आता ह्यावर्षी तरी ह्यापैकी एक ट्रेक झालाच पाहिजे. मी अभिला संगत होतो.
जुगार म्हणटले की अंगावर काटा ऊभा राहतो..
आज २ वर्षा पुर्वी असेच एकदा peoria च्या कसीनो ला (जुगार अड्डा नाही म्हणनार
) अगदी गंमत म्हणुन मित्रांसोबत रॉलेट आणी ब्लॅकजॅक खेळायला गेलो होतो.... ६० डॉ. चे नुकसान झालेच वरुन मनस्ताप/पश्चताप का काय म्हणतात तो सर्व प्रकार झाला.. तेंव्हा पासुन जुगार अर्थात कसीनोचे सर्व रस्ते बंद करुन टाकले..
अध्यात मध्यात ऑफिसमधे कुणीना कूणीतरी वेगस ला जाऊन आल्याचे कळायचे..
कसीनो मध्ये पैशे हारल्याचा प्रत्येकाचा अनुभव सारखाच होता..
सर्व साधारण वेगस ट्रीप मधे १००० डॉ. कमीत कमी खर्च येतो असे ऐकीवात होते .
म्हणजे आताचे भारतीय ४५००० रु.
एक दिवस आनंदात, विहिगावच्या धबधब्यात 

<फ्लॅशबॅक मोड ऑन>
सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. शनिवारी पहाटे-पहाटे माझ्या 'छोट्या भीम' (गल्लत करू नका... छोटा भीम हे आमच्या गाडीचे नाव आहे..) सोबत आम्ही ५ जण मुरबाडमार्गे नाणेघाटाच्या दिशेने निघालो. पहिला थांबा अर्थात मुरबाड मधले रामदेव हॉटेल होते. तिकडे भरगच्च नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो.
"झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा"
असेच काही वर्णन करता येईल आमच्या तीन दिवसाच्या भिमाशंकर-जुन्नर्-लेण्याद्री-शिवनेरी-माळशेज घाटाच्या भटकंतीचे. आठवड्याभराच्या कामाचा कंटाळा आणि त्याच त्याच नेहमीच्या रूटिनने आलेला मनाचा दुबळेपणा घालवण्यासाठी आम्ही चार मित्र, मी, प्रसाद कुलकर्णी (माबो आयडी प्रकुल२४), राहुल क्षीरसागर आणि अभिषेक पाताडे असे निसर्गाच्या सान्निध्यात "गटारी" साजरी करण्यासाठी निघालो. निसर्गाची बेफाम नशा सोबतीला असल्यावर "फेसाळणारे प्याले" हवे कुणाला?
ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली.