आपण व्यक्त होतान उस्फूर्तपणे होत असतो. सोशल मिडियाही त्याला अपवाद नाही. त्या त्या वेळी उठणारे मानसिक, वैचारिक तरंग हा तात्कालिक घटक प्रभावी ठरत असतो.कधी तो स्कोअर सेटलिंगचा भाग असतो. वैचारिक उन्माद व्यक्त करणार्यात बुद्धीदांडग्यांना प्रतिक्रिया देताना संयत असणे आपण विवेकी मानतो.परंतु उन्मादाचा प्रभाव असणार्या् व्यक्तिच्या मेंदुपर्यंत ती पोहोचते का?
करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
आता करोना वायरसचा विळखा जगातल्या प्रत्येकालाच धरू पाहात आहे. लोक वाटसप ग्रुप किंवा फेसबुक माध्यमांत चर्चा करत आहेत. अशावेळी मायबोलीवर आपलं मत मांडणं, शंका विचारणं यासाठी तरी संपादकांनी/मालकांनी खरडफळा चालू करावा असं मला वाटतं.
इतर काही कारणामुळेही मोठा लेख पाडता येत नाही अशा गोष्टींसाठी खरडफळा आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटतं?
मागील आठवड्यात विकेंडला गावी जाऊन यावे म्हणुन शुक्रवारी भल्या पहाटे उठुन आवरुन बॅग भरुन ८ वाजताच ऑफिसमधे आलो. येताना ऑफीसच्या बसमधे ड्रायव्हरने मोठ्याने रेडिओ लावलेला होता. अगदी नव्या सळसळत-फेसाळत-उसळणार्या गाण्यांनी आणि निवेदकाच्या आरडा-ओरडा करीत कानावर आदळणार्या गोंगाटाने जीव मेटाकुटीस आला होता. अधेमधे जाहिरातींचा भडिमार सुरू होताच. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शब्द कानावर आदळत एकामागोमाग एक जाहिराती येऊन फेर धरत होत्या. त्यातली एक कसलीशी इंशुरन्स गाठ पॉलिसीची जाहिरात एका ब्रेकमधे ३-४ दा येत होती आणि ती सतत ऐकुन पोटात गोळा उठत होता.