टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.
शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!
तो 'दिवस'च किती छान होता..!!
दिवसभर काबाडकष्ट करून 'दिवस' जेव्हा घरी यायचा
'रात्र' चुलीवर भाकऱ्या थापत बसलेली असायची
वंशाचा 'दिवा' क्षणार्धात उजळायचा
दिवसाने त्याच्या डोळ्यातले मोती मोजायचे
रात्रीने दोघांकडे प्रेमाने पाहायचे
जरासे इथे तिथे करपलेले चंद्र सर्वांनी आनंदाने गिळायचे
आणि
रात्रीच्या खांद्यावर हात ठेवून
सूर्याला कडेवर घेवून
दिवसाने उगाचच आभाळातले चंद्र मोजायचे..
आभाळात मिणमिणते तारे बघूनच खुश असणाऱ्या सूर्याकडे बघत
मग थकून दिवस मालवायचा एकदाचा
सर्वापासून लपवलेला आकाशातला चंद्र
त्याच्या डायरीत चिकटायचा एकदाचा..
आणि रात्रीच्या केसात हात फिरवत
'अजून एक बनव' - एका हाताने ग्लास सांभाळत आणि एका हात टेबलावर ठेवून स्वत:ला सावरत शाहिद अस्पष्ट बोलला.
'बस..बस..पुरे..आधीच चढलिये तुला..' - लोकेशने समजूत घातली..
'@#%&, टाक रे..' .. शाहिदचा स्वर आता थोडा भिजून हलका झाला होता..
'अरे पण झाल तरी काय?..कोणी काही बोललं का? ती काही बोलली का ?... आपण काहीतरी मार्ग काढूच की..सांग तरी... ' - लोकेश
भारतात यायचं खूप दिवस चाललं होतं. एकदाचं ते स्वप्न पूर्ण झालं. मी भारतात पोहोचले ते पावसाळ्याचे दिवस होते. पहाटे एक वाजता विमान सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. इतक्या पहाटे उतरल्यावर काय करायचं हा प्रश्न होताच. पण विमानतळावरची अद्ययावत व्यवस्था पाहून थक्क झाले. जगातले सर्व पर्यटक भारतातच का येतात हे विमानतळावरच समजतं. विमानापासून असलेले सरकते पट्टे (प्रवाशांसाठी ) आणि सामानासाठी वेगवेगळे असले तरी ग्रीन चॅनेलच्या तोंडाशी आल्यावर आपलंच सामान आपल्याकडेच येत असताना दिसतं. ही व्यवस्था जगात कुठेच पाहिलेली नसल्याने अनेक परदेशी पर्यटक देखील आश्चर्य व्यक्त करताना दिसले.
पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन
डॉ. आयन स्टिव्हन्सन
स्व. डॉ. स्टीव्हन्सन यांचे पुनर्जन्मावरील संशोधन ग्रंथ फार मोठे आणि सहज उपबलब्ध होण्यासारखे नाहीत. उपलब्ध झाले तरी ते वाचण्याची तसदी सहसा कोणी घेत नाही. हे माहित असल्यामुळे बुद्धिवादी लोक या प्रकरणांविषयी व सिद्धांताविषयी धडधडीत खोटे लिहिण्याचे धाडस करीत असतात. म्हणूनच हे ग्रंथ मुळात वाचण्याची शिफारस केला आहे. त्यामुळे हे लोक खोटे लिहायला किती निर्ढावलेले आहेत याची कल्पना येईल.
मायबोलिकर्स आहेत का सध्या कोनि stamford/norwalk मधे?
Want information on marathi /indian groups activites, festival around norwalk/stamford.
धन्यवाद!!!
याआधी मी एक प्रश्न विचारला होता " इंटरनेट हे व्यसन आहे का ?"
गर्भसंस्कार म्हणल की आपल्या समोर अनेक गोष्टी येतात. नेमके काय करायचे या बाबत अनेक होणार्या आई वडिलांच्या मनात संभ्रम असतो.संस्कार म्हणजे सातत्याने केलेला प्रयत्न.संस्काराची व्याख्या करताना " संस्कारोही गुणांतरधानम्"अशी केली जाते. संस्कार म्हणजे वाइट गुणांचे चांगल्या गुणांमधे रुपांतर करणे. होणार्या आई वडिलांना जेव्हा आम्ही विचारतो, की, संस्कार म्हणजे तुम्हाला काय अपेक्शीत आहे? तुमच्या बाळा मध्ये तुम्हाला कोणते गुण असावेत असवाटत? तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम दिसुन येतो. त्यांना अस वाटत असत की आपल्या बाळा मध्ये शिवाजी, राम, स्वामिविवेकानंद यांच्यासारखे गुण असावेत.
ऑर्कुटचं अकाऊंट डिलीट करून दोनेक वर्ष झाली तरी मी फेसबुक जॉईन केलं नव्हतं. मित्रांच्या एका ग्रुपने ओपन करायला लावलं म्हणून हल्लीच फेसबुक वर आलो. अकाऊंट ओपन करताना जीमेल मधले सगळे कॉण्टॅक्ट्स फेबुने वापरले. काही दिवसांनी पाहतो तो मी आपोआपच कवितांच्या काही ग्रुप्सचा मेंबर झालो होतो. माझं जीमेल अकाऊंट या सगळ्या कवितांनी भरून गेलं होतं. हे सगळे मेल डिलीट करता करता भरपूर वेळ गेला. पण पुन्हा त्याच वेगाने ते भरत गेलं.
सध्या ब-याच संस्थळांवर बरेच जण बरंच काही लिहीत आहेत. बरेच हा शब्द मागे पडून बहुतेक हा शब्द देखील मागे पडतोय आणि जवळजवळ सर्वच असा नवाच शब्दप्रयोग रूढ होऊ पाहतोय. पूर्वी कसं मोजकेच लोक लिहायचे. इतरांना त्यांचं अप्रूप असायचं. ते देवलोकातून आले असावेत असं लोकांना वाटायचं. काही जण तर त्यांना हात लावून पहात असत. आता मात्र सगळेच लिहू लागल्याने लिहीणे म्हणजे विशेष काय ते असं वाटू लागलं आहे. उलट जे कुणी लिहीत नाहीत त्यांच्याबद्दल हल्ली अप्रूप वाटतं. न लिहीता हा मनुष्य कसा काय राहू शकतो असं वाटून लोक त्यांना हात लावून पाहताना दिसतात.