खरं तर आयडीया तिचीच होती. तिला थिएटरमध्ये सिनेमा पहायला जायचं होतं. कधी काळी तिच्या घरच्यांनी तिला सिनेमाला नेली होती, तेवढंच. त्यानंतर कोणी तिला नेली नव्हती. इतक्या वर्षांनी आज तिला सिनेमा बघायची खूप इच्छा होत होती. तिनं ती मला बोलून दाखवली. मीही तिला टोला मारत म्हणालो-
“आंम्ही मस्त नेऊ, तुला वेळ असायला पाहिजे ना!”
“नाही रे, यावेळी नक्की येईन- तू सांग फक्त कधी जायचं” बस्स.. त्या एका क्षणात मला आकाश ठेंगणं वाटू लागलं.
मध्यंतरी ठाणे पाठपुराव्याला गेलो असताना सर्वप्रथम जयश्रीताईंची ओळख झाली. त्यांचं "योग आणि व्यसनमुक्ती" विषयावर भाषण ठेवलं होतं. विषयाचा आवाका प्रचंड होता आणि वेळ फारच थोडा. तेवढ्या वेळातही जयश्रीताई जे बोलल्या ते फार आवडलं आणि पटलं देखील. त्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेत त्यांचे विचार नीट समजून घेता आले. आणि त्याच वेळी वाटले की यांची मुलाखत आनंदयात्रीसाठी घेणे आवश्यक आहे. मुक्तांगणमध्ये योग हा व्यसनमुक्तीवरील उपचारांचा एक भाग म्हणून वापरला जातो. मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट म्हणजे मोठ्या मॅडम यादेखील योगाभ्यास करीत असत.
ते Subjective म्हणतात तसं असतं...ज्याचं त्याच वेगळं...त्याच्यापुरतं असलेलं...
असं अलगद येतं....
फारसा गाजावाजा नसतो त्याचा..सगळ्यांना सांगून नाही येत ते....
बऱ्याचदा ते सगळ्यांना सांगण्यासारखं नसतंच..ते एकट्याचंच असतं,एकट्यासाठी असतं !
फाटक्या माणसानं चंद्राची अपेक्षा ठेऊ नये.. त्याच्याकडे चंद्राच्या प्रतिबिंबाशिवाय काहीच हाती येत नाही!
प्रेम करावं ते मुली गटवण्यात हुशार असलेल्यानं, धंदेवाईक तोंडावर गोड बोलून स्तुतीसुमनं उधळून फ्लर्टींग येणार्यानं! मनात खरं प्रेम बाळगणार्या साध्या लोकांनी नाही. कारण आज ना उद्या त्यांचं हरणं निश्चित असतं!
मॉलमध्ये तिला इनडायरेक्टली प्रपोज करणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. यासाठी नाही की तिला ते आवडलं नाही पण यासाठी की तसं करुन मी तिला सगळ्यात जास्त दुखावलं होतं.
संपूर्ण प्रवासात ती घुम्यासारखी एकटी बसून होती. माझ्याकडे साधं बघायलाही ती तयार नव्हती.
ती माझ्याबरोबर जास्त बाहेर येत नव्हती. आत्ताच नाही याच्या अगोदरही.
कधीही कुठे ये म्हटलं तर तिचं आपलं, नको घरी जायचं आहे, उशीर होईल, पप्पा काय बोलतील?
अगं कधीतरी हो म्हण!
आणि हो, कंटाळा!
हा तर तिला उपजतच देवाने गिफ्ट म्हणून दिला असावा. मी काहीही ठरवावं आणि हीला कंटाळा आला नाही असं कधी झालंच नाही.
एकदा तिनं क्लासला दांडी मारली होती. मी समोरच्या एका पब्लिक बुथवरुन तिला फोन लावला. चार वेळा रिंग वाजल्यानंतर एकदाचा तिचा पार आळसाटलेला आवाज आला-
“हॅल्लो..”
“हॅलो*** कुठे आहेस?”
“घरी. झोपलेय”
“आत्ता?”
मी कितीतरी वेळ असा वेड्यासारखा स्वत:शीच हसत होतो.
खरं म्हणजे तिची आठवण येऊन मला तिचे मॅसेज वाचण्याची तिव्र इच्छा होणं आणि नेमकं त्याच वेळी तीनं असा मॅसेज पाठवणं- ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच नव्हती. होता तो निव्वळ योगायोग. पर्फेक्ट टाईमिंग जुळवून घडून आलेला!
काही काही चित्रं असतात… स्वप्नांमधली.. आठवणींमधली.. ती असतात आपल्याबरोबर. नेहमी. त्यांचं असणंही पुरेसं असतं कधी कधी, दिलासा द्यायला, दिशा द्यायला...
रात्री झोपताना असंच एक चित्र हल्ली बऱ्याच वेळा माझ्या डोळ्यासमोर येतं...
छे! ही पोरगी म्हणजे फार टीपिकल गोष्ट झालेय. काही कळायलाच मार्ग नाही. तीच्या वागण्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता.
हक्क गाजवत ही माझ्याशी अशी का वागतेय? ना ही माझी गर्लफ्रेंड, ना हीच्यात आणि माझ्यात काही होण्याची सुतराम शक्यता. मग प्रत्येक गोष्टीत तिचा- असं अधिकाराने बोलण्याचा अर्थ तरी काय?
म्हणजे हीनं तासनं तास तीच्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारलेल्या चालतात. पण मी कोणाशी बोलायचं म्हटलं तरी तीचं डोकं तापलं पाहिजे!