मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
सेवाभावी संस्था
डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार
स्नेहालयास मदत
प्रिय मित्रांनो , स्नेहालय परीवारातफे शुभेच्छा . आपण स्नेहालय परिवाराचे निकट सदस्य आहात. त्यामुळे एक महत्वाची विनंती आपणास करीत आहे. स्नेहालय सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या संस्थेचे बहुतांश प्रकल्प लहान, वैयक्तिक देणगीदारांच्या समर्थनावर काम करत आहेत. परंतु आपली गंगाजळी रिकामी झाल्याने दरमहा खर्चाचे सुमारे १२ लाख रुपये आपल्याला कष्टपूर्वक गोळा करावे लागतात. सध्या एड्स बाधितांचे रुग्णालय, हिमातग्राम, स्नेहधार, रेदिओनगर ९०.४ F.M. , पुणे स्नेहधार प्रकल्प, बालभवन प्रकल्प, अनामप्रेम, स्नेहालय ई- विद्यालय, अशा प्रकल्पांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सामाजिक उपक्रम - वर्ष २०१४ - पूर्वतयारी (सार्वजनिक धागा)
नमस्कार,
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सामाजिक उपक्रमाचे हे पहिले आवाहन.
गेल्या काही वर्षात आपण काही संस्थांना वस्तुरुपात मदत केली. त्या सर्वच संस्था शाळांशी निगडीत असल्याने त्यांना दरवर्षी मदतीची जरूर असतेच. त्यानुसार यावर्षी देखील जितकी मदत करता येईल ती करणार आहोतच पण त्याचबरोबर आपल्यापैकी कोणाची एखाद्या नवीन गरजु संस्थेची ओळख झाली असेल तर त्याबद्दलची माहिती मागवत आहोत.
ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालीलपैकी शक्य तितकी माहिती द्यावी.
१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
स्वयं सेवक म्हणून अनाथाश्रम,अंधशाळा,वृद्धाश्रम इ. ठिकाणी पुण्यामध्ये काम करणार्या गटांबद्दल माहिती हवी आहे.
स्वयं सेवक म्हणून अनाथाश्रम,अंधशाळा,वृद्धाश्रम इ. ठिकाणी पुण्यामध्ये काम करणार्या गटांबद्दल माहिती हवी आहे.
मी आंतरजालावरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त माहिती हाती लागली नहि. इथे असलेल्या वाचक माबोलीकारांनी या विषयावर अधिक माहिती दिल्यास खूप धन्यवद. कोणी स्वतः अशाप्रकारचे काम करत असल्यास कृपया कामाबद्दल सविस्तार माहिती द्यावी जसे कि कामचे स्वरूप , किती तास काम करत होतात,या व्यतिरिक्त स्वताची मते.
या शिवाय जर कोणी बाबा आमटे ,प्रकाश आमटे यांच्या संस्थेमध्ये जाऊन ५-६ महिने काम केले असल्यास त्या बद्दल पण सविस्तर लिहावे हि विनंती.
मेळघाट मैत्री शाळा - एक झलक
नुकताच मी मैत्रीतर्फे मेळघाटात जाउन परत आलो. खरेतर खूप जणांना, मैत्री आणि मेळघाट एकत्र उच्चारताच, सर्वप्रथम आठवतात, त्या वैद्यकीय संदर्भातील धडकमोहिमा. पण मी गेलो होतो शिक्षण संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमाकरता. मैत्रीच्या शैक्षणिक मोहिमेचे हे तिसरे वर्ष.
पहिल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०११-१२ शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, चिलाटी येथे १०० दिवसांची निवासी शाळा आयोजित केली होती. याद्वारे ४३ मुलांना शाळेत परत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात आले. त्या सर्वच्या सर्व मुलांनी त्यानंतरच्या वर्षी आपापल्या गावातल्या शाळेत प्रवेश घेतला.
अर्जंट वैद्यकीय उपचारांकरता मदत हवी आहे
माझ्या भारतातल्या शेजार्यांच्या फॅमेली मधे अर्जंट बायपास करायची आहे, १-१.५ लाख खर्च आहे.
मेडीकल साठी पैशाची मदत करणारी एखादी संस्था माहीती आहे का कुणाला?
पियु परी | 7 August, 2013 - 14:44
माझ्या एका ओळखिच्या आजोबांना ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यांची महीन्याची औषधे ६५,००० पर्यंत जातात.
काही मदत मिळेल का?
ती औषधे जरी त्यांना कोणी कमी किमतीत किंवा मोफत देऊ शकले तरी खुप झाले. पैसेच हवे आहेत असे नाही.
'मैत्री शाळा १०० दिवसांची – आपल्या गावी', मेळघाट - २०१३-१४
मैत्री संस्था, गेली १३-१४ वर्षे मेळघाटात चालू असलेल्या कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या धडक मोहिमांबरोबरच गेली दोन वर्षे डिसेंबर ते मार्च या काळात स्वयंसेवकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमही घेत आहे. पहिल्या वर्षी मैत्रीने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य ४० मुलांसाठी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. त्या नंतरच्या म्हणजेच मागच्या वर्षी ३ गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर १०० दिवस काम केले व त्यायोगे सुमारे ७० मुलांपर्यंत आपण पोहोचलो.
ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र
नमस्कार,
खुप दिवसांपासुन मला ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या धरतीवर काही तरी सुरु करायची इच्छा आहे. त्यात, हास्यक्लब,ज्येष्ठांना सोसवतील असे छोटे व्यायामप्रकार,योगासनं,प्राणायाम तसेच लायब्ररी, कधीतरी एखादी छोटीसी पिकनिक अशा गोष्टींचा अंतर्भाव असेल.
त्याबद्दल मला गाईडन्स हवा आहे.
(जयपूर घटनेच्या निमित्ताने) अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी काय करता येईल?
जयपूरला भर गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाला. एक अख्खं कुटूंब अपघातात सापडलं.
पती, छोटा मुलगा जखमी तर पत्नी आणि ६ महिन्याचं बाळं अत्यवस्थ. बाजूने रहदारी चालूच आहे. जखमी माणूस मदतीची याचना करतो आहे, आणि कोणीच मदतीला येत नाही मदतीसाठी थांबत नाही.
अतोनात वाईट वाटले. खूप हेल्पलेस. माणूसकी संपली आहे का खरचं असं वाटत आहे. का झालं असावं असं. आणि असं परत होऊ नये म्हणून काय करता येईल. त्यावेळी काय करता येऊ शकलं असतं. अपघात नुसत्या पहाणार्या लोकांना कमीत कमी काय करता आलं असतं.