फार दिवसांपासून डोक्यात होत की कुठेतरी सकाळी सकाळी एकट जाव नी शांत बसून निसर्गाची गुंजरव कान देऊन ऐकावी. अक्टोबर उजाडला आणि थंडीची जाहिरात करण्यासाठी पुण्यात सगळीकडे धुक्याने हजेरी लावायला सुरूवात केली. तेव्हा हि संधी साधून मी माझ्या मित्राबरोबर गुंजवणे dam च्या परिसरात भटकायच final करून टाकल. गुंजवणे dam तसा काही फार लांब नाही. पुण्यापासून अगदी 40 - 50 km परिघात हे ठिकाण आहे. पुण्याहून सिंहगड रोड ने सरळ जायचं आणि मग सिंहगडाच्या पायथ्याकडे न जाता डोणजे फाट्याला उजवीकडे वळायच.
सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!
दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.
चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर
चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर
कधी वाटतं, दोन-चार दिवस फुरसत काढून, निवांत एखाद्या जुन्या-जाणत्या गडावर शोधयात्रा काढावी..
..वा-यां-वादळांत टिकाव धरून राहण्यासाठी गडावरच्या शिबंदीची, पाण्याची, चोरवाटांची, संरक्षणाची कशी व्यवस्था असेल, याचे आडाखे बांधावेत..
..माचीवरच्या कारवीतून, तिरपांड्या घसा-यावरून घुसत जाताना जीव मेटाकुटीला यावा, अन् अवचितंच पहा-यासाठी खोदलेली विवरं सापडावीत...
..खो-यात उतरणारी दुर्घट वाट सुगम करावी, अन् झाडीत दडलेलं देवीचं ठाणं गवसावं..
..एखादं बुजलेलं वैशिष्ट्यपूर्ण टाकं तास न् तास खपून श्रमदानानं मोकळं करावं, अन् टाक्यावरच्या कोरीव कामानं अचंबित व्हावं..
दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397
'काय रे, कधी निघाचय ?' राहुल चा फोन वरचा प्रश्न.
हल्ली त्याचा फोन आला की पहिला प्रश्ना हाच आसतो. बरेच दिवस आमचा मलवाणला जायचा प्लान चालू होता (इथे 'बरेच दिवस' म्हणजे शुद्ध मराठीत 'बरेच महीने'). पण सगळ्यांचे जुळुन येत नव्हते. जिप्सी, मी आणि जीवेश च्या ह्या ना त्या कारणाने प्लान पूढे जात होता. 31st चा वीकेंड पण जवळ आला होता आणि राहुल ची आतुरता शीगेला पोहोचलेली.
...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...