पत्रक

मनातली 'शाळा'

Submitted by आनंदयात्री on 24 January, 2012 - 23:50

तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्‍या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो.

विषय: 

संवाद - श्री. नंदू माधव - 'बच्चनच की..!!!'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 January, 2012 - 03:17

नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभ्यासू नट म्हणजे नंदू माधव. ’भूमिका जगणं’ म्हणजे काय, हे त्यांनी साकारलेल्या भूमिका बघून कळतं. ’दुसरा सामना’, ’डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ अशी नाटकं असोत, किंवा ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’वळू’, ’बनगरवाडी’, ’शूल’ असे चित्रपट असोत, नंदू माधव यांचा अभिनय कायमच वाखाणला गेला आहे. आपली सामाजिक आस्था सदैव सजग ठेवून आजवर त्यांनी अभिनयक्षेत्रातला प्रवास केला आहे.

विषय: 

२०१२ - नववर्षाच्या शुभेच्छा!!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोली.कॉमतर्फे सर्व मायबोलीकर, त्यांचे सुहृद अणि असंख्य वाचकांना नववर्ष २०१२ साठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

'जन गण मन'ची शताब्दी - आठवणी आणि अनुभव

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 December, 2011 - 01:45

रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय.

एक आदरांजली जनकवीस .... त्यांच्याच सुरेल गीतांमधून.

Submitted by किंकर on 22 December, 2011 - 19:35

.....आणि या नंतरच्या गीताचे शब्द आहेत श्री.निवृत्ती रावजी पाटील यांचे.असे म्हणून जर निवेदकांनी निवेदन थांबवले, तर काय होईल ?काही नाही जे काय असेल ते ऐकु.काय करणार असे मनात म्हणत तुम्ही गप्प बसाल.पण काही क्षणच कारण त्यानंतर तुम्हाला अशी सुरावट कानी पडेल कि बस्स फक्त ऐकतच राहावे.कारण तुमच्या कानावर पडत असेल हि सुरावट ....

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा,दिल्या घरी तू सुखी रहा …......
काय ओळखलेत ना ? श्री. निवृत्ती रावजी पाटील म्हणजेच आपले पी.सावळाराम.

गुलमोहर: 

माझे मातीचे प्रयोग - ५ (Crystalline glazes continued)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.

'घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग... सूत्रधाराच्या नजरेतून !

Submitted by rar on 16 December, 2011 - 01:45

१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन' या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.

img001.JPG

विजय तेंडुलकर यांनी लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.

'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर

Submitted by चिनूक्स on 14 December, 2011 - 13:04

बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.

पोटापुरता पसा पाहिजे ....गदिमांना आदरांजली

Submitted by किंकर on 14 December, 2011 - 00:11

जर का तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि काय हवे ते माग म्हणाला तर ? तर आमची मागणीची यादी तयार होई पर्यंत, किंवा मनातली इच्छा देवास सांगेपर्यंत,बहुदा देव कंटाळून निघून जाईल.कारण आपण खूप संभ्रमात पडू,हे मागू का ते मागू या भावनिक गोंधळात बुडून जावू.पण जर तुमच्या भावनेला जर अचूक शब्दात पकडून तुमची रास्त मागणी देवाकडे पोहचवायची असेल तर ?त्यालाही एक छान उपाय आहे, तुमच्या भावनेला अचूक वाट करून देण्यासाठी,तुम्ही अशा माणसाला साकडे घालू शकता, ज्याचे शब्द भांडार अगणित आहे. देवाकडे काय मागायचे हि अडचण तुमच्या आमच्या सारख्या माणसांची.

गुलमोहर: 

नोव्हेंबर २०११ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

Submitted by Admin-team on 8 December, 2011 - 02:05
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पत्रक