मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अॅटो करेक्ट, अॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल.
आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.
हल्ली मला वाढत्या पोटाची भयंकर भीती वाटू लागली आहे आणि त्यापेक्षाही त्याच्यावर उगीचच सल्ले देन्यार्यांची तर जरा जास्तच...पोटा वर ( अर्थातच वाढत्या ) फुकट सल्ले देनार्याना सरकारने " पोटा " च्या कायद्या खाली अटक करावी असाच वाटू लागलय आता . " सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला,पहाटे उठून रोज पलायाला जावा " इति पितामह .." तू .... आसन करायला सुरवात कर आणि मघ बघ सकाळी केलास तर दुपारपर्यंत २ इंच पोट कमी ......८ दिवस कर पोट कुठ आणि पाठ कुठ आहे हे बघनार्याला शोधून ही सपदयाच नाही ....
मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.
हे मृत्यो...
==========
१.
वीजेने थोडंस क्षितिज किलकिलं करावं
तेव्हां अथांग निळाई अंगावर येईल
कदाचित
तेव्हां क्षितिजाची रेषा
निळसर जांभळी होत जाईल
तिथे कदाचित तू असशील..
आज म्हटलं बसावं
तुझ्याशी निवांत बोलावं
गप्पा टाकाव्यात
आणि थेट तुझ्याशीच
मैत्री करावी
--------------------------------------------------
२
लाल पिवळा नारंगी भगवा
सगळ्या रंगात रंगायचंय अजून
हिरव्या कांचनमृगाने हाक दिलीये
तू कुठेतरी वाहत असशील नदीतून
आताच नकोय तुझाशी
निळी जांभळी नजरानजर
--------------------------------------------------
३
एक पान पिकलेलं
दुःख गंधाळून गेले !
ओठ सुकले, पापण्यांचे काठही वाळून गेले
पावसा रे, लांबुनी जाणे तुझे जाळून गेले !
वेदनांचे वेद गाणाऱ्या दरिद्री माणसांनो
त्याग केलेल्या जनांचे दुःख गंधाळून गेले !
तू असेतो कैक तारे चेहरे झाकून होते
तू निघाला , काजवेही फार चेकाळून गेले !
"कोवळ्या कोँबांतला टाहो कुणी ऐका जरा ना "
वांझ झालेले बियाणे आसवे ढाळून गेले !
संत योगी झुंजले ज्या भ्रष्ट मार्गाच्या विरोधी
शेवटी ते राजनीतीलाच ओवाळून गेले !
लाख वेळा बोललो श्वासांस थांबा एकदाचे
तू उभी दारात नी ते नेमके पाळून गेले !
@तरी गीत गावे@
रुसावे फुगावे
तरी गीत गावे
नभी मेघ येती
लपेटून कावे
फुलालाच नाही
सुगंधी सुगावे
जगा हासवाया
उरा अंथरावे
दहा मैल चारा
सहा हात दावे
खरा न्याय द्याया
पुरावे पुरावे
इथे श्वान झाले
सराईत छावे
सुखे वंचितांचे
स्वतः देव व्हावे
- राजीव मासरूळकर
मासरूळ ता जि बुलडाणा
उसासे
मला काय झाले
उरी युद्ध चाले
उन्हाला खुणावी
तमाधीन प्याले
सुखाच्या दूकानी
दुखाचे मसाले
सले पावसाला
(ढगांचे उमाळे)
मतांच्या महाली
पडे रोज घाले
वसंतास सांगा
फुलोरे गळाले
हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?
हसू लागता मी
उसासे निघाले !
- राजीव मासरूळकर
मायबोलीवर प्रथमतःच लिहितो आहे . इथल्या वातावरणाचा सराव नाही . सर्वाँच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे .
उसासे
मला काय झाले
उरी युद्ध चाले
उन्हाला खुणावी
तमाधीन प्याले
सुखाच्या दूकानी
दुखाचे मसाले
सले पावसाला
(ढगांचे उमाळे)
मतांच्या महाली
पडे रोज घाले
वसंतास सांगा
फुलोरे गळाले
हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?
हसू लागता मी
उसासे निघाले !
- राजीव मासरूळकर
मायबोलीवर प्रथमतःच लिहितो आहे . इथल्या वातावरणाचा सराव नाही . सर्वाँच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे .
सह्याद्रीवर दूरदर्शनचे सुवर्णक्षण दाखवले गेले. कुणीतरी आवर्जून फोन केल्याने टीव्ही लावला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. पडद्यावर पथनाट्याच्या धाटणीचं एक नाटक सादर केलं जात होतं. वेटिंग फॉर गोदो या नावाचं ते नाटक... सुरूवातीला काही कळेचना. माझ्या मेंदूच्या आकलनाच्या सीमा ढवळून काढणारं काहीतरी समोर घडत होतं आणि सुन्न करणारा एक अनुभव घेऊन मी अवाक होऊन गेलो होतो. एक जबरदस्त संहिता ! कुणी लिहीलीये हे या क्षणाला माहीत नाही, कधी लिहीलिये हे ही माहीत नाही. पण टाईमलेस अशी ती कलाकृती होती.