स्वप्न आणि वास्तव - भाग २ ( अंतिम )
वाचा - स्वप्न आणि वास्तव - भाग १
-----------------------------------------------------------------------------------------
वाचा - स्वप्न आणि वास्तव - भाग १
-----------------------------------------------------------------------------------------
मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले.
'' ऐ चल उठ! चल नीघ इथून!''
'' कुठून कुठून येतात साले!!''
भिका-याला पिटाळण्यात आले
पुतळा पाण्याने धुण्यात आला
'एकदम चकाचक'
पुण्यतिथी धडाक्यात साजरी झाली
दिवसभर तिथे मग जोरदार भाषणाच्या फैरी झडल्या
हारतु-यांच्या राशीं वर राशी पडल्या
रात्री आंधारात भिकारी दबकतच पुन्हा निवा-याला आला
इकडे तिकडे बघुन मग फुलांच्या मऊशार शेजेवर निवांत झोपून गेला
अगदी उशीरा पर्यंत
दुस-या दिवशी त्याला कुणीही हटकले नाही
पुतळ्या मागच्या आडोश्यातला त्याचा शेजारी
अन त्याच्या थाळीतल्या शिळ्यापाक्या तुकड्यांचा वाटेकरी
बेवारस काळ्या कुत्र्या शिवाय
तिथे अजून कुणीही भटकले नाही.
ते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं.
“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.
शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.
"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला." ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.
"केवढं बदललं आहे नाही सर्व?बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल?"
शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.
"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला." ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.
"केवढं बदललं आहे नाही सर्व?बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल?"
सेठजींकडे स्वामीजींचे आगमन झाले .
स्वामीजींच्या भरगच्च कार्यक्रमाचा प्रचार अन् प्रसार व्हावा ह्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले .
सर्व काही सुरळीत सुरु होते . शांतपणे .
पण काही नवशिक्या अतिउत्साही तरुण पत्रकारांनी नाक खुपसलेच .
' स्वामीजी ! आपण प्रत्येक ठिकाणी फक्त श्रीमंतांनाच आपल्या आतिथ्याचा लाभ देता असे का ? ' एकाने विचारले .
' सुंदर ! अतिशय सुंदर ! ! ' स्वामीजी मंद स्मित करून म्हणाले , ' अशा प्रश्नांनीच आमची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होते . '
जेव्हा माकडाला कळले की माणसाचे पूर्वज अगदी त्याच्या सारखेच होते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही . माझा वंश इथे संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करतोय ! अन इथे ? इथे तो सिंह राज्य करतोय ! काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको ? माकडाने विचार केला .
पण सिंहाच्या शक्ती पुढे आपलं कसं चालणार ?
त्याला तर सगळेच घाबरतात .
आपल्याला कोण साथ देणार ?
पण माणसा जवळ तरी कुठे फार मोठी शक्ती आहे तरीही तो सा-या जगावर राज्य करतोय ना ? कशाच्या बळावर ? डोक्याच्याच ना ? मग आपण ही डोकं लढवायला शिकलं पाहिजे , अगदी त्यांच्या सारखंच !
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन "उध्दवा"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !
अगदी काल परावाची गोष्ट .
..ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय ...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ...