तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो.
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभ्यासू नट म्हणजे नंदू माधव. ’भूमिका जगणं’ म्हणजे काय, हे त्यांनी साकारलेल्या भूमिका बघून कळतं. ’दुसरा सामना’, ’डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ अशी नाटकं असोत, किंवा ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’वळू’, ’बनगरवाडी’, ’शूल’ असे चित्रपट असोत, नंदू माधव यांचा अभिनय कायमच वाखाणला गेला आहे. आपली सामाजिक आस्था सदैव सजग ठेवून आजवर त्यांनी अभिनयक्षेत्रातला प्रवास केला आहे.
रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय.
.....आणि या नंतरच्या गीताचे शब्द आहेत श्री.निवृत्ती रावजी पाटील यांचे.असे म्हणून जर निवेदकांनी निवेदन थांबवले, तर काय होईल ?काही नाही जे काय असेल ते ऐकु.काय करणार असे मनात म्हणत तुम्ही गप्प बसाल.पण काही क्षणच कारण त्यानंतर तुम्हाला अशी सुरावट कानी पडेल कि बस्स फक्त ऐकतच राहावे.कारण तुमच्या कानावर पडत असेल हि सुरावट ....
गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा,दिल्या घरी तू सुखी रहा …......
काय ओळखलेत ना ? श्री. निवृत्ती रावजी पाटील म्हणजेच आपले पी.सावळाराम.
१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन' या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
विजय तेंडुलकर यांनी लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.
बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.
जर का तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि काय हवे ते माग म्हणाला तर ? तर आमची मागणीची यादी तयार होई पर्यंत, किंवा मनातली इच्छा देवास सांगेपर्यंत,बहुदा देव कंटाळून निघून जाईल.कारण आपण खूप संभ्रमात पडू,हे मागू का ते मागू या भावनिक गोंधळात बुडून जावू.पण जर तुमच्या भावनेला जर अचूक शब्दात पकडून तुमची रास्त मागणी देवाकडे पोहचवायची असेल तर ?त्यालाही एक छान उपाय आहे, तुमच्या भावनेला अचूक वाट करून देण्यासाठी,तुम्ही अशा माणसाला साकडे घालू शकता, ज्याचे शब्द भांडार अगणित आहे. देवाकडे काय मागायचे हि अडचण तुमच्या आमच्या सारख्या माणसांची.
खरेदीमध्ये नोव्हेंबर २०११ मध्ये नव्याने दाखल झालेली काही पुस्तके व इतर प्रकाशने,