।। वैराग्य।।
Mar 19, 2013,
आर्टिकल (महाराष्ट्र टाइम्स)
' अ ' तोंडात घास घालणार , तोच अचानक त्याच्या ' ब ' मित्राने ' अ ' च्या जोरात गालावर मारले. घासही पडला आणि गालाला जोराची चपराकही लागली. तृप्तीच्या क्षणी असा विक्षेप कोण सहन करणार ? जेवणारा ' अ ' ही त्याच्या मित्राला मारायला धावला.
श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....
एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....
वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....
कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....
कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...
जशास तसं उत्तर द्यावं कि नाही याबद्दल मनात खूप गोंधळ आहे. म. गांधीजींच्या तत्वज्ञानाप्रमाणे अवमानकारक वागणूक देणा-यास , शत्रूत्व धरणा-यासही प्रेमाने जिंकून घ्यावे असं म्हटलं आहे. काही वेळा आपण एखाद्याशी फटकळपणे वागलेलो असतो, पण त्याने तो राग मनात न ठेवता आपल्याला हवी तेव्हां मदत केल्याने पश्चात्ताप होतो. पण सर्वांच्या बाबतीत असा अनुभव येत नाही (पश्चात्ताप झालाय किंवा होईल असे वाटत नाही). अशा लोकांच्या बाबतीत काय करायचे ?
आपले अनुभव इथं शेअर करू शकता.
पहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे! तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.
गेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला! आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो! सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला.
काल माझ्या एका मित्राच्या आजोबांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत स्मशानापर्यंत गेलो. श्रद्धांजलीच्या भाषणात एकाने उल्लेख केला की ते ९३ वर्षांचे होते.
मी मनात हिशेब केला. ९३ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म साधारण १९२० च्या आसपास झालेला असावा. या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी काय काय पाहिले असेल?
# त्यांचे बालपण म्हणजे टिळकयुगाच्या अस्ताचा आणि गांधीयुगाच्या उदयाचा काळ. अनेक महान नेते त्यावेळी ’घडत’ होते.
# भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फासावर चढवले असेल त्यावेळी ते अवघ्या ११-१२ वर्षाचे असतील.
महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....
घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.
महान लोकनेते, समाज सेवक आणी समाजसुधारक यांच्या आठवणीसाठी आणी नमनासाठी हा धागा.
•
मनुष्यात स्वत्व हे हवेच.. संपूर्णपणे स्वत्वविरहित माणूस हा कधी लीन-दीन होईल हे सांगता येणार नाही.. हे ३ पातळ्यांचे असते .
-- या ३ पातळ्यान्पैकी अस्मिता ही हवीच.. तिच्याशिवाय अस्तित्व अर्थहीन.. अस्मिता आत्मविश्वास जिवंत ठेवते..
-- दुसरी पातळी म्हणजे अभिनिवेष हा सद्सद्विवेकबुद्धी ठेवून स्थळ-काळ पाहून केला जाणारा असावा.. योग्य त्या ठिकाणी योग्य ते कम्युनिकेट केले गेलेच पाहिजे..
-- आणि तिसरी म्हणजे अहंकार.. हा आवश्यक ती पातळी सोडून जात नाही ना हे पाहण्यासाठी कायम स्वसंवाद हवा.. टीका सहन करण्याची क्षमता हवी.. याकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे..