मित्र दे रे (या निडणुकीत व्हाट्स अप् वर मित्र तुटतांना पाहीले अत्यंत टोकाची भूमिका घेवून भांडतांना पाहीले ,खूप वाईट वाटले . )
*****
संवाद साधून
घेई समजून
व्यर्थ व्यवधान
सुटे मग ॥
सुटे अभिमान
शंकेचे कारण
मैत्रीचे मरण
होई जेणे॥
देई रे हसून
घेई रे हसून
उघडी बोलून
कथा व्यथा ॥
होताच अवघे
मित्र जिवलग
आनंदाची बाग
जग होय ॥
दिल्याविना काही
मिळत ते नाही
कर्माची ही पाही
रित असे ॥
विक्रांत मैत्रीला
सदैव भुकेला
सांगतो दत्ताला
मित्र दे रे ॥
'आजचा सुधारक' हे नियतकालीक अनेक वर्षे सातत्याने चालल्यानंतर बंद पडले होते. त्याचे या महिन्यापासून पुनरुज्जीवन होते आहे. थोडेफार डावीकडे झुकणारे लिखाण असले तरी जगभरातील आजच्या राईट वींग प्रवृत्तींना ते टक्कर देऊ शकतील का ते पहायचे. निवडणुका जवळ आल्यामुळे हा अंक राजकारणावर आहे.
अस्मादिकांचाही एक लेख या पहिल्या अंकात आहे. भल्या बुऱ्या प्रतिक्रिया जरुर द्या
http://www.sudharak.in/
शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत. किंबहुना तुम्हाला जर स्वैपाकातलं काही काळात नसेल तर तुमची आई/बायको किंवा अगदी स्वैपाक करण्यासाठी ठेवलेली मोलकरीण तरी तुम्हाला स्वैपाक कसा करायचा या बद्दल मत विचारेल का आणि तुम्ही जरी स्वतःहून सांगितलं तर लक्ष देईल का?
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
डॉनल्ड ट्रंप आणि अमेरिकेतील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी हा धागा. फक्त राजकीय घडामोडी आणि त्यांचे परिणाम यांची चर्चा करायला हा धागा वापरा.
जनरली आपण गप्पा मारताना सरकार, समाज/लोक यांचा विषय आला, की "पूर्वीपेक्षा आता बेकार आहे" असा टोन आपोआप ऐकू येतो. दहा वर्षांपूर्वी, वीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या परिस्थितीबद्दल तसेच ऐकू यायचे. मग प्रश्न पडतो की हे सगळे चांगले होते कधी? गुलजार च्या 'मेरे अपने' मधले हे गाणे ऐकले तर पूर्वीही लोक तसेच म्हणत असेच वाटेल.
थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.
,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
आजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.
युतीचे शासन आले म्हणजे
"नाथ" नेहमीच चर्चेत असतात
विरोधक सुध्दा मिडीया आडुन
बाण नेमका वर्मी मारतात
मागे "बरखा" एकदा
नेमके असे झाले.
कामा पेक्षा हेच प्रकरण
लोक चघळत राहिले
घ्यायचाय त्यांनी घ्यावा
यातुन एक धडा
कारभार करताना शत्रू नको
मित्रही चार जोडा