शाळा.....

Submitted by विनीत वर्तक on 14 June, 2013 - 10:41

शाळा.....

शाळेचे दिवस असतात किती सोनेरी. प्रत्येक आठवण कितीही छोटी असली तर आपला एक घर करून असते. तोच तो किलबिलाट मुलांचा. तेच ते वर्ग तेच ते बेंच त्यावर कधी आपण इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केल्या होत्या तीच ती खिडकी त्यातून आपण गच्ची शोधायचो आपल्या घराच्या बाजूची आज शाळेजवळून जाताना हेच मनात येत. आयुष्याची १५ वर्ष आपण इकडे काढली. त्या नंतर आता १८ वर्ष झाली पण ती १५ वर्ष आयुष्यातील सगळ्यात सोनेरी होती.

त्या ३ बेल रोज शाळा भरताना होणार्या आणि सगळ्यात जास्ती लक्षात तर मधल्या सुटीच्या त्या बेल ची तर इतकी आतुरतेने वाट बघयायचो. एक दिवस असा गेला नाही कि मधली सुट्टी झाली नाही. मधल्या सुट्टीमधील एकमेकांचे डबे खाण आणि मस्ती. शाळेतल्या त्या बाकांवर करकटकाने कोरलेले ते शब्द आणि शाळेतल्या भिंतीवर लिहिलेली कोपी अजून हि तसच अगदी कोरलेल आहे. प्रत्येक बेंच खास त्या साठी खास हलवा हलव बाकांची आणि जागा पकडण्यासाठी केलेली धावपळ अगदी पिऊन चा डोळा चुकवून सगळ्यात आधी शाळेत घुसण्यासाठी केलेली धडपड १२.४० च्या शाळेसाठी ११.१५ ला रांगेत उभ राहाण आणि सगळ्यात आधी वर्गात जाण सगळच आठवते.

शिक्षकांच्या हातचा खाल्लेला मार आणि शिक्षेसाठी वर्गबाहेर काढल्यावर दुसर्या वर्गातल्या मुलांबरोबर होणारी मस्ती त्याच बरोबर मुलींचे ते तिरके कटाक्ष सगळच आहे. वर्गातल्या फ्यान वर मारलेले खडूचे तुकडे आणि सोडलेली रोकेट आणि वर्ग मोनितर ने नाव लिहून मारलेल्या २५ फुल्या आणि तरीसुद्धा त्याला न जुमानता आपले पेनाचे चाललेले खेळ. मधल्या सुट्टीत कागदाच्या बोल आणि वहिने चालेलेल क्रिकेट ज्याची तोड आजच्या २०-२० ला पण नाही. वाचायला मिळाव म्हणून वर्गात केलेलं झोपेच नाटक आणि बेंच वर फक्त तिच्यासाठी सोडलेली जागा. ते तुझ लाजून हसण आणि हळूच मग मैत्रिणीशी बोलण मग मी उगाच तुझ्याकडे बघत राहाण सगळच आहे आजही तिकडेच.

अभ्यास करणे कधी जमलेच नाही व्यवसाय तर कधीच सोडवून आणला नाही. तरीपण काही शिक्षक अगदी जीव तोडून शिकवणार आणि खरच त्यांचा तास अगदी लक्ष देऊन ऐकणार. पाठीवर बसणारे ते धपाटे आणि हातावर मिळणारा पट्टीचा मार आणि कानाला बसणारा पीळ, बाकावर उभ राहून पूर्ण वर्गाच स्मारक त्यातही कितीही लागल तरी इज्जतीचा प्रश्न म्हणून गप्प बसणारा मी अजूनही तसाच आहे. पी टी च्या तासाला लंगडी साठी भांडणारे आपण आणि त्याच वेळी हरलो म्हणून रागावणारे एकाच वर्गातले आपण शाळेच्या मासिकासाठी कधी एकत्र काम करायचो ते कळायचं सुधा नाही.

शेवटच्या लाईन मधला तो शेवटचा बेंचच्या खालची जागा म्हणजे हक्काची झोपायची जागा. ती जागा कोणतेच शिक्षक कधी शोधू शकले नाहीत. परीक्षेच्या आधी आखा बेंच उत्तरांनी भरून जायचा आणि मग परीक्षा देताना ते लपवण आणि पकडल तर मी नाही कोणी लिहिल ते माहित नाही म्हणून सांगण ती शाई ती अक्षर अजून तशीच आहेत. शेवटचा पेपर संपल्यावर भेळ खाण. उत्तर पत्रिका बांधताना त्याला १५ गाठी मारण आणि ते दोरे उगाच मागण. शाळा सुटली कि जीवाच्या आकांताने धावण, ती रांगेतील धक्काबुक्की आणि हुशार मुलींचे ते तिरके कटाक्ष बघून सांगण कि मी नाही मागून धक्का आला. खाली उतरल्यावर टवाळक्या करण. तू बस पकडे पर्यंत तिकडेच तुला बघत थांबण आणि मग बसच्या बरोबर घरी जाण.

तिळगुळ समारंभ ला एकदम छान छान कपडे घालून सगळ्या वर्गात उगाच फुशारक्या मारत फीरण आणि शिक्षक दिनाच्या दिवशी सगळ्या वात्रट मुलांना सांभाळण्याच कंत्राट घेण अजून हि लक्षात आहे. प्राथनेच्या वेळी जय हिंद म्हणताना तो हात जोरात फिरवण कि बाजुच्याला लागलच पाहिजे. टीचर्स रूम मध्ये जाताना नकळत पेपर बघण आपल्या मार्कांपेक्षा दुसर्याच्या मार्कांची चौकशी करण आणि त्यात ते लक्षात ठेवण. तो शाळेचा शेवटचा दिवस अजून हि लक्षात आहे. त्या वेळी कधी शाळा बंद होते अस झालेल तर आज ती का बंद झाली अस वाटण. ते क्षण अजून हि तसेच आहेत. शाळा हि तिकडे आहे. पण बदलले ते विद्यार्थी आणि शिक्षक. ते बेंच आजही वाट बघतात त्या भिंती अजून हि तश्याच आहेत आणि त्यावर कोरलेली उत्तर सुद्धा.

आज शाळे जवळून जाताना सगळ आठवते. सगळे मित्र मैत्रिणी शिक्षक आणि ते वर्ग सगळच पण नाही आहे तो किलबिलाट मित्रांचा, नाही आहे ते ओरडणं शिक्षकांचं, नाही आहे तो माझा शाळेचा ड्रेस आणि नाही आहे तो माझा निरागसपणा............................

विनीत वर्तक

Group content visibility: 
Public - accessible to all site users