आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
नमस्कार सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून बरीच चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माहित नाहीत किंवा माहित करून घ्यायचे नाहीत किंवा माहित असून ते माहित नाही असे भासवायचे आहे. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत त्यात मुख्य म्हणजे पाणी, वीज, शेतमालाला भाव हे आहेत. त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे त्याला घर कसे चालवायचे हेच कळत नाही आहे.
देवाघरी बाप गेला दम्याने तरी माय शेतामधे राबली
कंठातुनी हाक बाहेर आली तिने मात्र ओठावरी दाबली
मातीत रेघा उभ्या मारताना तिची बांगडी ना कधी वाजली
पान्हा उन्हाने कमी होत गेला मला पेज पाण्यासवे पाजली...
कष्टांमुळे चामडी जीर्ण झाली शिरी केस झाले जरा पांढरे
बैलापरी ओढले नांगराला भरे कैक वेळा उरी कापरे
नेसायला वेदना घ्यायची ती घरी पातळे चांगली साचली
फ़ाटून गेल्या जुन्या सर्व चोळ्या नवी मात्र नाही कधी टाचली...
पायात काटे खडे टोचलेले मुके होउनी सोबती राहिले
झोळीमधे झोपलो मी सुखाने मी तिला राबताना स्वतः पाहिले
दुष्काळ आला तरी रोज पाणी सभोवार डोळ्यातले शेंदले
थकलेल्या डोळ्यांमधला पाऊस कधीचा पडतो
जोमात बहरली दुःखे उपवास तरी का घडतो
मेल्यावरसुद्धा उरतो का श्वास उराशी बाकी
कौलावर घास गिळाया कावळा पुन्हा ओरडतो
दगडांनी काबिज केली वावरात काळी माती
दारात बैसला बाबा लाचार अजुनही रडतो
झाडावर अंध गिधाडे हुंगतात वार्यालाही
कुरणातील बैल बिचारा आखरी लढाई लढतो
हंबरते खुंट्याभवती झोपडी प्राण जाताना
हुंदका चुलीचा तेव्हा राखेत पिलागत दडतो
सावली पेटते जेव्हा अडखळल्या पायाखांली
बांधावर कुणबी वेडा नशिबास शिव्या हासडतो..
--- संतोष वाटपाडे (नाशिक)
आज सुदाम सकाळीच रानातुन चक्कर मारुन परतत होता. चेहर्यावर जरा जास्तच आनंद होता..डोक्यात काय काय विचार चालु होते.. या वेळेला पिक चांगले आले आहे. मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपल्या हातात काहीच लागले नाही.. आणि घर दुरुस्त करायचे होते ते सुध्दा राहिले नविन काहीच वस्तु पण घेता आली नाही.. कमीत कामी ह्या वर्षी तरी ते करता येईल... आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज देखील फेडता येईल. म्हणजे मुलाच्या शिक्षणाला पण खर्चला सुद्धा ठेवता येईल...
"काय सुदामा कसा काय म्हणतीय पिक पाणी?? औंदा काय लै मज्जा आहे राव तुझी.. जवारीच कणीस तांब्या सारख पडलयं मर्दा रानात" पाटील.
मायबोलीवर अनेक वर्ष मी आहे. इतक्या विषयांवर मायबोलीकर गप्पा मारतात की विचारता सोय नाही. अगदी सिरियाची समस्याही त्यांना आपली वाटते. पण शेतकरी त्यांना आपला वाटत नाही. मी याच चालू घडामोडीत अत्यंत महत्वाचे.... या सदरात शेतकरी सुरक्षा विधेयक तयार करण्या बाबत सगळ्यांना आवाहन केले. कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. ते सोडा, शेती आणि शेतकरी यातही शेतकरी सुरक्षा विधेयक मांडलं पण रिस्पॉन्स नाही. यावरुन मला आता पटायला लागलय की या देशाला शेतकर्याची गरज नाही. या नंतर शेतकरी ह्या विषयावर मी पण लिहिणार नाही.
कहाणी शेतकर्यांची - खास श्रावण मासानिमित्त
( एक रुपककथा )