मध्यंतरी ठाणे पाठपुराव्याला गेलो असताना सर्वप्रथम जयश्रीताईंची ओळख झाली. त्यांचं "योग आणि व्यसनमुक्ती" विषयावर भाषण ठेवलं होतं. विषयाचा आवाका प्रचंड होता आणि वेळ फारच थोडा. तेवढ्या वेळातही जयश्रीताई जे बोलल्या ते फार आवडलं आणि पटलं देखील. त्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेत त्यांचे विचार नीट समजून घेता आले. आणि त्याच वेळी वाटले की यांची मुलाखत आनंदयात्रीसाठी घेणे आवश्यक आहे. मुक्तांगणमध्ये योग हा व्यसनमुक्तीवरील उपचारांचा एक भाग म्हणून वापरला जातो. मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट म्हणजे मोठ्या मॅडम यादेखील योगाभ्यास करीत असत.
ते Subjective म्हणतात तसं असतं...ज्याचं त्याच वेगळं...त्याच्यापुरतं असलेलं...
असं अलगद येतं....
फारसा गाजावाजा नसतो त्याचा..सगळ्यांना सांगून नाही येत ते....
बऱ्याचदा ते सगळ्यांना सांगण्यासारखं नसतंच..ते एकट्याचंच असतं,एकट्यासाठी असतं !
फाटक्या माणसानं चंद्राची अपेक्षा ठेऊ नये.. त्याच्याकडे चंद्राच्या प्रतिबिंबाशिवाय काहीच हाती येत नाही!
प्रेम करावं ते मुली गटवण्यात हुशार असलेल्यानं, धंदेवाईक तोंडावर गोड बोलून स्तुतीसुमनं उधळून फ्लर्टींग येणार्यानं! मनात खरं प्रेम बाळगणार्या साध्या लोकांनी नाही. कारण आज ना उद्या त्यांचं हरणं निश्चित असतं!
मॉलमध्ये तिला इनडायरेक्टली प्रपोज करणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. यासाठी नाही की तिला ते आवडलं नाही पण यासाठी की तसं करुन मी तिला सगळ्यात जास्त दुखावलं होतं.
संपूर्ण प्रवासात ती घुम्यासारखी एकटी बसून होती. माझ्याकडे साधं बघायलाही ती तयार नव्हती.
ती माझ्याबरोबर जास्त बाहेर येत नव्हती. आत्ताच नाही याच्या अगोदरही.
कधीही कुठे ये म्हटलं तर तिचं आपलं, नको घरी जायचं आहे, उशीर होईल, पप्पा काय बोलतील?
अगं कधीतरी हो म्हण!
आणि हो, कंटाळा!
हा तर तिला उपजतच देवाने गिफ्ट म्हणून दिला असावा. मी काहीही ठरवावं आणि हीला कंटाळा आला नाही असं कधी झालंच नाही.
एकदा तिनं क्लासला दांडी मारली होती. मी समोरच्या एका पब्लिक बुथवरुन तिला फोन लावला. चार वेळा रिंग वाजल्यानंतर एकदाचा तिचा पार आळसाटलेला आवाज आला-
“हॅल्लो..”
“हॅलो*** कुठे आहेस?”
“घरी. झोपलेय”
“आत्ता?”
मी कितीतरी वेळ असा वेड्यासारखा स्वत:शीच हसत होतो.
खरं म्हणजे तिची आठवण येऊन मला तिचे मॅसेज वाचण्याची तिव्र इच्छा होणं आणि नेमकं त्याच वेळी तीनं असा मॅसेज पाठवणं- ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच नव्हती. होता तो निव्वळ योगायोग. पर्फेक्ट टाईमिंग जुळवून घडून आलेला!
काही काही चित्रं असतात… स्वप्नांमधली.. आठवणींमधली.. ती असतात आपल्याबरोबर. नेहमी. त्यांचं असणंही पुरेसं असतं कधी कधी, दिलासा द्यायला, दिशा द्यायला...
रात्री झोपताना असंच एक चित्र हल्ली बऱ्याच वेळा माझ्या डोळ्यासमोर येतं...
छे! ही पोरगी म्हणजे फार टीपिकल गोष्ट झालेय. काही कळायलाच मार्ग नाही. तीच्या वागण्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता.
हक्क गाजवत ही माझ्याशी अशी का वागतेय? ना ही माझी गर्लफ्रेंड, ना हीच्यात आणि माझ्यात काही होण्याची सुतराम शक्यता. मग प्रत्येक गोष्टीत तिचा- असं अधिकाराने बोलण्याचा अर्थ तरी काय?
म्हणजे हीनं तासनं तास तीच्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारलेल्या चालतात. पण मी कोणाशी बोलायचं म्हटलं तरी तीचं डोकं तापलं पाहिजे!
मला लिहायला आवडतं पण……
नवीन लिहिताना पहिल्यापासून भीती वाटते…आता कधीकधी वाटतं ती वाढत चाललीये...कारण लिहिण्यासारखं आता खूप काही आहे माझ्याकडं !
लिहायला बसण्याची वेळ माझी कधीच नक्की नसते...अजूनही...कितीही शिस्त वगैरे लावायचं ठरवलं तरीही अजुनपण काहीतरी खरंच सुचल्याशिवाय आणि लिहावंसं वाटल्याशिवाय लिहिलंच जातं नाही...कधी पटपट सुचत..कधी थोडंफारच सुचत आणि ते लिहून झालं कि तिथंच अडकतो...मधेच कुठंतरी लोंबकळल्यासारखी अवस्था असते... आधी जे लिहिलेलं असतं त्याच कौतुक होतं पण परत काहीच लिहायला,किंवा 'पूर्ण' लिहायला जमलेलं नसतं

अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित "फिस्टफूल ओफ डॉलर्स". पुढे ओळीने "फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर" आणि "द गुड, द बॅड अँड द अग्ली" हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना डावलून पुढे जाताच येणार नाही.
वास्तविक तीने जायला हवं होतं, पण ती गेली नाही.
मी इतकं तुसडेपणाने ‘हो’ म्हणूनदेखील ती न जाता निमुटपणे माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसली. आणि टूकूर-टूकूर आपली क्लासरुम न्याहाळू लागली. कधी प्रॅक्टीस करणार्यांकडे तर कधी घरी जाणार्या स्टुडंटकडे एवढंसं तोंड करुन बघू लागली. मध्येच समोर बसलेल्या मुलामुलींच्या थट्टा मस्करीकडे बघून स्वत:शीच जणू केविलवाणी हसू लागली. तिच्या त्या प्रकाराकडे बघून मला कसंसंच झालं. प्रॅक्टीकलवरचं लक्षच उडालं आणि पुन्हा एकदा आमच्या मनाने कच खाल्ली!